आपण गूळ विसरलो काय?

ऊस आंदोलनावरून मनात विचार आला की आपण गूळ खाणे का सोडले आहे?

ग़ूळाचे उपयोग:

१) पाहूण्यास गूळ व शेंगदाणे देत

२)ग़ूळ खोबरे नैवैद्य म्हणून

३) वरणात उपयोग

४)ग़ुजराती जेवणात शेवटी गूळ देतात

५) गुळांबा करण्यासाठी वगैरे

परंतु हल्ली आपण गूळ खाण्याचे का सोडले आहे? हल्ली सर्व तिखट पदार्थ जसे वडा पाव,सामोसे वगैरे खातात.

राष्ट्राध्यक्षा ?

  रविवारच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये श्री‍ जुग‌ सरैया यानी ` राष्ट्रपती,पत्नी ऑर वो ` या शीर्षकाखाली  श्रीमती पाटील या राष्ट्रपतीपदावर नियुक्त झाल्यास त्याना कोणत्या प्रकारे संबोधावे याविषयी बरेच काही लिहून राष्ट्रपत्नी , राष्ट्रमाता असे काही पर्याय देऊन स्वत: च ते पर्याय कसे अयोग्य आहेत असे दाखवले आहे. ते वाचून असे वाटले की `प्रेसिडेंट` या शब्दाला ` राष्ट्राध्यक्ष ` हा आणखी एक पर्याय आहे आणि स्त्री राष्ट्राध्यक्ष झाल्यास तिला "राष्ट्राध्यक्षा" असे संबोधता येईल ही गोष्ट त्यांच्या का लक्षात येऊ नये ? श्री‌. सरैया यानी पुढे जाऊन श्रीमती हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा झाल्यास त्याना मिसेस प्रेसिडेंट्रिक्स म्हणावे लागेल असाही मुद्दा उपस्थित केला आहे.  

मराठी बाणा

 मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारे बरेचसे लिखाण मी रात्री झोपण्यापूर्वी उशीरापर्यंत आंतर्जालावर वाचत बसलो होतो. तेच विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मला एकदम एक बारीकसा साक्षात्कार झाला. हल्ली झाडाखाली मांडी घालून बसून ध्यान धरून निवांतपणे बसण्याची फारशी सोय राहिलेली  नसल्यामुळे मला गादीवर पडल्या पडल्याच लहानसे साक्षात्कार होऊ लागले आहेत. तसा त्या वेळी झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे मुख्य कारण काय असावे ते माझ्या लक्षात आले.  आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती  सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात  करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपल्या जीवनात येऊन आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे. तेंव्हा 'मूले कुठारः ' (मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण बहुधा चालत असावे) घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.

मराठीत नवीन संकेतस्थळ

मराठीत नवीन संकेतस्थळसर्व मनोगतींसाठी नवी माहिती. मराठीत सध्या दैनिकांची वगळता रोजच्या रोज अद्ययावत होणारी व वैविध्यपूर्ण माहिती देणारी संकेतस्थळे फार कमी आहेत. मात्र आता http://marathi.webdunia.com/ हे एक नवे संकेतस्थळ नुकतेच मराठी विश्वात दाखल झाले आहे. व्यावसायिक विचार त्यात जास्त केलेला दिसतो. त्यामुळे संकेतस्थळावर आलेला वाचक सुटू नये यासाठी अनेक बाबींची योजना केलेली दिसते. अगदी बातम्यांपासून ते आरोग्य, सौंदर्य, साहित्य या विषयांबरोबरच ज्योतिष, फेंगशुई आणि बॉलीवूड हे विषयही त्यात दिसताहेत. मराठी चित्रपटांचाही त्यात एक भाग आहे.

हसा पण लठ्ठ होऊ नका

"तिसरी ईयत्तेचा वर्ग भरला होता. बाईनी मुलाना विचारले.

