भारतीय राजकारणाची शोकांतिका - दिशाहीन सरकार आणि गोंधळलेला विरोधी पक्ष

भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळवले. तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसची खासदारसंख्या अभूतपूर्व नीचांकी पातळीवर पोहोचली. २०६ खासदारांचे ४४ खासदार झाले. थोडक्यात, दर पाचातले चार घरी बसले.
भाजपची नीचांकी संख्या - २ - बऱ्याच जणांना आठवते. पण तुलना अप्रस्तुत आहे. कारण भाजपचे दोन खासदार १९८४ च्या लोकसभेत आले होते.  तेव्हा भाजप जेमतेम चार वर्षे वयाचा होता. १९८० ची निवडणूक भाजपने स्वतंत्ररीत्या लढवलेली नव्हती. अगदी जनसंघापासून वय मोजले तर तेहतीस वर्षे. २०१४ मध्ये काँग्रेसचे वय १२९ वर्षे होते.

श्री. कल्याणसुंदरम "अमेरिकन मॅन ऑफ द मिलेनियम "

           ज्या समाजात सचिन तेंडुलकर ला "भारतरत्न " म्हणून गौरवण्यात येते आणि संपत्तीचा पूर डोक्यावरून वाहत असताना आपल्या "फेरारी" कारवरील कस्टमड्यूटी माफ व्हावी अशी  मागणी करण्यास त्याला आणि ती मान्य करण्यात आपल्याला काही दिक्कत वाटत नाही  अश्या समाजातील किती  जणांना ही गोष्ट माहीत आहे  ? (निदान मला तरी आजपर्यंत हे माहीत नव्हते आणि त्याची लाजही वाटते)  
      श्री.

"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी" - खिळवून ठेवणारे पुस्तक

चार दशकांहून अधिक काळ कूमी कपूर या दिल्लीमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची धाटणी विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल असे काही लिहिण्यापेक्षा गप्पा छाटण्याकडे जास्ती झुकते. आणि हे कुणीही मान्य करील की गप्पा छाटणे ही मानवाची मूलभूत गरज आहे!
काहींना चित्रपटातील तारे-तारका यांच्या वैयक्तिक बाबींबद्दलच्या गप्पा भावतात, काहींना खेळाडूंच्या म्हणजे, अर्थातच क्रिकेट खेळाडूंच्या. काहींना राजकारण्यांच्या अनेकानेक बाबी भुरळ घालतात. मी त्यांतला एक.

उऊऊऊऊउंच माझा झोका

कालच्या रविवारी एका चित्रवाणी कार्यक्रमात उंच माझा झोका हा कार्यक्रम चालू होता तेव्हा एक बातमी अचानक आठवली. ‘पीटर ड्रकर चॅलेन्ज’ नावाची एक दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणारी निबंधस्पर्धा २०१५ या वर्षासाठी नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत दरवर्षी जागतिक स्तरावरून निबंध सादर केले जातात. या वर्षी ही स्पर्धा मुंबईच्या कु. नमिता नारकर या मराठी मुलीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकलेली आहे. स्पर्धेचा विषयय होता ‘ह्यूमन डिफरन्सेस’. नोव्हेंबरमध्ये व्हिएन्ना येथे पारितोषिक वितरण समारंभ आहे.

सुरुवात

"झाला का स्वयंपाक? सदानकदा आळस.    एक काम करेल तर शपथ. सहा वाजले. आता आठ वाजतील आणि बाईसाहेब purse अडकवून कामाला निघून जातील. घरी म्हातारे सासू-सासरे घरी बसून त्यांच्या येण्याची वाट बघतील" रेवतीबाईंचा सकाळचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि कीर्तीचे हात.

"सकाळी सकाळी चहा घेत नाही. काही नाही. ५ वाजतापासून बसते त्या देवासमोर. आम्ही सहाला उठतो तेव्हाच उठते दैवासमोरून. आम्ही उठण्याअगोदर चहा करून ठेवायचा, तर ते नाही. सदानकदा आळस. " कीर्तीने शांतपणाने cooker लावून कणीक मळायला घेतली.

अध्यात्मिक शिबीर विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

 कुठे फिरून आले की लगेच त्या आठवणी लिहून काढायची सवय म्हणा, हौस म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, आहे खरा!  हे काम करायला मजा येते आणि नंतर त्या आठवणी कधीतरी वाचताना गंमत वाटते. पण सगळेच अनुभव  व्यक्त करता येतातच असं नाही अन काही वेळा सांगावेसेही वाटत नाही तो आपला सुखद ठेवा असतो...   आठवणींच्या गाभार्‍यात मखमली वेष्टणात गुंडाळून ठेवलेला. फक्त आणि फक्त आपणच त्याचे खजिनदार व राखणदार.