आम्ही फ्याशनेबल होतो

आम्ही विद्वानांच्या नजरेतून घसरलो आहोत अशी बातमी आल्यापासून आम्हाला रात्री झोप नव्हती. घेतलेला घास घशाखाली उतरत नव्हता. जुन्या चित्रपटातील हिंदी नायकाप्रमाणे "ओ दुनिया के रखवाले" म्हणत गावेसे वाटत होते. कसेही करून आम्हालाही फ्याशनेबल व्हायचे होते. विद्वानांच्या बोटाला बोटे लावून कळफलक बडवत साहित्यसमीक्षा टंकित करायची होती. अशा कठीण परिस्थितीत एकच मार्ग होता. थेट गुरूदेवांनाच साकडे घालायचे.

कर्माझिरी

"आई ,१५ ता. काय करायचं?"

"तू जे ठरवशील ते."

"बाबा, आपण एका छानशा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ."

" बड्या हॉटेलमध्ये जायचं आणि तेच तेच पदार्थ खायचे आणि आवडले नाही की पैसे गेल्याचं दु:ख करत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही दोघजणं कर्माझिरीलाच जा."

विदर्भातली मराठी भाषा - भाग ३

हे घ्या अजून काही विदर्भीय शब्द आणि वाक्प्रचार:

शब्द :

  1. अंगारपेटी = काडेपेटी
  2. शष्प = पालेभाज्यांचा पाने काढल्या नंतर उरणारा टाकून देण्याचा भाग
  3. चिमणी चे तेल = रॉकेल
  4. तोंडाचे चवणे = जीभेचे चोचले
  5. फोतरं = टरफले
  6. माकोडा = मुंगळा/डोंगळा
  7. आसणीच्या घासणीवर = स्वत: च्या मर्जीने कुठेही कसेही
  8. विस्कट-वास्कट/ विस्कळ-वास्कळ = अस्ताव्यस्त
  9. हागोडं काम = अर्धवट काम
  10. आळशी ढोणी = खूप आळशी
  11. फकडी = फुलपाखरू
  12. रपसप = मजबूत/ दणकट
  13. मरतांगडं = मरतुकडं
  14. मांजोळी = रांजणवाडी
  15. ओंगळ = ओघळ

वाक्प्रचार:

एक थरारक अनुभव...

३१ डिसेंबर १९९८.
वर्षाखेर साजरी करण्यासाठी आम्ही मित्र कोल्हापूर येथील मित्राकडे - पोप्याकडे - एक दिवस आधीच डेरेदाखल झालो होतो. आदल्या वर्षी ठरवल्याप्रमाणे बारावीत कसेही गुण मिळाले आणि इन्जीनिअरींगला कुठेही प्रवेश मिळाला तरी जिथे कुठेही असु तिथून कोल्हापूर गाठायचे आणि ३१ डिसेंबर शेलीब्रेट करायचा हे अगदी सगळ्या ग्रुपनेच मनावर घेतले होते!... की, याहीवेळी संकटाचा सामना एकट्याने करणे कठीण भासावे असा खेळ नियतीने मांडून ठेवला होता?

स्त्रीमुक्तीची गरज... पण कुणाला?

स्त्रीमुक्तीची गरज... पण कुणाला?


                                             "आधी तिन्ही मुलीच ना? वा वा! आता मुलगा झाला, किती छान!" 
प्रत्येकाच्या - स्त्री असो वा पुरुष - एकदा तरी कानावर पडलेलं हे वाक्य, त्या क्षणी किमान मुलींच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया उमटवून जात असतंच. त्याकडं तितक्या बारकाईनं मुली पहात नसतीलही; पण त्याचा त्यांच्या भावविश्वावर परिणाम होत असतोच. मुलगा आणि मुलगी यातील  भेद लहानपणापासूनच समाजातील विविध व्यक्तींकडून आणि पालकांकडूनही केला जातो. त्याची तीव्रता विकसित आणि विकसनशील भागात वेगवेगळी असते एवढंच.  मुलीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव टोकदारपणे होऊ लागते ती पौंगडावस्थेत आणि महाविद्यालयीन कुमारावस्थेत.आजुबाजूला  घडणाऱ्या विविध घटनांमधून आणि अनुभवातूनही.  महाविद्यालयीन वय म्हणजेच आयुष्यातील संवेदनशील आणि कोवळे वय. या वयात अनेक गोष्टींकडं बघण्याचा दृष्टीकोन बहुतांशी थोडा टोकाचाच असतो याचं कारण म्हणजे अनेक बदलांबरोबर होऊ लागलेली `आपलं व्यक्तीमत्त्व वेगळं आहे' ही जाणीव! मुलगा किंवा मुलगी म्हणून विशिष्ट भिन्न वर्तन अपेक्षित आहे या समजाविरुद्ध याच वयात मन बंड करून उठतं ते या जाणिवेतूनच. याच प्रक्रियेतून पुढं मुलगी असणं, एक स्त्री असणं ही बाब मुलींच्या अस्मितेचा भाग बनते. वय वाढत जातं तसं स्वतंत्रपणे, पुरूषांच्या बरोबरीनं आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याकरता प्रत्येक स्त्रीची स्त्रीमुक्तीची स्वतःची वेगळी व्याख्या तयार होऊ लागते.  

