कोटीच्या-कोटी - भाग-४


                            कोटीच्या कोटी- भाग-४


  * शेजारच्या बाबुरावांना पायजाम्यात नाडा घालणे जमले नाही, की तो पायजामा बायकोच्या हाती देऊन " मी नाडी-परीक्षेत आज पुन्हा नापास झालो" असे म्हणतात.
                       *********
  * दूरदर्शन वरील कार्यक्रमांचा दर्जा बघुन, 'सुचना व प्रसारण'  खात्याचे नाव बदलून ते 'सुचेना प्रसारण खाते' करावे असे माझा एक मित्र नेहमी म्हणतो.
                       *********
  * नातेवाईकांच्या घरी रात्री खूप डास चावल्यावर, रावसाहेब सकाळी उठुन, 'मला काल रात्री सार्थ डास-बोध झाला' असे म्हणतात.
                       *********
  *आमच्या कार्यालयात कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ आहेत, कामात अतिशय 'थंड'!- माझा मित्र त्यांना, "हे खऱ्या अर्थाने 'कुल'कर्णी आहेत असे म्हणतो.
                       *********
  * न कळणाऱ्या गझलेला 'पझल' का म्हणु नये?
                       *********
  * माझ्या एका मैत्रीणीच्या नवऱ्याचे नाव अविनाश आहे, त्यामुळे आम्ही तिला, "त्याच्या सहवासातील प्रत्येक क्षण तुझ्यासाठी 'अवि-स्मरणीय'च असेल असे म्हणत असतो.
                       *********
  * 'बांगला देश' च्या विरुद्ध कोणीही कितीही शतके ठोका, किंवा त्यांना कितीही मोठ्या फरकाने कितीही वेळ हरवा; त्यांची बिचाऱ्यांची अजिबात तक्रार नसते- त्यांना खरे तर 'बांगला देश' ऐवजी 'चांगला देश'च का म्हणु नये?
                       *********
 * पर्यावरणावरील एका घरगुती, पण गंभीर चर्चेत आमच्या आत्याने' " पर्यावरण जरा बाजुला ठेवा,आधी पिठल्याला पर्याय म्हणुन वरण चालेल का, ते सांगा; कारण घरात बेसन नाहीये " असे म्हणून एकच खस-खस पिकवली.
                      *********
 *केंद्र सरकारची 'इंदिरा आवास योजना'- किती सार्थ नाव आहे, नाही? नेहमीप्रमाणेच सगळे अधिकारी 'आ वासुन 'उभे... ; माझा हिस्सा मला कधी मिळतो ह्याची वाट पहात!...आणि आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तिचे संक्षिप्त नाव 'झोपु' आहे, ते काय चुकीचे आहे?( झोपु सदाच आम्ही, तैसा ठराव आहे!)
                      *********
  *माझ्या मित्राचे वडील, आणि दोन आत्या बरेच वर्षांनी एका घरगुती कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.कार्यक्रमात त्य तिघांचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला; आणि तिघांनाही डायबिटीज असल्यामुळे त्या फोटोला अल्बम मधे 'विलोपले मधुमेहात ह्या' असे सार्थ शीर्षक देण्यात आले.
                      *********


 * अर्थाचा अनर्थ-(घेरी आणून पाडणारा) - सेवा-निवृत्तीनंतर साहेबांच्या निरोप समारंभात त्यांच्याच कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्यांच्या भाषणात म्हणाल्या," साहेबांचा स्वभाव खूपच मनमिळाऊ....खरे सांगते, साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले हे मला कळले सुद्धा नाही"...सगळीकडे एकच हशा झाल..बाई बुचकाळ्यात पडल्या..साहेबही पडले,पण घेरी येऊन!.
                    *********


 * केंद्रातील सत्ताधारी पक्ष्याच्या एका भूतपूर्व अध्यक्ष्यांचे नाव सीताराम केसरी होते. अजिबात धर्म-निरपेक्ष नाव नसलेले - (कारण नावात 'सीता' 'राम' आणि 'केसरी' हे सर्व आहे), हे गृहस्थ त्या पक्ष्याला अध्यक्ष म्हणुन कसे काय चालले कुणास ठाऊक?


                   **********
                                              -मानस६