महाराष्ट्राचे दैवत नक्की कोणते? आपण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो,त्याचबरोबर पंढरपुरचा विठ्ठलाला तर संपुर्ण महाराष्ट्र दैवत मानतो. विठ्ठलाची महती तर थोर संतांनी आपल्या वाडमयतुन सांगितली आहे.येत्या काही दिवसात गणपतीचे आगमन होईल तेव्हा संपुर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव जोशात साजरा करेल. त्याचबरोबरोबर ज्योतिबा,काळूबाई या दैवतांच्या जत्रा होतात त्यांनाही मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे. शिवाय आणखी बरीच दैवते आहेत पण संपुर्ण महाराष्ट्र ज्याला मानतो असे दैवत कोणते. राम,हनुमान,कृष्ण, यांना महाराष्ट्रात दैवत मानले जाते का? याचा जाणकारांनि खुलासा करावा.
आपला
कॉ.विकि