आता पाळी विठोबाची बडव्यांच्या तावडीतून सुटकेची...

(घुसळलेले लोणी - २९)


कालीभक्तांची पंड्यांच्या तावडीतून सुटका ही बातमी वाचली. न्या. सिरपुरकर यांनी दिलेल्या उच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार पंड्यांना कालिमातेच्या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.


या आणि अशा बातम्यांचे सहर्ष स्वागत!


महाराष्ट्रात आणि देशात इतरत्रही कधी ना कधी याच दिशेने वाटचाल होईल असे वाटते. जागोजागच्या विठोबांची बडव्यांच्या तावडीतून सुटका होण्याचा सुदिन लवकरच बघायला मिळेल अशी आशा मनामध्ये जागी झाली आहे.


या दिशेने यापूर्वी झालेले किंवा सध्या कार्यरत असलेले प्रयत्न/ चळवळ याविषयी काही माहिती/विचार असल्यास जरूर मांडावेत ही विनंती.