चित्रं

चित्रं
काही काही चित्रं असतात.. स्वप्नांमधली.. आठवणींमधली.. ती असतात आपल्याबरोबर. नेहमी. त्यांचं असणंही पुरेसं असतं कधी कधी, दिलासा द्यायला, दिशा द्यायला...     
 
रात्री झोपताना असंच एक चित्र हल्ली बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यासमोर येतं...

वार्षिंक परीक्षा

मार्च एप्रिल महिना म्हणजे
परीक्षेचा मोसम. आणि या परीक्षांतली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा म्हणजे
वार्षिक परीक्षा. पहिलं आणि दुसरं महायुद्ध म्हणजेच दहावी आणि बारावी यांना
एक स्वतंत्र प्रकरण लागेल त्यामुळे सध्या आपण फक्त या वार्षिक परीक्षे
बद्दल बोलूया.      
  तीनमाही. सहामाही, नऊमाही अशा लुटुपुटूच्या लढाया झाल्यानंतर
प्रत्येकाला आपल्या मर्दुमकीचा चांगलाच अंदाज आलेला असायचा. आणि मग यायची
वार्षिक परीक्षा.

चिंता करी जो विश्वाची ... (३४)

श्री समर्थांनी  पूर्णब्रह्म आणि मायेच्या सत्य स्वरूपाचे विवरण केले. जे दृश्य आहे ती माया आहे, असत्य आहे. आणि सत्य जे आहे ते अदृश्य आणि निराकार आहे असे समजावले. परंतु श्रोत्यांच्या मनीचे शंकानिरसन काही होईना. जर सगुण मूर्ती स्वरूपात पुजलेले देव म्हणजे माया आहे, तर त्यांची उपासना का करावी?  भजन, पूजन, कीर्तन हे सर्व निरर्थकच म्हणायचे का ? 

म्हणून ते समर्थांना विचारतात ..
जे समस्त नासिवंत । त्यासी भजावे  किंनिमित्य ।
सत्य सांडून असत्य । कोणे भजावे ॥
असत्याचा प्रत्यये आला । तरी मग नेम का लागला ।

कहाणी माझ्या ध.रो.मु. ची

      ("औषध नलगे मजला" नंतर लगेचच हा लेख लिहिण्याची पाळी मजवर यावी हा खरेच दैवदुर्विलासच)
      पूर्वी रोगांच्या साथी यायच्या. आठवा १८९८ चा प्लेग ! त्यात केचळ भारतीय जनताच नाही तर एका ब्रिटिश अधिकाऱ्यासही बळी पडावे लागले होते.(अर्थात ते प्लेगमुळे नाही ) साथी आजही येत नाहीत असे नाही पण त्यावेळी त्यात मरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असायची. कारण आजच्या इतके प्रभावी उपचार तेव्हां नव्हते आणि दक्षता घेणारी शासकीय यंत्रणा तर नव्हतीच.