आपली भारतीय संस्कृती - पुरूषप्रधान की स्त्रीप्रधान ?

नमस्कार,


मी ययाती, रामायणाचा किंवा महाभारताचा विचार करतो तेंव्हा मला असे वाटते की या युद्धांना बऱ्याच बाबतीत स्त्रियांच्या अभिलाषा कारणीभूत होत्या. त्यावरून मला असे कळते की त्याकाळात स्त्रियांना किती अधिक महत्त्व होते किंवा तो समाज किती 'स्त्रीप्रधान' होता. (जगप्रसिद्ध 'ट्रॉय' युद्धाला देखील एक स्त्री कारणीभूत होती.)

पंखांना आकाश दिसावे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे. "गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणिव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील" आपण सर्वांनी हे विधान बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आणि वाचलेलं आहे.पण या विधनातील मर्म मात्र अजून बऱ्याच  लोकांना कळलेलं दिसत नाही. कदाचित 'अतिपरिचयद् अवज्ञा' अशी या विधानाची गती झाली असावी.

संस्कार म्हणजे नक्की काय?

सध्या आम्ही परदेशात रहात आहोत.आमचा तीन वर्षाचा मुलगा आहे.कालच ओळखीची एक भारतीय स्त्री मला विचारत होती-"तू याला काही रामरक्षा वगैरे शिकवले आहेस का?नाहीतर इथे राहून आपले संस्कार कसे होणार याचा जरा प्रश्नच पडतो नाही?" हे विचारणारी ती लवकरच आई होणार आहे.

कला क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग

          आज हिंदी चित्रपट क्षेत्राचा पसारा प्रचंड वाढलेला दिसतो पण त्यात अभिनयाचे क्षेत्र सोडल्यास इतरत्र स्त्रियांचा सहभाग तुलनेने नगण्य दिसतो असे का?उदाहरणार्थ संगीतकार म्हणून लक्षणीय कामगिरी बजावणारी एकमेव स्त्री उषा खन्ना दिसते.त्यापूर्वी फार पूर्वी सरस्वती या नावाची संगीतदिग्दर्शिका झाल्याचे दिसते.

मी व समस्त मार्जार जमात...म्यॅव म्यॅव

(खालील लिखाण हे समस्त मार्जार प्रेमींची माफी मागून करत आहे.तरी ह. घ्या.)
तसे ही माझे व मांजर ह्या प्राण्याचे हे फार पुर्वी पासूनचे वाकडे आहे. म्हणजे मला फार लहानपणापासूनच मांजराची फार भीती वाटते. ही भीती म्हणजे साधी सुधी भीती नसून "दहशत"म्हणावी इतकी आहे. म्हणजे मांजर जरी १० फुटावर दिसले तरी घशाला कोरड पडणे, हात पाय गार पडणे, पोटात गोळा येणे असले सगळे प्रकार सुरू होतात. खरे तर ही भीती आता परदेशी भाषेतील "फोबिया" या प्रकारात येऊन विसावली आहे.ह्या भीती मागचे कारण शोधायचा प्रयत्न केला असता असा निष्कर्ष निघाला की लहानपणापासून जितके भयपट बघितले त्या सर्व चित्रपटात मांजर हे नेहमीच भुताचे प्रतीक म्हणून दाखवण्यात येत असे.त्यामुळे मांजर आणी भुताचे फार जवळचे नाते आहे असे डोक्यात फार घट्ट बसले आहे.तसेच अजून एक कारण म्हणजे लहानपणी ज्या वसतीग्रहात रहात होते तेथे मांजरा संबंधीच्या अफवा रोज जन्माला येत जसे एक बोलणारे मांजर आहे.ते रात्री आपल्याला एकटे गाठून आपल्याशी गप्पा मारते..एक ना दोन अश्या अनेक गोष्टी ऐकत आम्ही मोठ्या झालो.

कॉलेज मधला किस्सा

साधारण ५ वर्षांपूर्वीची घटना आहे..


नुकतीच बारावी पास होऊन (चांगल्या मार्क्सनी) मी विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता.. सगळ्या विषयांमध्ये (रसायनशास्त्र सोडून) चांगले गुण मिळाले होते.. नाहीतरी रसायनशास्त्र हा तसा नावडता विषय.. अगदी काठावर उत्तीर्ण व्हायचो..

ती

तिची माझी मैत्री खूप जुनी. अगदी लहानपणापासूनची. एकत्रच खेळ, अभ्यास, शाळा. लहानपणाची लटकी भांडणं, लपंडाव, उन्हाळ्याच्या सुट्टीत कैर्‍या, चिंचा खाणं सगळं तिच्या साथीनं झालेलं. मग का कुणास ठाऊक, कॉलेज सुरू झाल्यावर संपर्क कमी झाला. भेट व्हायची, पण आधीसारखी जवळीक राहिली नाही. पीएचडी संपल्यानंतर कामासाठी इथे इटलीत आलो आणि संपर्क जवळजवळ तुटलाच.