मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
डाळीचे पीठ १ वाटी, ३ चमचे मैदा, वडे तळण्यासाठी तेल
मीठ , साखर चवीपुरते
हळद, हिंग
१ तास
४ जणांना
बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत. ( कांदा व इतर मसाला अजिबात तेलात परतून घ्यायचा नाही, कारण वडे तेलकट होतात शिवाय लसूण,मिरच्या मिक्सरमधुन बारीक करायचे नाही).
डाळीचे पीठ भिजवताना त्यात थोडा मैदा, चवीप्रमाणे तिखट,मीठ घालणे, शिवाय थोडी हळद व हिंग घालणे. बारीक चिरलेली कोथिंबिर आठवणीने घालणे. (गरम केलेले तेल डाळीच्या पिठामधे अजिबात घालायचे नाही, त्यामुळे वडे तेलकट होतात.)
नेहमीप्रमाणे वडे तळणे.
नाहीत.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.