ई-शेतीचा यशस्वी प्रयोग "ई-सागू'

शेतीमध्ये भावीपणे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. भारतभरात अनेक शेतकरी व संस्था हा प्रयोग राबवीत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर आंध्र प्रदेशातल्या आंतरराष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेने "ई-सागू' हा प्रकल्प राबविला, त्यातून अनेक चांगले परिणाम दृष्टिक्षेपात आले. या प्रकल्पाविषयी...

काही समान आशयांच्या म्हणी --- भाग पहिला

आशय---- वासरात लंगडी गाय शहाणी

     हिंदी----अंधो में काना राजा
              कोईरी(अशिक्षीत शेतकरी) के गांव में धोबी पटवारी(मुखिया)
              जहां रुख नहीं बिरिख(वृक्ष), वहां रेंड(एरंड) ही महापुरुख
              सौ कौओं में बगला नरेस
              सौ नकटो में एक नाकवाला नक्कू(सुंदर)
    पंजाबी---उजडे बागां दे गाल्हड (खार) पटवारी
    काश्मिरी--अन्यन् मंज् कान्य स्वंदर(आंधळ्यांमध्ये काणी सुंदर)
    मराठी----आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान
               ओसाड गावी एरंड बळी
               गावढ्या गावात गाढवी सवाशीण
               घोंगड्यात पासोडा सरदार
    गुजराती--नहीं झाड, त्यां राजा ताड
    बंगाली----अंधेर देशे काना राजा
                उजाड बने शियाल (कोल्हा) राजा
                नेई देशे एरंड गाछ, नेई बने खटाश बाघ
                (वृक्षहीन गावात एरंडच वृक्ष आणि ओसाड अरण्यात मांजरच वाघ)
    संस्कृत----निरस्तपादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते

मालिकांच्या विळख्यातले आयुष्य

चित्त यांच्या "चार दिवस..' सारख्या मालिकांवर बंदी आणावी" या चर्चाप्रस्तावरुन आठवल्याने हा लेख. (पूर्वप्रसिद्धी - 'अंतर्नाद' ऑगस्ट २००५). या विषयावर बरीच साधकबाधक चर्चा झाली आहे. तरीही 'तेवढेच 'ज्ञानप्रकाशा' त'! 

मालिकांच्या विळख्यातले आयुष्य

गोष्ट एका प्रेमाची

रात्रीचे ९ वाजले तरी स्वाती अजून ऑफिसमध्येच होती. एक काम केव्हापासून संपवायचे होते पण कितीही प्रयत्न केले तरी तिला प्रोग्रॅममधल्या चुका मिळत नव्हत्या. बरं ती सीनियर म्हणून ही असली किचकट कामे तिच्याकडेच यायची. नेहमीप्रमाणे त्यांच्या मॅनेजरने तिला गोड बोलून ते काम करायला पटवलंच होतं.

पाऊस -- बनगरवाडीतला आणि कांदेवाडीतला

नुकताच पाऊस वाजतगाजत डेरेदाखल झालाय, तेव्हा ग्रेसच्या भाषेत सांगायचं तर 'पाऊसनांदीची पिंजण' म्हणून मला आवडणारी पावसाची दोन वर्णनं येथे देत आहे. दोन्ही वर्णनं गाजलेल्या पुस्तकांतली. दोन्ही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली. पण त्यांच्यातल्या साम्याचा भाग एवढाच. एक ग्रामीण जीवनावरची अलिप्त कादंबरी, तर दुसऱ्या कथासंग्रहात भरलेला आहे तो मुंबईतला मध्यमवर्गीय लिप्ताळा. बनगरवाडीतला एकूणच तटस्थ, 'जसं-आहे-तसं' कथन करणाऱ्या निवेदनाचा सूर पावसाळ्याच्या या वर्णनातही जाणवतो; तर गंगाधर गाडगीळांच्या 'पावसाळी हवा' [कथासंग्रह - कडू आणि गोड] या कथेत पाऊस एका संसारी पुरुषाच्या दृष्टीतून येतो.