एका ठिणगीचे अग्नितांडव

मूळकथा :- 
A Spark Neglected Burns the House 
लेखक लिओ  टॉलस्टॉय 
******** 
एक पुराणकथा आहे ---

पाऊस - परत एकदा..

आधी वाचा -

पाऊस. अहाहा! कित्येक वर्षांनी असा योग आला आहे. लांबच लांब रस्ता, एका तालात चालणारी गाडी, गाडीत मी एकटी, कसलीही काळजी नाही, कोणालाही सोबत देण्याचं बंधन नाही, विचारांमध्ये रमायला पुष्कळ मोकळा वेळ, आणि वर हा पाऊस!

चिंता करी जो विश्वाची ... (२९)

समर्थ रामदास स्वामींनी, मनुष्य जातीचे विभाजन हे त्यांच्या गुणावगुणांप्रमाणे चार प्रकारात होते असे म्हणले आहे. जे अवगुणी आहेत, त्यांच्या विकार, दोषात बंदीवान आहेत, अशांना  "बद्ध जन" असे संबोधिले आहे. त्यांच्यात काही बदल घडल्याने अथवा स्वतःच्या दुर्गुणाची जाणीव झाल्याने त्यांना पश्चात्ताप होतो. स्वतःमध्ये काही सुधारणा व्हावी अशी इच्छा जागृत होते. अशा  व्यक्तींना  "मुमुक्ष" असे संबोधिले आहे. मुमुक्ष जेव्हा संतसज्जनांच्या संगतीत राहून ज्ञानसाधनेचा मार्ग अनुसरतात   तेव्हा  त्यांना "साधक" म्हणले जाते .

८४ नाबाद !

    वयाच्या १० व्या वर्षापासून सुरवात करून आपल्या आवाजाची मोहिनीअजूनही रसिकांच्या मनावर चालूच ठेवणाऱ्या आशाताईंचा आज ८४ वा जन्मदिवस (८ सेप्टेंबर १९३३). आजही तितक्याच उत्साहाने त्या गात आहेत.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्च्हा !
  यशाचा हा चढता आलेख सुखासुखी त्यांना लाभला नाही.त्यासाठी अतिशय कठिण परिश्रम व अनेक आपत्तींचा सामना त्यांना करावा लागला.मंगेशकर घराण्याचा वारसा व लतादीदींसारख्या बहिणीचा आधार मिळाला तरी त्याना आपली वाटचाल स्वतंत्रपणेच करावी लागली.

काही सांगीतिक किस्से !

       प्रसिद्ध संगीतज्ञ केशवराव भोळे यांनी संगीतविषयक खूप लिखाण केले आहे .त्यांचा एक लेखसंग्रह "अस्ताई"  मला वाचावयास मिळाला  त्यात त्यांनी त्या कालातील गवयांविषयी अतिशय मार्मिक लिखाण केले आहे.त्यातील  संगीतात रस असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीस आवडलेले काही किस्से मनोगतींनाही आवडतील म्हणून पुढे नमूद केले आहेत.त्यातील बहुतेक ग्वाल्हेर घराण्याविषयीच आहेत.त्यातून गायकांच्या गुणदोषांचे तसेच संस्थानिकांच्या गुणग्राहकतेचेही दर्शन होते.
      अकबर बादशहाच्या काळापासून ग्वाल्हेर शहर संगीताचे माहेरघर होऊन राहिले आहे.