साखर बुडेल एवढेच पाणी घेऊन गॅसवर पाक करत ठेवणे. हा पाक एकतारी करणे. त्याचवेळी एकीकडे नारळाचा खव तूपात व दुधात थोडा परतणे. दूध व तूप अशासाठी की वड्या मऊसूत होतात आणि तोंडात टाकल्या की लगेच विरघळतात. एकतारी पाक झाला की लगेच गॅस बंद करून परतलेला नारळाचा खव त्यात घालून चांगळे घोटून घेणे. नंतर हे गरम मिश्रण एका ताटामध्ये ओतून वरून हाताने थापून एकसारखे सपाट करणे. ताटाला आधीच थोडा तूपाचा हात फिरवून घेणे. थापताना पण वरून प्लॅस्टीकचा कागद ठेवून थापणे म्हणजे एकसारखे थापले जाईल व हाताला गरम लागणार नाही.
हे मिश्रण खूप गार झाले की कालथ्याच्या टोकाने किंवा सुरीने एकसारख्या वड्या कापणे. १ वाटीमध्ये लहान १०-१२ वड्या होतात. ह्या वड्या मी स्वादच्या कोकनट पावडरच्या केल्या आहेत.
रवा लाडूमध्ये श्री पेठकर ह्यांनी पाक कसा करावा याची सविस्तर माहीती दिली आहे ती अनुसरून पाक करणे. मी पण तसेच केले. पाकाच्या सविस्तर माहितीसाठी इथे पाहा.
रोहिणी
ह्या वड्या उपासाला चालतात. पाहुण्यांना चहाला बोलावले असल्यास पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर किंवा उपास असेल तर तळून केलेल्या बटाट्याच्या चिवड्याबरोबर खावयास देणे. कोणाच्या घरी खाऊ म्हणून न्यायला ह्या वड्या छान दिसतात. बाहेर किती दिवस टिकतात माहीत नाही.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.