" मुलानो ( मुली आणि मुलगे ) तुम्हाला मोठे झाल्यावर काय व्हायला आवडेल. मानसी म्हणाली. " मी डॉक्टर होणार. राजेश म्हणाला. " मी पायलट होणार "

चिंटी म्हणाली. " मी चांगली आई होणार "

बाईनी गोट्याला विचारले. " गोट्या तू कोण होणार. "

मस्कतमध्ये 'गोनू' वादळ - २

जेवण झाल्यावर मी तिथेच झोपावे असा मित्राचा आग्रह होता. पण म्हंटले, 'प्रयत्न करून पाहतो. जमल्यास पोहचीन घरी. नाहीतर येईन इथेच झोपायला.' खाली जाऊन पावसात भिजत धावत-धावत गाडीजवळ पोहोचलो. गाडीत बसून किल्ली लावली. पण गाडी मख्खासारखी ढ्ढीम्म बसून राहीली. मनात धस्स झाले. दिवे तपासले तर दिव्यांची कळ तशीच सुरू होती. गाडीची बॅटरी, कोल्डरुम मध्ये ठेवलेल्या प्रेतासारखी, निश्चल झाली होती.

शिवाजी

सौजन्य:(सकाळ पेपर )

शिवाजी द बॉस! 
दक्षिण भारताला सध्या ज्वर चढला आहे तो "शिवाजी'चा! तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश ही चारही राज्ये "शिवाजी' अवतीर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुपरहिरो रजनीकांत याचा "शिवाजी' हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत असून, दक्षिण भारतात हा "मेगा इव्हेंट' ठरणार आहे. लोकप्रियता आणि यश याचा आपला मापदंड म्हणजे अमिताभ बच्चन. बच्चन यांच्या चित्रपट क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल कसलीच शंका नाही; परंतु अमिताभपेक्षा सहा-सात वर्षांनीच लहान असलेल्या रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड या अभिनेत्याने गाठलेले यशाचे उच्चांक अनेकांना दिग्मूढ करतात. तमिळनाडूवर जणू काही राज्य करणारा हा मराठी माणूस आशियातील क्रमांक दोनचा महागडा नायक समजला जातो. काहींच्या मते फक्त जॅकी चेन हा एकमेव नट रजनीकांतपेक्षा अधिक बिदागी घेत असेल. शिवाजी चित्रपटासाठी त्याला २५ कोटींहून अधिक रक्कम मिळेल, असे म्हटले जाते. चित्रपट पहिल्या दोन-तीन आठवड्यांतच साठ कोटींहून अधिक कमाई करणार असल्याचा निर्मात्यांचा अंदाज असल्याने त्यांच्या मते ही रक्कम फारशी जास्त नाही. रजनीकांतची कमाई वा त्याची अफाट (अफाट हा शब्दही कमी पडावा) लोकप्रियता या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी दक्षिण भारतातील प्रादेशिक चित्रपटांचे बजेट ३०-४० कोटींच्या घरात जाऊ लागले. प्रादेशिक भाषा मरत चालल्याचा बोभाटा सर्वत्र होत असताना दक्षिण भारतात प्रादेशिक चित्रपटांना उत्तम व्यावसायिक यश मिळताना दिसते. या बजेटचे आकडे पाहून फक्त बॉलीवूडचा विचार करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे लक्ष "शिवाजी'कडे वळले. या निमित्ताने बच्चन आणि रजनीकांत यांच्यात तुलना सुरू झाली आहे. मात्र, रजनीकांत व अमिताभ यांच्या अभिनयाची जातकुळीच वेगळी आहे. अमिताभच्या चित्रपटांचे रीमेक करीतच रजनीकांत लोकप्रियतेच्या पायऱ्या चढला. प्रेक्षकांना मोह
िनी घालण्याचे रजनीकांतचे कसब विलक्षण असले, तरी त्याच्या अभिनयात सूक्ष्मता कमी व भडकपणा अधिक असतो. प्रेक्षकांना जे हवे तेच देण्याकडे निर्माता-दिग्दर्शकांचा कल असल्याने रजनीकांतचाही त्याला नाइलाज असावा. व्यवस्थेविरोधात लढणारा नायक हाच रजनीकांतच्या चित्रपटांचा स्थायीभाव असतो. "शिवाजी'मध्येही तोच धागा चालविला असावा, असे अंदाज व्यक्त होत आहेत. मात्र, दिग्दर्शक शंकरन यांनी कथेबाबत गुप्तता पाळली आहे. बॉलीवूडच्या तोडीस तोड असा व्यवसाय दक्षिण भारतातील चित्रपट करून दाखवितात; पण असे यश अन्य भाषांना का मिळत नाही, असा प्रश्‍न पडतो. तमीळ चित्रपट पन्नास- साठ कोटींचे गड सर करीत असताना मराठी चित्रपटाचे प्रथमच लंडनला चित्रीकरण झाल्याचे आपल्याला कोण कौतुक वाटते. दक्षिण भारतातील जनतेशी तेथील चित्रपटांनी जसा भावबंध निर्माण केला तसा तो करण्यास मराठी चित्रपट अपयशी ठरले हे याचे कारण आहे, की मराठी भाषेची हिंदीशी असणारी जवळीक मराठी चित्रपटांना मारक ठरली याचा शोध घेतला पाहिजे. सध्या तरी तमिळनाडूला भुरळ पाडणाऱ्या मराठी शिवाजीला शुभेच्छा देणे आणि त्याच्या "रीमेक' वा "डब' आवृत्तीची वाट पाहणे, इतकेच आपल्या हाती आहे.

