मामलेदार मिसळ

वाढणी
४/५ जणांसाठी ( खादाडखाऊ मंडळींसाठी दुप्पट/तिप्पट प्रमाण घ्या!)

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,
  • तेल १.५वाट्या,तिखट १वाटी,गरम मसाला ४ चमचे
  • १०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
  • चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

 

पाठांतराचे महत्त्व

सर्वसाधारणपणे शिक्षणाशी संबंधित अशा कुठल्याही विषयावर चर्चा होते त्यावेळी पाठांतर करून मिळवलेले यश हे विद्यार्थ्याच्या क्षमतेचे खरे निदर्शक नाही हा मुद्दा बऱ्याच वेळा मांडला जातो. त्यावरून पाठांतर वाईट अशी सोयीस्कर समजूत आळशी विद्यार्थी व त्यांचे पालक करून घेण्याची शक्यता आहे.

चिरंजीवी चिन्मयीस,

लेखन प्रकार: आत्मसंवाद/ स्वसंवाद (monologue)




चिरंजीवी चिन्मयीस,

 

अनेक आशीर्वाद. काल अनिलाचा फोन आला होता. तिच्याकडून तुझी हालहवाल कळली. तू घर सोडून गेल्याला आठवडा झाला आहे. अनिलाकडे कितीदा फोन केला मी; पण तुला बोलायचंच नाही माझ्याशी आणि आपल्या घरांतले वाद लोकांसमोर सुरू करणे नको वाटते म्हणून मी ही टाळते आहे. मला माहित्ये की आपल्या दोघींच्या मनात वादळ सुरू आहे. परंतु ते न बोलता कसं शमणार? समोरासमोर बसून पूर्वीसारखं बोलणं किती होईल ते ही नाही सांगता येत आणि कुठेतरी आपण दोघींनी संवादातला सहजपणा गमावलाय की काय असा प्रश्न डोक्यात येतो, म्हणूनच हे पत्र लिहायचं ठरवलं आहे.

आता पाळी विठोबाची बडव्यांच्या तावडीतून सुटकेची...

(घुसळलेले लोणी - २९)


कालीभक्तांची पंड्यांच्या तावडीतून सुटका ही बातमी वाचली. न्या. सिरपुरकर यांनी दिलेल्या उच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार पंड्यांना कालिमातेच्या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

व्यर्थ न हो बलिदान

काल सोळा सप्टेंबर, हुतात्मा महावीरसिंग यांची शतकोत्तर द्वितीय जयंती. त्या निमित्त हुतात्मा महावीरसिंग यांना विनम्र अभिवादन.


मोडेन पण वाकणार नाही या लेखात मी त्यांची अल्प अशी माहिती दिली होती. हुतात्मा महावीरसिंग यांनी १२ मे रोजी अंदमान येथे प्राणांतिक उपोषणास आरंभ केला. राजकीय बंदिवानांना मिळणारी चोर-दरोडेखोरांसारखी अपमानास्पद वर्तणूक, वाचायला वर्तमान पत्र न मिळणे, पत्रलेखनाची मुभा नाही, एकमेकांना भेटण्यास व बोलण्यास मनाई, अमानुष छळ, दिले जाणारे दुर्गंधीयुक्त व किडे पडलेले पाणी, अन्नात सापडणाऱ्या आळ्या, अतिशय लहान कोठडी, त्यात अंधार, भिंतींना व जमीनीला ओल, खाली शेवाळ, वर भयानक काम याचा निषेध करण्यासाठी महावीरसिंगांनी प्राणांतिक उपोषणाचा निर्धार जाहीर केला व अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्यासमवेत उपोषणास प्रारंभ केला. १२ मे १९३३ रोजी उपोषण सुरू झाले. १७ मे रोजी जबरदस्तीने दूध पाजून महावीरसिंग यांचे उपोषण मोडण्याच्या प्रयत्नात तुरुंगाधिकारी असताना फुफ्फुसात दूध शिरून महावीरसिंग यांना हौतात्म्य प्राप्त झाले. पाठोपाठ २६ मे रोजी मोहन किशोर नमोदास व २८ मे रोजी मोहित मोइत्रा यांना याच प्रकारे हौतात्म्य लाभले.