कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,
तेल १.५वाट्या,तिखट १वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
४५ मिनिटे
४/५ जणांसाठी ( खादाडखाऊ मंडळींसाठी दुप्पट/तिप्पट प्रमाण घ्या!)
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण सोलून वाटून घ्यावा.उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी,व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १ वाटी तिखटातील १/२ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारिक चिरलेले २ कांदे
घालून परतावे,उरलेले १/२ वाटी तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हा खाट वेगळा ठेवावा.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळा खाट वरुन घ्यावा.
दोस्त-सुह्रदां मध्ये बसून पैज लावून खावा.
१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो.पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.
अतिशय महत्त्वाचे:
२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.
ते आमचे "शिक्रेट "आहे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.