इच्छा (भाग २)

इच्छा (भाग १) वरून पुढे चालू.....

मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्र आकाशात चांगला वर आला होता. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती. चंद्राचा मंद प्रकाश रानाला न्हाऊ घालत होता. हवेची थंडगार झुळुक आली तसे राधेने आपले अंग आक्रसून घेतले. थोड्यावेळाने तिने हळूहळू डोळे उघडले. बहुधा अतिश्रमाने डोळा लागला होता. घडल्या घटनेची आठवण झाली तशी ती खाडकन उठून बसली आणि कावरीबावरी होऊन इथे तिथे पाहू लागली. रानात सगळं कसं शांत होतं. मध्येच रातकिडे ओरडत होते आणि हवेच्या मंद झुळुकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती तेवढीच.

जा तोसे..

मला  "परिवार" - १९६७, या चित्रपटातील, "जा तोसे नही बोलू कन्हैया" हे गीत हवे आहे. कोणत्या साईटवर मिळेल कोणी सांगू शकेल का? किंवा कोणाकडे त्याचे एम पी ३ असेल तर मला खालील पत्त्यावर पाठवावे. ऑनलाईन ऐकण्याची सोय असेल कुठे तर ती लिंक पाठवावी.

इच्छा (भाग १)

लेखनप्रकार : गूढकथा.

राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने वेड्यासारखी धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं, पायांत पेटके येत होते. काळोखात एक दोनदा  तिने मागे वळून पाहिले. नवरा आपल्या पाठलागावर असावाच या विचारात तिने हमरस्ता केव्हाच सोडला होता आणि  पाय नेतील तिथे ती धावत होती... श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली, पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.

धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी... तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.

राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती.

लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्‍या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.

हा प्रकार त्यानंतर नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्‍याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्‍यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली.

पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्‍यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि चार बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्‍यांनी राधाशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. आई-बाबांकडे जावं, एकवार त्यांना भेटूनतरी यावं अशी इच्छा होत होती. तसे तिने नवऱ्याकडे, सासूकडे बोलूनही दाखवले होते परंतु तिला उडवाउडवीची उत्तरे मिळत.

असेच एके दिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले.

"घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."