एक तप मनोगतवर !

    मनोगतावर प्रवेश करून नुकतेच  मी एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण करतोय असे माझ्या सदस्यत्वाकडे लक्ष टाकल्यावर दिसते.तसे पहाता मी मनोगत वर पहिले लेखन मी  ०७/०६/२००६ या दिवशी  केले म्हणजे त्या दृष्टीने माझे एक तप पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही पण सदस्य झाल्यापासून दहा महिने मी काहीच लिखाण केले नाही म्हणजे त्यादृष्टीने मी केवळ नावापुरताच सदस्य होतो, कदाचित त्याकालात काही प्रतिसाद मी नोंदवले असतील.पण पहिले लिखाण चर्चेचा प्रस्ताव स्वरुपात केल्यावर त्याला येणारे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटू लागले तत्पूर्वी मी लिखाण केले नव्हते अस

चिंता करी जो विश्वाची ... (२८)

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी,  मनामध्ये काही एक संकल्प धरून दासबोध ग्रंथाची रचना करण्याच्या प्रकल्पाला सुरूवात केली होती. वैराग्यवृत्तीने जगताना, संपादन केलेले ज्ञान आणि अनुभव ते ग्रंथामध्ये अंकीत करीत होते. गोसावी वृत्तीने सर्वसंचार करीत असताना, पाहिलेले, ऐकलेले आणि समजलेले सारे सारे काही ते श्रोत्यांना आणि शिष्यांना सांगत होते. अपेक्षा एकच होती, ऐकणाऱ्याने त्यातून बोध घ्यावा, स्वतःबरोबरच इतरांचेही जीवन सुखी आणि संपन्न करावे.