कर्ण, भीष्म, द्रोण यांवरील अन्याय..

नमस्कार,


मला नेहमी महाभारताविषयी विविध प्रश्न पडतात. त्यापैकी एक म्हणजे -


धर्मयुद्धातील तीन महारथींचे वध - कर्ण, भीष्म, द्रोण !


या तिघांचाही कृष्णाने आणि पांडवांनी कूटनीतीने, नि:शस्त्र असताना वध केला.


श्रीकृष्ण जरी धर्माच्या बाजूला होते तरी त्यांनी खूपच अधर्माने या तिघांचा वध केला (करविला) असे मी मानतो. जरी हे तिघे अधर्माच्या बाजूने लढत होते, तरी ते आपले जीवित कार्य/कर्तव्य पार पाडीत होते जसे मित्र(कर्ण), कुरुंच्या गादीचे रक्षण(भीष्म - त्यासाठी ते आजन्म ब्रह्मचारी राहिले होते), सेनापती (द्रोण).  हे वध मला श्रीकृष्णांच्या चरित्रावरील डाग वाटतात.

कोळाचे भरीत

वाढणी
२ ते ३ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • एक नारळ
  • एक वांगे(मोठे काळे)
  • गूळ(साधारण एका लिंबाएवढा)
  • चिंच ( एका लिंबाएवढी)
  • एक टेबलस्पून तेल
  • फोडणीचे साहित्य (मोहरी,हिंग,हळद) व २/३ हिरव्या मिरच्या

मार्गदर्शन

एक नारळ खोवून त्याचे दूध काढून घ्यावे. (खोवलेल्या नारळांत वाटीभर कोमट पाणी टाकून मिक्सर मधून काढावा)

सफरचंदाची मिठाई: ऍपल पाय

वाढणी
४/५ जणांसाठी (कसेबसे) पुरेसे

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • ५/६ सफरचंदे,३/४ मेज चमचे साखर(टेबल स्पून),मूठभर बेदाणे
  • १००ग्राम मैदा,६० ग्राम लोणी,६०ग्राम साखर,१चिमूट मीठ
  • १चहाचा चमचा दालचिनी पावडर,बदाम तुकडे १ मूठ

मार्गदर्शन

जर्मनी मध्ये ,त्यात ही हेसन मध्ये सफरचंदे फार..प्रत्येकाच्याच बागेत लगडलेली,भाराने वाकलेली झाडे!(कुंपणात जाऊन तोडण्याच्या कोणी फंदात पडत नसल्याने )त्यामुळे सफरचंदाचे पदार्थ भरपूर!

हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद

हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद 


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.