पश्चात्ताप

वेळ जात नव्हता म्ह्णून मित्राच्या घरी पुस्तक वाचत बसलो होतो. तेव्हढ्यात वहिनींनी हाक मारली "चहा तयार आहे".

पुस्तकात खुणेचा कागद ठेवून मी स्वयंपाकघरात टेबलावर जाऊन बसलो.   चहा घेताना वहिनींची अस्वस्थता जाणवली म्हणून विचारलं "काय झालं वहिनी?? "

डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसत त्या म्हणाल्या, "सांगते पण मला माफ कराल ना"

मला काहीच उमजेना, मी म्हणालो "अगं तुझा नवरा मला मित्र असला तरी भावापेक्षा जास्त प्रिय आहे, निःसंकोचपणे सांग काय ते"

चिंता करी जो विश्वाची ... (२७)

श्री रामदास स्वामींनी सकल विश्वातील मनुष्यजातीचे विभाजन चार विभागात करता येईल असे म्हणले आहे. बद्ध , मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे चार प्रकार त्यांनी दासबोधात सांगितले आहेत. या पैकी ज्यांना बद्ध म्हणता येईल असे लोक अवगुणी अथवा दुर्गुणी असतात आणि म्हणूनच त्यांना सर्वात हीन असे म्हणले आहे. स्वतःच्या बुद्धीचा, कौशल्याचा उपयोग केवळ स्वार्थाकरता करतात. असे करताना अन्य कुणाच्या नुकसानीची, त्रासाची ज्यांना पर्वा वाटत नाही, जे स्वार्थ, विकार आणि वासनांच्या जोखडात अडकलेले असतात, अशा सर्व लोकांना 'बद्ध' असे संबोधिले आहे. 

समाधान

    सकाळी ९.३० ची वेळ. सुलेखाची ऍक्टिवा हायवेवरून धावत होती. ऑफिसला वेळेत पोचायची धडपड करत. शनिवार-रविवारची सुटटी झालेली. त्यामुळे सकाळपासून मनाविरुद्ध शरीर सगळी कामे उरकत होते. आणि शेवटी एकदाची ती निघाली होती. रोजच्याप्रमाणे आजही 'मारावी ह्या नोकरीला लाथ' असा विचार तिच्या मनात येऊन गेला होताच. त्यात आज आहनाच्या शाळेची सहल गेली होती आणि ‘आई, आज तू घ्यायला ये’ असा हट्ट तिने धरला होता. आता हे सगळे गणित कसे जमवायचे हा विचार करतच तिने गाडी पार्क केली. कार्ड स्वाइप करून आत शिरतेय तोच आशिष धावत आला आणि म्हणाला, 'अग लवकर अनुपमाला पिंग कर.

पदवी आणि पात्रता

     नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळ्वणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे असा उल्लेख आहे.

चिंता करी जो विश्वाची ... (२६)

श्री रामदासस्वामींनी ज्ञानदानाचा यज्ञ मांडला होता. ज्ञानोपासनांचे श्रेष्ठत्व ते जनमानसात चित्रित करीत होते. ज्ञान हे सुख-समाधान मिळविण्याचे साधन आहे. तसेच मुक्तीमार्गावरची वाटचाल करण्यास देखिल ज्ञानाची आवश्यकता आहे. अज्ञानी आणि अडाणी मनुष्यास संकटांवर आणि अडचणींवर मात करणे शक्य होत नाही. म्हणून प्रत्येकाने, आपल्या कुवतीनुसार ज्ञानसाधना करणे जरूरीचे आहे असे समर्थ त्यांच्या शिष्यांना आणि श्रोत्यांना सांगत असत.