कोथिंबीर, कोरडे खोबरे किसुन किंवा ओला नारळ खोवुन, लिंबू
तेल,मोहोरी,जिरे,हिंग,हळद
मीठ, साखर
३० मिनिटे
दोन जणांना
सर्वात आधी पोहे रोळीमधे घुवून ठेवा.
नंतर सिमला मिरची, कांदा, मिरच्या, गाजर, कोबी, हे सर्व उभे चिरणे. प्रमाण प्रत्येकी पाव तुकडा. हे सर्व उभे आणी खूप बारीक चिरणे महत्वाचे आहे.
नंतर तेलाची फ़ोड्णी करुन त्यामधे उभे चिरलेले वरील सर्व जिन्नस आणी मटार घालून एक- दोन वाफ़ा आणणे, नंतर त्यामधे पोहे घालून ढ्वळणे. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, व थोडी साखर घालून परत ढवळणे.
खायला देताना त्यावर कोथिंबीर व सुका किंवा ओला नारळ ,आणी लिंबू पिळून देणे.
भाज्या घातल्याने पोहे रंगीबेरंगी दिसतात.
रोहिणी
नाहीत.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.