ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

ज्ञानाचे स्वरुप, पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

लेखक: अजय भागवत. १२ जून २००९, पुणेदुवा क्र. १

हया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे. त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :

१. ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत

२. ज्ञानाचे स्वरुप मांडले आहे, त्यातील कक्षा स्पष्ट केल्या आहेत

३. ज्ञान आत्मसात करण्याच्या विवीध पातळ्यांचा विचार मांडला आहे ( ब्लूम्स टॅक्सॉनमीच्या आधारे )

४. शेवटी, वरील विचारांचा वापर करून काही सुचना मांडल्या आहेत. त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करून शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे.

ज्ञानाची व्याख्या

ज्ञानाची व्याख्या करणे तितकेसे सोपे नसले तरी आपल्याला प्रयत्न करता येईल व ह्यालेखाचा आशय समजण्यासाठी त्या व्याख्येचा वापर करता येईल ह्या उद्देशाने पुढील व्याख्या केली आहे.

मानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष, वास, दृष्टी, चव, ध्वनी, अशा इंद्रियांनी मिळवतो. हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने, अनुषंगाने, बरोबरीने करतो.

प्राथमिक स्वरुपात साठवलेल्या ज्ञानाचा क्रमाक्रमाने विकास होतो. व ते अधिकचे, वाढीव ज्ञान आधिच्या ज्ञानाच्या बरोबरीने साठवले जाते. ह्या अशा ज्ञानाचे विश्लेषण केले असता, त्यात आपल्याला वेगवेगळे परिमाणं ( मापं / प्रकार ) दिसतात - हेज्ञानाचेस्वरुपएखादी उतरंड नव्हे. एकाच वेळी आपण अनेक स्वरुपाचे ( परिमाणाचे ) ज्ञान उघड करू शकतो.

१. तथ्य( फॅक्ट ), उदा. एव्हरेस्टची उंची ८८६८ मी. आहे

२. संकल्पना( कॉन्सेप्ट ), उदा. व्याख्या, वेगवेगळ्या कल्पनातील साम्ये अथवा फरक, एखादा नियमही ( सिद्धांत ) कल्पना असतो. ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, मिटींगला " शोभतील " असे कपडे घालावेत आणि ही कल्पना कालानुसार, स्थळानुसार बदलते. ( एव्हरेस्टची उंची अशी संकल्पनेने बदलत नाही, म्हणून ते तथ्य! )

३. पद्धत( प्रोसीजर ) उदा. गणित सोडवण्याची, गाडी सुरू करण्याची. पद्धत ही अनेक पायऱ्यांनी बनते, ती पुन्हा - पुन्हा त्याच क्रमाने करता येते.

४. संरचना( मॉडेल ) उदा. परिक्षा कशी घ्यावी, उत्तरपत्रिका कशा तपासाव्यात. संरचना आपल्याला मार्ग दाखवते.

५. अभिसंरचना( मेटामॉडेल ) उदा. संरचना कधी व कशी तयार केली म्हणजे ती अडचण सोपी करू / सोडवू शकेल, संरचनेचे घटक काय असावेत हे समजणे

६. कौशल्यउदा. मी " अशा " रितीने उत्तम चित्र काढू शकते. अशा - इतरांपेक्षा वेगळ्या व अधिक परिणामकारकतेने - ते कसे हे माहित असणे

७. निवडकौशल्य( व त्यावर असलेला आत्मविश्वास ) उदा. मी आजपर्यंत तोरण्यावर गेलो नाहीए पण मला गडावर जाण्याचे अनेक मार्ग ऐकिव अथवा पुर्वानुभवाने माहिती आहेत, मी ह्याच वाटेचा वापर करेन

८. विचारसंरचना( ह्याला अनुभव असेही म्हणता येईल पण ते तितकेसे सुसंगत वाटत नाही ) ( मेटाकॉग्निशन ) उदा. मी ह्यावर कसा आणि काय विचार केला पाहिजे? - की जेणेकरून समोरील प्रश्नाची उकल होईल? तोरणावर जायचे मला १० मार्ग माहिती आहेत, त्यातील योग्य तो कसा निवडावा?

