व्हेंटिलेटर - गणपती बाप्पा मोरया!

मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत, मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे, मराठी चित्रपटांत नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत, मराठी चित्रपट आता १०० कोटींचा उंबरा ओलांडायला सिद्ध झाले आहेत असा गोंगाट गेल्या काही वर्षांत वाढत चालला आहे. गेल्या वर्षी ओळीने पाचसहा मराठी चित्रपट पाहून मी खचलो आणि मुकाट बसलो. या वर्षी आतापर्यंत संयम बाळगला.
पण 'व्हेंटिलेटर' बघायला हवा अशी कुजबूज मित्रमंडळींच्या टोळक्यात व्हायला लागली नि माझा संयम डळमळायला सुरुवात झाली. अखेर सकाळी नऊ वाजताचा शो सस्त्यात आहे हे पाहून तो पकडला.

गुरूः स्टोरीज ऑफ इंडियाज लीडिंग बाबाज

'गुरू' ही संकल्पना पौर्वात्य. पाश्चिमात्य संस्कृतीतल्या 'टीचर' किंवा 'मास्टर' या शब्दांच्या मधली, आणि त्यात 'माता-पिता' ही जोडी मिसळलेली अशी ही संकल्पना.
आणि ही संकल्पना तर आपली आहेच, पण ती प्रत्यक्षात उतरवताना तर आपण अगदी उत्साहाने फसफसायला लागतो. आपल्याकडे गुरूंचे ('बाबा' वा 'मा/अम्मा' हे शब्द गरजेप्रमाणे वापरावेत) प्रकार नि संख्या तरी किती?! आठवड्याला एक गुरू केला तरी शंभरी गाठेपर्यंत निम्मा स्टॉकदेखिल संपणार नाही!
गाव-शहर पातळीवरचे लोकल गुरूमंडळी सोडली तरी राज्य-राष्ट्र पातळीवर सुद्धा गुरूंची रेलचेल आहे. जागतिकीकरणामुळे तर हे पीक अजूनच जोमाने वाढताना दिसते आहे.

सजग नागरिक मंचाची दशकपूर्ती

'सजग नागरिक मंच' या संघटनेचे नाव सातत्याने वाचनात येत असते. पुण्यातील अनेक प्रश्नांवर या संघटनेने घेतलेली भूमिका कधी अभिनिवेशी वाटलेली नाही. विवेक वेलणकर आणि जुगल राठी ही दोन प्रमुख नावे या संघटनेशी निगडित आहेत. माहिती अधिकारात विविध माहिती बाहेर काढण्यात आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यात वेलणकरांचा हातखंडा.
वृत्तपत्रात 'आजचे कार्यक्रम'मध्ये सजग चा दशकपूर्ती सोहळ्याची माहिती होती. प्रमुख वक्ते निवृत्त सरकारी कर्मचारी माधव गोडबोले आणि अध्यक्ष अण्णा हजारे. वेलणकरांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन.

चिंता करी जो विश्वाची ... (१६)

श्री समर्थांचा ज्ञानबोधयाग अखंड कार्यरत होता. समर्थ त्यात नित्य नवीन विचारांच्या समिधा अर्पित करून त्याची धग अखंड जोपासत होते. सामान्य जनांचे जीवन अधिक सुखी, अधिक समृद्ध व्हावे ही त्यांची तळमळ होती. श्रोते आणि शिष्यगणांना ते  उत्तम प्रतिचे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते. मृत्युभयाने निराश झालेल्यांना ते सांगत, जीवनाच्या शेवटी मृत्यूला सामोरे जायचे हे तर वास्तव आहेच. पण त्या अटळ मृत्यूच्या भीतीने आयुष्याचा सर्वोतोपरी उपभोग घेऊ नये असं तर नाही ना? असे करणे हा त्या देवाचा अपमानच .

नारखेडेची नखे

उजव्या हातात नेलकटर हल्ला करण्याच्या तयारीत तर्जनीच्या मधल्या भागात आणि अंगठ्यात पकडून नारखेडेने उलटा हात करून डाव्या हाताची तर्जनी अशी काही पुढे धरली, की तो जर मतदान केंद्रात असता, तर मागचा पुढचा विचार न करता तिथल्या क्लार्कने त्याच्या हातावर मतदान केल्याची शाई लावली असती.
त्या आधी नारखेडे नखाने नाक खाजवत होता. त्याच्या गोर्यापान चेहर्यावर असणार्या गोर्यापान नाकावर खाजविल्यामुळे लालिमा आला होता. त्यातच डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या जास्त न वाढलेल्या नखाने त्याच्या नाकावर एक ओरखडा पडला. निलिमा त्याच्यी मुलगी, समोर बसली होती ती ओरडली.
"नाना नाकाला नख नागलं"

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - पुस्तकातील पुस्तक

कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते.

अरे हृदया आहे अवघड

बिच्चारे मजरूह सुलतानपुरी! "ऐ दिल है मुष्किल... " लिहिताना त्यांना वाटलेही नसेल की साठ वर्षांनी हे  धृवपद नॉस्ट्राडॅमसच्या भाकितासारखे खरे ठरायला घेईल म्हणून!!
करण जोहर (केजो) हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून आवडणे, सहन करणे वा दुर्लक्ष करणे या तीन प्रतिक्रिया प्रकारांत प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे कुठेतरी बसवता येतो. खुद्द केजोलाही आपण कुणी मोठे आणि महत्त्वाचे दिग्दर्शक आहोत असे वाटत नसावे (अशी आशा आहे). दिग्दर्शकापेक्षा तो निर्माता म्हणून खूपच बरे चित्रपट देतो (काल, दोस्ताना, वेक अप सिड आदि). असो.