रात्रीचा गिरनार ट्रेक

हिवाळ्यात जुनागड जवळच्या गिरनार पर्वता वर जायचे ठरले आणि मी लगेच होकार दिला . ठरल्या प्रमाणे ५ जानेवारी २०१८ ला रात्री ९:४५ च्या वेरावल एक्स्प्रेस ने जुनागड ला प्रवासासाठी मी न्यायते सर, शुभदा न्यायाते, सीमा केतकर, खोले सर, प्रसाद सर्वटे, स्वाती फडणीस आणि डी. आर. पाटील सर असे आठ जण जमणार होतो. मी आणि पाटील सर स्टेशन वर दोन तास आधी पोचलो होतो, बहुतेक सर्व जण ओफीस मधून थेट मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशन वर येणार होतो ,आम्ही रेल्वे स्टेशन वर थोडा चहा-नाश्ता घेतला. गाडी अगदी वेळेवर सुटली. ट्रेनने बोरीवली स्टेशन सोडल्यावर आम्ही जेवणाचे डबे सोडले.

डॉ. निरुपमा भावे यांचे अभिनंदन

डॉ.निरुपमा भावे यांचे अभिनंदन

पुण्यातील एक महिला, डॉ.निरुपमा भावे व त्यांचा सायकल ग्रुप १९ डिसेंबरला पुण्याहून सायकलवर बसून निघाला आणि तो ३ जानेवारीला कन्याकुमारीला पोहोचला!  डॉ.भावे ह्या गणित विषयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत. ३ जानेवारीला त्यांना ७० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या सायकल ग्रुपने त्यांचा हा सत्तरावा वाढदिवस कन्याकुमारीला साजरा केला. डॉ.निरुपमा भावे व त्यांच्या ग्रुपचे ह्या विक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन!!

चिंता करी जो विश्वाची ... (३१)

श्री समर्थ रामदास स्वामींनी अतिशय सोप्या भाषेत,  धर्मग्रंथात बंदिस्त असलेले ज्ञान सर्वसामान्य जनलोकांपर्यंत पोहोचविण्याचा  प्रयत्न चालविला होता. स्वतःची बुद्धिमत्ता,  धर्मग्रंथांच्या वाचन, परिशीलनाने  आलेली प्रगल्भ जाण आणि अखंड प्रवास, जनसंपर्काने आलेले समृद्ध अनुभव यांचा वापर करीत ते सामान्य जनांस उपदेश देत असत.  

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

ग्रेसच्या कविता अत्यंत गूढ तरीही मनाला मोहवणाऱ्या असतात. केवळ दुर्बोध म्हणून ग्रेसची कविता कितीही नाकारली तरी मन पुन्हा पुन्हा तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत राहतं. कारण सगळीच कविता एकतर दुर्बोध नसते, तिच्यातल्या काही ओळी नाही म्हटलं तरी मनाला भिडतातच आणि ग्रेसचे शब्द ज्या रंगांची आणि रूपकांची उधळण करतात ते शब्द आपणही अनुभवावे अशी ओढ हरेक संवेदनाशील मनाला हमखास लागते. ग्रेसचे शब्द नादमय तर आहेतच, ते लयीशी कमालीची एकरूपता साधतात आणि ग्रेसनी स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी जणू स्वतःची स्वतंत्र भाषानिर्मिती केल्याप्रमाणे ते त्याच्या अनुभवाचा दिलखुलास पसारा मांडतात.

इतिकर्तव्य

वा! लागले वाटतं दिवे आज. आता हा कंदील अगदी छान शोभून दिसतोय
इथे. त्या दिव्याच्या प्रकाशात काय छान चमचम करतोय. आवडला बुवा आपल्याला.
ह्या जागेचं अगदी रूपच पालटून टाकलं ह्या कंदिलानं. चिमानं कुठून आणला
तोंडात धरून कुणास ठाऊक. पण अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर आला हा कंदील
इथे.

कृष्णमूर्ती : अकर्त्याचा शोध !

जे.  कृष्णमूर्तींना नक्की काय म्हणायच होतं हे समजलेला कुणी भेटणं दुरापास्त आहे. तरीही वैभव संपन्न आणि बुद्धिमान अशा इथल्या आणि विदेशातल्या उच्चभ्रू लोकात कृष्णमूर्तींचा दबदबा होता हे नक्की.  जेके प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, विचारणाऱ्यालाच प्रतिप्रश्न करत जायचे आणि एका क्षणी विचारणारा निरुत्तर होऊन जायचा. मनाचा निरास  करणारी ही पद्धत साधकांना उपयोगी ठरू शकली नाही कारण वैचारिक गुंत्यातून मुक्त होण्याऐवजी साधक नव्या प्रश्नावलीत सापडायचे. वास्तविकात प्रश्नाला थेट उत्तर देणं मनाच्या निस्सरणाला उपयोगी ठरतं.  

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

रूम नंबर नऊ (गूढकथा)

आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या "लाईफ वेलनेस सेमिनार" चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – "तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका.

चिंता करी जो विश्वाची ... (३०)

श्री रामदास स्वामींनी ज्ञानदानाचे व्रत स्वीकारले होते. मोठ्या निष्ठेने ते त्या व्रताचे पालन करीत होते. 

सर्वसामान्य जनांचे अज्ञान दूर करून, त्यांना शहाणपणाच्या, व्यवहारज्ञानाच्या चार गोष्टी सांगून त्यांचे आयुष्य सुकर करणे हे रामदास स्वामींचे उद्दिष्ट्य होते.  त्यांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथात व्यवहार चातुर्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यांचे अनुकरण केल्याने जीवनात उद्भवू शकणारे संभाव्य धोके, अडचणी टाळता येणे शक्य होते.