असे का?

मित्रहो, आपल्या या कट्ट्यावर अनेक विषयांवरच्या, अस्वस्थ करणा-या, दिशा दाखवणा-या, मनोरंजन करणा-या साधकबाधक चर्चा चालतात. पण असे दिसते की काही ठराविक(सुमारे ७ ते ८) लोकच या चर्चांत भाग घेतात. अनेक लोकांना या कट्ट्याची माहिती नाही असे दिसते.असे का?


या कट्ट्याची सदस्यसंख्या किती? ती वाढविण्यासाठी काय करता येईल? या सुंदर कट्ट्याची माहिती अधिकाधिक लोकांना करुन देणे हे सभासदांचे कर्तव्य नाही काय?


या हेतुनेच प्रत्येक  सभासदाने आपल्या जवळच्या किमान ५ मित्रांना तरी या कट्ट्याची माहिती सांगावी असे मी सुचवितो.  आपले याबाबतीत मत काय आहे?


 


आपला विश्वासु


एक वात्रट