वरील ज्ञानपरिमाणं एखादी व्यक्ती कशी वापरते ते पाहूया. एक कॅप्टन हा विचार करतो आहे असे समजा -

" शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत. माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत. रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते. मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरून काढेन. वरून होकार मिळताच आम्ही तीन तुकड्यात विभागून चाल करू. नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन. अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की, प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की, ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का. मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय; वर्षीपुर्वी असेच काहीसे करून आम्ही शत्रूला चकीत केले होते. चाल आधी कोणी करायची, कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे. ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए. "

वरील आठही ज्ञानपरिमाणं तुम्हाला ह्या विचारात स्पष्टपणे दिसतील. हे ज्ञानाचे स्वरुप लहान मुलातही दिसते फक्त त्यांच्या स्वरुपाची कक्षा वयस्कर व्यक्तिच्या कक्षेच्या तुलनेने बरीच लहान असते. परंतु ते स्वरुप आकारायला सुरुवात केव्हाच झालेली असते. ( काय केले म्हणजे बाबा मला नवे खेळणे आणून देतील? मी मोठ्यापणी पायलट होणार.. वगैरे ).

ज्ञान कशाला म्हणता येईल ह्याची कल्पना आल्यावर आपण पुढील मुद्द्याकडे वळू शकतो. पुढचा मुद्दा आहे तो पंचेंद्रीयांनी प्राथमिक स्वरुपात मिळवलेल्या ज्ञानाचे परिमाण कसे वाढवायचे ह्याचा. ह्यालाच आपण " शिक्षणपद्धत " म्हणू शकतो.

ज्ञान संपादनाच्या पायऱ्या ( पातळ्या )

असे म्हणले जाते की, आपण तासभर एखादी कृती ऐकली, पाहिली की, ती कृती संपायच्या आत त्यातील ४० % ज्ञान आपण विसरलेलो असतो. दुसऱ्या दिवशी, पुढील आठवड्यात, महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व कृती विस्मरणात जाऊ शकते. ( मला ह्या क्षणी हे आठवतेय, ""Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand. " Confucius, circa 450 BC")

ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात ठेवण्यासाठी ते ज्ञान ह्या टप्प्यातून जावे लागते :

१. आठवणे :एखादी गोष्ट ( तथ्य ) स्मरणात राहण्यासाठी ती समजणे आवश्यक नसते. ( उदा. बालवाडीतील मुलांनी घोकलेल्या नर्सरी ऱ्हाइम ).

२. समजणे :एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते. त्याची उदाहरणे देता येतात, त्याचे सुपरिणाम / दुष्परिणाम सांगता येतात

३. वापर :वापर केला तर समज अधिक भक्कम होते तसेच समजले तरच बाहेरील जगात त्या ज्ञानाचा वापर करता येतो. नुसत्या " सांगता " येण्यापेक्षाच्या वरच्या पातळीत जाता येते.

. चिकित्सा( उहापोह, पडताळणी, कसोटी ): चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने विभागून / छेदून, प्रत्येक भागाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येतो.

५. तुलना :फायदे / तोटे, चांगल्या / वाईट बाजू, त्या गोष्टीच्या स्वरुपाशी तुलना अथवा इतर पण संबंधीत गोष्टीशी तुलना करता येते

६. नवनिर्माण :जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो.

आठवता येणे ह्या स्थितीपासून नवनिर्माणाच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काही सर्वमान्य पायऱ्या वापराव्या लागतात, वेळ द्यावा लागतो. ह्या लेखाच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळण्याआधी, ज्ञानाचे स्वरुप व ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या ह्यावर क्षणभर घुटमळून पुढे जाऊ. त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो -

अ ) एखादे मुल हुषार किंवा ढ कसे ठरते? ( आयएंपी : ज्ञानाची कक्षा, स्वरुप, अस्तित्वातच नसणे व असणे )

ब ) मानवाला शिकवता येते का? की तो सतत स्व - शिक्षण करतो? ( आयएंपी : पंचेंद्रिये )

क ) तुमच्या पाठ्यपुस्तकांची ( शाळा, महाविद्यालयातील ) तुम्हाला आठवण येत असल्यास त्यात ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या का? उदाहरणे देऊ शकाल?

