१ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. नंतर तो साबुदाणा हाताने मोकळा करुन त्यात३-४ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या वाटून, व कच्चा बटाटा साल न काढता किसुन घालणे. नंतर चविप्रमाणे मीठ, साखर व लिंबू पिळणे. कोथिंबीर चिरुन घालणे. हे सर्व मिश्रण हाताने कालवणे.
कच्चा बटाटा घातल्याने वडे कुरकुरीत होतात.
ह्या मिश्रणातील थोडा गोळा घेउन तो दोन हातांच्या तळव्यांमधे घेउन पसरट दाबणे व तेलामधे तांबूस रंग येईपर्यंत तळणे.
नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम वडे खाणे. नंतर जायफळ घातलेली गरम कॉफी पिणे.
रोहिणी
नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.