स्वप्न झाली मोठी

      सुरुवात होते ती 'उच्च शिक्षण' ह्या गोंडस कारणानं. ज्या वयात अभ्यासाचं महत्त्वही कळलेलं नसतं त्या वयात त्या विद्यार्थ्याच्या मनात उच्च शिक्षणाची तीव्र इच्छा पैदा होते. भोळे भाबडे बनून वागणारे पालक आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणाच्या उच्च स्वप्नामध्ये आडकाठी करताना मी तरी अजून बघितलेले नाहीत. सोबतीला शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका आहेतच. हे सर्व पूर्ण जोर लावून त्या विद्यार्थ्याला फिरंगी देशात पाठवूनच थांबतात.

चिंता करी जो विश्वाची ... (२२)

प्रचीतीविणें बोलणे व्यर्थ वाया । विवेकेविणें सर्वही दंभ जाया । 

बहू सज्जला नेटका साज केला । विचारेविणें सर्वही व्यर्थ गेला ॥

साक्षी पिंपळ

(1)    
      मारुतीचं देऊळ. देवळाच्या दाराशी उजव्या हाताला गोल ऐसपैस पार.
    पाराच्या मध्यात पोक्त पिंपळाचं झाड... मस्त डेरेदार आकाराचं... गावच्या पाटलाप्रमाणं चारी अंगांनं पोसलेलं.
        ढळत्या दिवसाला निरोप देणारी सांज. काहिली निमवणरी हवा. अजून काहीशी गरमच, पण ती गरमी सुसह्य वाटणारी.
    हवेच्या हिंदोळ्यावर सळसळणारी पिंपळपानं.
    मधूनच झाडाचा निरोप घेऊन मातीशी समर्पित करून घेणारी, गरगरत खाली येणारी जून पिवळट होऊ लागलेली पानं.

चिंता करी जो विश्वाची ... (२१)

श्री समर्थ रामदास स्वामीं ज्ञानदानाचे पुण्यकर्म अखंडित आचरत होते. जनसामान्याचे अज्ञान,  त्यापोटी निपजलेला अंधविश्वास आणि अनाचार यांचा विनाश व्हावा, हीच त्यांची तळमळ होती. अत्यंत निःस्वार्थ आणि विरागी वृत्तीने ते हे कार्य करीत होते. 

संसारचक्रात गुंतून अनेक दुःख चिंतांचे भारवाही झालेले जन त्यांना पाहवत नव्हते. त्यांना मुक्ती मार्गाची दिशा गवसावी म्हणून गूढ आणि क्लिष्टं  असे ब्रम्हज्ञान त्यांनी सोप्या, जनसामान्यांच्या भाषेत रूपांतरित केले. 

गरज सकारात्मक विचारसरणीच्या 'खुल्या खिडकी'ची

गरज सकारात्मक विचारसरणीच्या 'खुल्या खिडकी'ची

जून २०१५ मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी श्री. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीची घोषणा
करण्यात आली. चौहान आणि  एफटीआयआय सोसायटीवरील संघ परिवाराशी संबंधित
असलेल्या चार व्यक्तींना हटवण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी संप पुकारला.
तब्बल १३९ दिवस चाललेल्या या संपाच्या काळात चौहान आणि केंद्र सरकारवर
प्रचंड टीका झाली. चौहान यांना पदावरून दूर करण्याबद्दल निर्णय होत
नसल्यामुळे ऑक्टोबर २०१५ मध्ये विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला.