विचार आणि कर्म

                                    विचार आणि कर्म हे परस्परांशी संबंधित आहेत असे मला वाटते. माणूस वेगवेगळी कर्म  करतो. काही चांगली तर काही वाईट . वेगवेगळ्या कर्मांचे वेगवेगळे परिणाम असतात. अशी कर्म माणूस मरेपर्यंत करीत राहतो. तो त्याचे भोगही भोगतो. त्याच्याबरोबर त्याचे घरातले लोकही ती भोगतात. पण ही प्रक्रिया तो मरेपर्यंत समजेल अशी घडते. ज्यावेळी माणूस मरतो. तेव्हा त्याच्या कर्मांचे भोग कोणी भोगायचे 

तर त्याच्यावर अवलंबून असलेली संबंधित माणसे भोगतात.

माणसं खुळावली आहेत!

     फोनचा वापर फक्त बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी केला जातो, असा आत्ताआत्तापर्यंत माझा आणि उर्वरीत समाजाचा समज होता. खोलीच्या एका कोपऱ्यात ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किंवा शुंभासारखे किंवा निर्विकारपणे (ज्याला जे आवडेल ते त्याने स्वभावधर्मानुसार घ्यावे) एका जागी मख्खपणे बसून राहणारे फोन एक दिवसइतका मोबाईल अवतार धारण करतील, याची कल्पना मोबाईल बनविणाऱ्यालाही आली नसेल. बसून राहणारा फोन हिंडू फिरू लागला एवढाच काय तो फरक, असे मला वाटत असे. हा फरक 'एवढाच' नसून 'केवढा मोठ्ठा' आहे याची कल्पना तेव्हा आली नाही पण आता चांगलीच आलेली आहे.

तालीम

शनिवारी सकाळी सकाळी नाटकाच्या तालिमीसाठी जमलो. आदल्या रात्री बरंच जागरण झालं होतं… आठवडा संपला ह्या आनंदात शुक्रवारी रात्री कुणाला तरी भेटून चकाट्या पिटल्या होत्या… शिवाय आठवडाभर बरंच कामही केलं होतं.