ड ) थेअरी म्हणजे काय? ती कोणी तयार केली? ती तयार करणाऱ्यांनी कोणते शिक्षण घेतले होते? कोणती पुस्तके वापरली होती?

शिक्षणसंस्थेतील शिक्षण व ज्ञान संपादनाच्या पातळ्या

शेवटच्या प्रश्नातील पुस्तकांचा धागा पकडून पुढील मुद्द्याकडे वळुया. शिक्षणसंस्थेत आपण बालवाडी, प्राथमिक.. अशा टप्प्यांनी शिकत पुढे जातो. शिक्षणसंस्थेतील शिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट्य मानवाचे ज्ञानाचे स्वरुप निर्माण ( ज्ञानकक्षा ) करणे हे आहे असे गृहीत धरले तर ते स्वरुप घडवण्यासाठी आपण शिक्षणसंस्थेत जातो. पण शिक्षणसंस्थेत घडल्या जाणाऱ्या ज्ञानकक्षा ठराविक विषयांच्या असतात - गणित, भाषा, शास्त्र, संस्कार ( इतिहास ). हा पुढील शिक्षणाचा पाया असतो जो वापरून आपण महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या इमारती रचणार असतो. शिक्षणसंस्थेव्यतिरीक्त आपण घरी, समाजात, प्रवासात, ई वेगवेगळ्या ज्ञानकक्षा मनाप्रमाणे स्वीकारतो, नाकारतो. त्यामुळेच प्रत्येकाचे ज्ञानाचे स्वरुप वेगवेगळे असते.

दहावी पर्यंत सगळ्यांना समान विषय असल्यामुळे ह्या लेखासाठी पुढील चर्चेत हाच काळ संदर्भलेला आहे.

ज्ञानकक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया परिणामकारक असावी लागते. वरील ६ पैकी पहिल्या ३ टप्प्यांतून ज्ञान गेले नाही तर ते लक्षातही राहणार नसते. बऱ्याचशा शिक्षणसंस्थेत ३ ऱ्या टप्प्याच्याही वर मुलांना जाता यावे म्हणून वादविवाद स्पर्धा, नाटयकला इ कला, खेळ, सहली, गॅदरींग, व्यवसाय, विज्ञानप्रयोग, प्रदर्शने, असे अनेक उपक्रम आखते. त्यातील काही उपक्रमांतील सहभाग ऐच्छीक असतो व काही वेळा मर्यादीत ठेवावा लागतो. त्यामुळे सगळ्यांनाच " तो " टप्पा पार पाडता येत नाही. काही उपक्रमात त्या - त्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित ज्ञानकक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो तर काही वेळा कोणताही संबंध नसू शकतो.

अशा क्रियेतून मुलांना नेतांना ज्ञान आत्मसात करण्याची पहिल्या ३ टप्प्यातील क्रिया अतिशय परिणामकारक व्हावी असे वाटते. कारण ते टप्पे पाठ्यपुस्तकातून घडवून आणायचे असतात व त्या क्रियेत सगळ्यां विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असतो. त्या पलिकडील टप्पे शाळातील विविध उपक्रमाद्वारे व शाळेतर माध्यमातून मिळवायचे असतात. पण ते मिळवतांना त्यात सगळ्यांचा समान सहभाग नसतो आणि म्हणूनच पहिले ३ टप्पे मी पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानतो

पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक

पाठ्यपुस्तके व ३ टप्पे ह्यांचा संबंध आपण पाहिला. ह्या ३ टप्प्या्तून ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणखी एक दुवा असतो तो म्हणजे शिक्षक! शिक्षकाला पाठयपुस्तकाच्यानुसार शिकवणे नियमानुसार क्रमप्राप्तच असते. ते पुस्तक शिकवण्याकरता व शिकवणे परिणामकारक आहे की नाही हे पाहण्याकरता किती " तास " प्रत्येक शिक्षकाला दर महिन्यात मिळतात हे पाहणे फार महत्वाचे आहे. खरे म्हणजे असलेला वेळ पुरतो की नाही व त्या वेळेत परिणामकारक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते की नाही ह्या विषयावर मी भाष्य करू शकणार नाही. पण असलेल्या वेळाचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी शिक्षकासाठी त्याच विषयांची खास पाठ्यपुस्तके असावीत.

शिक्षकाकडून प्रत्येक विषयाचे लेसन प्लॅन बनवणे अपेक्षिले जाते. पाठ्यपुस्तक जर सगळ्या शाळांना समान असेल तर प्रत्येक शाळातील शिक्षक आपापल्या पद्धतीने प्लॅन बनवतांना त्यांना असे मॉडेल द्यावे की, त्यांना त्यांचा वेळ त्यात खर्च करण्यापेक्षा शिकवण्याच्या प्रक्रियेवर देता येईल. प्लॅनमधील व्हेरिअशन कमी होईल. हे मॉडेल करतांना खालील सुचना द्याव्याशा वाटतात.

१. कोणत्याही एका विषयाचे ( गणित सोडून ) उदाहरण घेऊ. एका पुस्तकात उदा. १० धडे आहेत व त्यात सगळे मिळून १०० तथ्ये ( फॅक्ट ), पद्धती, संरचना आहेत. ह्यांना आपण १०० उद्दीष्ट्ये म्हणू. अर्थातच ह्यातील काही उद्दीष्ट्ये फक्त आठवणे ( उदा. कुप्रसिद्ध सनावळ्या ) तर काही समजणे तर काही वापर करणे अशा वेगवेगळ्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीवर नेणे आवशक आहे. त्यासाठी ते शिक्षकाला कळण्यासाठी ती १०० उद्दीष्ट्ये ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला संलग्न करावीत व पाठ्यपुस्तकात नमुद करावीत. ( उदा. उद्दीष्ट्य १ : समजणे, उद्दीष्ट्य २ : आठवणे, उद्दीष्ट्य ३ : वापर, ई ). लेसन प्लॅनला ह्याचा फायदा होईल. व शिक्षकाने काय प्रश्न विचारले पाहिजेत ते ही ठरवता येईल ( हे आपण पुढे पाहूच ).

जर एखादे उद्दीष्ट्य " आठवणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते " वापर " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे. त्याच प्रमाणे एखादे उद्दीष्ट्य " समजणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते फक्त " आठवण " लाच शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे.

ही सुविधा पाठ्यपुस्तकातून शिक्षकांना मिळाली तर त्यांना लेसन प्लॅन बनवणे तर सोपे जाईलच (किंबहुना तो तर शिक्षकांसाठीच्या) पाठ्यपुस्तकातच दिलेला असावा. शिक्षकाला आपली कल्पनाशक्ती वापरता यावी ह्यासाठी त्यांनी त्यांचा लेसन प्लॅन खालील प्रमाणे बनवावा. ह्यात त्यांना कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीवर न्यायचे आहे हे डावीकडे लिहावे. ज्ञानपातळी प्रमाणे प्रश्न तयार करावे. हे प्रश्न त्यांनी वर्गात धडा शिकवतांना विचारावेत अथवा परिक्षेत वापरावेत. येथे शिक्षकांचा वेळ लेसन प्लॅन बनवण्यात न जाता, चांगले प्रश्न निर्माण करण्याकडे दिल्यामुळे शाळेची एक अशी प्रश्नपेढी तयार होईलच व शिक्षकांच्या वेळेची अधिकाधिक बचत होईल. अशा प्रश्नांच्या माध्यमातून शिकवण्यातही काही प्रयोग करून पाहता येतील- उदा. ओपन बूक लर्निंग.

