कावळा

कधी तरी कुठे तरी वाचलेली कथा-


आटपाट नगरात एक गरीब कष्ट्करी कुटुम्ब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे. एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो. आता आई कंबर कसते आणी आपल्या लहानग्यांचे कसेबसे पोट भरायला सुरुवात करते. पण दिवस अजुनच वाईट येतात. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. रोजच्या उपासमारीने एकादिवशी बिचारी दगावते.


आता घरात ३ मुले. मोठा जेमतेम ५ वर्षांचा मधला ३ वर्षांचा आणी लहानगा फ़क्त १ वर्षांचा. मोठा कसेबसे ४ लोकांना जमा करतो आणी आईचे कर्म उरकतो. नंतरचे दिवस खरे परीक्षेचे असतात. लेकरांचे अगदी हालहाल होत्तात. दहाव्या दिवशी कुठुन तरी मुलांचा मामा येतो आणी येतांन बान्धुन मुठ्भर तांदुळ आणतो. मुले आनंदतात, त्याना वाटते आज मामा आला आज चांगले जेवायमला  मिळनार. पण मामा सान्गतो बाळानो आज आईचा १० वा दिवस.


मुले बिचारी २ दिवसांची भुकेली तशीच मामा बरोबर गंगेवर जातात. मामाने भाताचा पिंड करुन कावळा शिवायसाठी ठेवलेला. सगळ्यात लहाना भुकेने पार व्याकुळ झालेला. मोठा मुलगा म्हणतो मामा थोडा भात दे छोटुला. मामा म्हणतो बेटा कावळा शिवुदे. कावळा काही पिंडाला शिवेना.


बराच वेळ होतो लहाना रडुन रडुन अगदी अर्धमेला होतो. अजुन एकदा लहान असेल नसेल त्या ताकदीने जोरात रडायला सुरुवात करतो आणी बेशुध्ध पडायला येतो. मोठया मुलाला रहावत नाही. तो पळत जाउन त्या पिंडामधला एक घास भात लहान्याला भरतो. पुढच्याच क्षणी कावळा त्या उरलेल्या पिंडाला शिवतो.