श्री रामदास स्वामी ईश्वरभक्तीची महती वर्णन करतात. ईश्वरभक्तीने अनेकांना संकटातून सुखरूप तारले आहे. देव भक्तीच्या बळावर, भक्तांनी अनेक दिव्य, भव्य कार्ये या पृथ्वीतलावर घडवून आणली आहेत. भक्ती सामर्थ्याची प्रचिती भक्तांना घडोघडी येतच असते असे समर्थ सांगतात. अशा सदभक्तांसाठी देव सुद्धा पुनः पुन्हा वेगवेगळे अवतार धारण करून या धरित्रीवर वावरतात. भक्तांच्या संकटकाळी साहाय्य करतात. म्हणून भक्तीचा महिमा थोर असाच आहे.
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