विदर्भातली मराठी भाषा - भाग १

सासरची कोकणस्थ असले तरिही माहेरची मी देशस्थ. विदर्भातली देशस्थ. कारण माझे वडील मूळचे विदर्भातले. त्यामुळे घरी बोलल्या जाणारया मराठी मध्ये अधून मधून विदर्भीय फोडणी हमखास असायची.

आता आताच मनोगता वर खास पुणेरी भाषेतील मजेशीर वाक्प्रचार वाचनात आले. वाटले आपणही आपल्याला माहीत असलेले काही गमतीशीर विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द मनोगती ना सांगुया.

एका खेळियाने...

दिलीप प्रभावळकरांचे 'एका खेळियाने...' हे आत्मकथन नुकतेच वाचण्यात आले. त्यांनी बाबा एक विचारु!' नावाची छोटी नाटीका लिहिली होती. चौकस , शंकेखोर,हुशार मुलं बापाला प्रश्न विचारुन हैराण करतात. त्यातले काही संवाद

(बाबा वाचत बसलेले. निखिल येतो.वय ८)

मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये!

आजच्या लोकसत्तेत हा बातमीवजा लेख वाचायला मिळाला. लंडनमध्ये चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट कसा असेलत्याची झलक वाचायला मिळाली. सर्वांना आस्वाद घेता यावा म्हणून तो लेख येथे उतरवून ठेवत आहे.

लोकसत्तेतील मूळ लेख : 'वैजनाथ हंपनवार" इन लंडन!

महाराष्ट्रातील हायकोर्टात फक्त इंग्लिश चालेल!

आज महाराष्ट्र टाईम्समध्ये हा लेख वाचण्यात आला, आणि वाईट वाटले. इतर सर्वांना वाचता यावा म्हणून तो येथे उतरवून ठेवत आहे.

म.टा. मधील मूळ लेख : महाराष्ट्रातील हायकोर्टात 'ओन्ली इंग्लिश'!
रविवार १० जून २००७.

"बयो'ला "सर्वोत्कृष्ट संगीता'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार!

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला. सर्वांना आस्वाद घेता यावा म्हणून ती बातमी येथे उतरवून ठेवत आहे.

ईसकाळातली बातमी : "बयो'ला "सर्वोत्कृष्ट संगीता'चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार!

पुणे, ता. १० - ज्येष्ठ संगीतकार आणि सतारवादक पं. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "बयो' चित्रपटाला स्पेन येथील प्रतिष्ठेच्या "माद्रिद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये "सर्वोत्कृष्ट संगीता'चा पुरस्कार मिळाला आहे. .........

जंजिरा - इतिहास (२)

१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.

१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.

भुरकुंडीचे शहाणे

महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्याला जवळपास समांतर अशी सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या मधल्या पट्टीला 'कोंकण' असे म्हणतात, सह्याद्रीच्या मूळ रांगेला काटकोन करून काही दुय्यम/तिय्यम रांगा समुद्रापर्यंत पोचतात, कोंकणात खूप पाऊस पडतो इत्यादी गोष्टी सर्वांना माहीत आहेतच.

शताक्षरी शब्दकोडे (१)

शताक्षरी १

  1. आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  2. शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  3. छापून घेऊन फावल्या वेळात सोडवा!








१०

११ १२
१३ १४ १५

१६
१७



१८



१९
२०

२१
२२

२३


२४
२५


२६ २७
२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५
३६
३७ ३८
३९
४०




४१

अविनाश भोसले आणि मराठी माणूस ?

अविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सगळ्यात मराठी माणूस आणि एवढी मालमत्ता यामुळे हे प्रकरण प्रत्येक वर्तमानपत्रात वाचायला मिळेल.या सगळ्यावर एका मराठी माणसालाच खुपणारी मराठी माणसाची संपत्ती यामुळे हि चर्चा वेगळ्याच दिशेने जात आहे.

काही लग्नानुभव !

"पुण्यात काय पहावं?" असा प्रश्न विचारला तर 'शनीवारवाडा', 'सारसबाग','पर्वती' वगैरे अनेक उत्तरं मिळतील. माझे काही पुणेरी मित्र तर 'फ़र्ग्युसन', ' गरवारे', ही नावं पण या यादीत जोडतात ( आणि स्वानुभवाने मला ते पटलंय पण!)

पण पुण्यातील न चुकविण्यासारखी एक गोष्ट म्हणजे इथे होणारी लग्नं!