["We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction. " Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005]

खालील तक्त्यातील धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01 हे चांगले आत्मसात केले गेले आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षक काही प्रश्न तयार करतील ते प्रश्न निरसन झाले की, ते उद्दीष्ट्य गाठले असे समजता येईल. एखादे उद्दीष्ट्य तपासतांना योग्य त्या ज्ञानपातळीचेच प्रश्न तयार करतांना कोणतीही शंका राहणार नाही. प्रत्येक शाळांमधील प्रत्येक शिक्षकातील शिकवण्याच्या पद्धतीत एक प्रकारची लय येईल. ते एकमेकांशी संवाद साधू शकतील (उदा. मराठीशब्द. कॉम सारख्या माध्यमातून प्रश्नांची देवाण-घेवाण, ई). विद्यार्थ्यांना शंका राहणार नाही की आपला पाया मजबूत राहण्यासाठी मी कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीपर्यंत शिकायचे आहे. त्यामुळे त्यांच्यातील भ्रम नाहिसा होऊन त्यांच्यातही एक लय येऊ शकेल. वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या वर्गात शिकवू शकतील/प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील (की ज्याने त्यांचा पाया आणखी मजबूत होउ शकेल. ).

ज्ञानपातळी:माहिती आठवता येणे

कोणते प्रश्न असावेत?

कोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा

( उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा )

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत?

क्रियापदे:सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग

... किती आहेत?

हे.. कोणी केले?

ह्याला काय म्हणतात?

... तेथे काय घटना घडली ते सांग

कोण कोणास म्हणाले?

हे का झाले ते सांग

ह्याचा अर्थ काय ते सांग

हे काय आहे?

हे कधी घडले?

खरे की खोटे?

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 09

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 99

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

ज्ञानपातळी:माहिती समजणे

कोणते प्रश्न असावेत?

स्वतःच्या शब्दांत सांगता येणे, माहितीच्या स्रोतातून हवे त्याची अचूक निवड करता येणे

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत?

क्रियापदे:समजावून सांग, व्याख्या विस्तृत कर, सारांश तयार कर, चर्चा कर, फरक सांग, अंदाज कर, भाषांतर कर, तुलना कर, विस्तार करून सांग

तुझ्या शब्दात सांग, ह्या माहितीचा सारांश तयार कर

.. ह्याच्या पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांध

... तुझे विचार सांग?

.... ह्यातील मध्यावर्ती कल्पना काय आहे?

ह्या घटनेतील मुख्य दुवा कोण होता/आहे?

ह्यातील फरक सांगू शकशील का?

ह्याचे एखादे उदाहरण देऊ शकशील का?

ह्याची व्याख्या करू शकशील का?

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 22

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 56

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 72

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

ज्ञानपातळी:माहितीचा वापर

कोणते प्रश्न असावेत?

सौरौउर्जेचा वापर... ह्यासाठी केला जाऊ शकतो का? तसेच आणखी काय उदाहरणे देता येतील?

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत?

क्रियापदे:( गणित) सोडव, ( सिद्ध करून) दाखव, वापर, दाखले दे, तयार कर, पुर्ण कर, चालव, परिक्षा घे, गट तयार कर

... ह्याचा आणखी एखादा दाखला देता येईल का?

हे (वेगळ्या परिस्थितीत) घडू शकते का?

ह्यांचे... असे वेगवेगळे गुणात्मक गट तयार कर

ह्यात काय बदल तुला करावे लागतील जर...

ही पद्धत तुला इतर कोणत्या (तुझ्या स्वतःच्या बाबत) ठिकाणी वापरता येईल?

तु कोणते प्रश्न विचारशील?

ह्या माहितीच्या आधारे तू एखादी रीत तयार करू शकशील का?

ही माहिती उपयोगाची आहे का जर...

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 25

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 48

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न: