' चहा '

 एक वर्ग ' चहा प्या ' म्हणणारा आहे. चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते, असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते , असे त्या वर्गाकडून म्हटले जाते !

     दुसरा वर्ग ' चहा कधीही पिऊ नये ' म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले (-काही नुकसान झाले नसल्याचा , अनुभव पाठीशी असला तरीही ! ) ' , असे सांगतात !

     सामान्य माणूस जास्त खोलात न जाता , ' कुणी काहीही म्हणो, मी चहा पिणार '- म्हणत ; जमेल तितक्या वेळा चहा पितो . त्याला आरोग्याच्या दृष्टीने अपाय झालेलाही दिसून येत नाही , ही वस्तुस्थिती !

     ' चहा प्यावा ' किंवा ' चहा पिऊ नये ' , अशा संभ्रमावस्थेत काय करावे ?