वाणी शुद्ध असणे म्हणजे नक्की काय?
वाईट, खोटे न बोलणाऱ्यास, मधुर भाष्य ठेवणाऱ्यास, वाणी स्वच्छ ठेवणाऱ्यास वाचा सिध्दी प्राप्त होते असे म्हणतात..
सर्वसामान्य माणसाला व्यहारात राहून वाणी शुद्ध ठेवता येईल का? असेल तर कसे?
दिवसातून आपण किती वेळा खोट बोललो, ते का बोललो, खोट बोलणे कमी करता येईल का? ह्याचा विचार किती जणांनी केला?
काहीच्या मते खोट बोलणे हे पाप आहे तर काही त्याला कला मानतात.
काहीच्या मते खोट बोलणे हा व्यवसायाचा भाग आहे तर काही जण जरूर असेल तर खोटे बोलण्याचा आधार घेतात.
आपल्या वाणीची काळजी कोण व कशी घेता यावर आपली मते मांडावीत.