काही मूलभूत सत्ये
- मराठीच ऱ्हास होत आहे ही ओरड कित्येक वर्ष सुरू आहे.
- जगात अनेक भाषांचा असाच ऱ्हास होत आहे व त्याबद्दल ओरडही अशीच आहे.
- अनेक वर्षांच्या वैचारिक हस्तमैथुनाने (Intellectual masturbation) ने हा प्रश्न सुटलेला नाही.
- आर्थिक लाभ असेल तिकडे पळणे ही संस्कृती निदान गेल्या पन्नास वर्षात पूर्व आणि पश्चिम देशात वाढीस लागली आहे.
काही उपाय
- मराठी येत असल्यास (मराठी माणसास नव्हे) कामगारास २-५% पगार जास्त देऊ असे धोरण खाजगी मराठी उद्योजकांनी पाळावे.
- मराठीत सेवा मागितल्यास प्राधान्य देण्यात येईल अशा पाट्या सर्व खाजगी व्यवसायात लावाव्यात व अमलात आणाव्यात.
- मराठीत बोलल्यास वेटर, रिक्शावाला, धोबी, भाजीवाला, दूधवाला इ. लोकांना ५% टीप द्यायचा पायंडा पाडावा.
- मराठी बोलणाऱ्या व्यक्तीस बिलमध्ये २% सूट मिळेल अशा पाट्या खाजगी इस्पितळे, वकील, ट्रॅव्हल एजंट्स, इ. लावाव्या व ते धोरण पाळावे.
- थोडक्यात समाजाच्या प्रत्येक थरात भाषा आणि आर्थिक लाभ यांची सांगड घालावी.
- अमराठी माणसाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे काम अगदी प्रेमाने व त्वरित करावे उदा. आरक्षण नसताना हॉटेल मध्ये वगैरे टेबल देणे.
- शुद्ध मराठीत लिहिणाऱ्या वृत्तपत्रांना मधून मधून भरघोस देणग्या द्याव्या (प्रत्येकी दहा रु. दिल्यासही खूप होतात) व जाहीर सत्कार करावे.
- अमराठी लोकांना मराठी भूमीत मराठी होण्यास योग्या वातावरण निर्माण करावे.
जाता जाता
- आपल्या हातात कुठलीही आर्थिक प्रलोभने नसतील तर गप्प बसावे.
- मारून मुटकून जबरदस्ती केल्यास भाषेविषयी तिरस्कार पसरतो.
- हे शासनाचे काम आहे असे वाटत असेल तर भाषेचा ऱ्हास अटळ आहे हे मान्य करावे.
- अजूनही "लाभ व भाषा" हे नाते चुकीचे आहे असे वाटत असेल तर देशाटन करावे.
- सगळ्यात महत्त्वाचे आपली भाषा समृद्ध व इतर भाषांपेक्षा श्रेष्ठ वगैरे भ्रम असल्यास, डार्विन वाचावा.
मनकवडा
(व्यक्तिगत रोख वाटलेला काही भाग वगळला : प्रशासक)