खरं सांगायचं म्हणजे ... (६)

प्रिय वाचक,
कथा बरीच लांबते आहे या बद्दल क्षमस्व. शक्यतो लवकर सर्व भाग टंकित करीन.
- स्नेहांकित

बॆंक ऑफ महाराष्ट्र, गुलबकावलीचे फूल आणि नानजकर

प्रास्ताविक: 'माणूस, बेडूक आणि उप्पीट्टम' या थाटाची ही न-नवकथा वगैरे नाही.
एका सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाचे हे (प्रत्ययकारी वगैरे) चित्रण आहे.
 अगदी गुलबकावलीच्या फुलासकट यातली सर्व पात्रे व प्रसंग खरे आहेत. ते तसे न वाटल्यास ती लेखकाची आणि त्याच्या लेखनसामर्थ्याची मर्यादा समजावी.

पधनीसारे

'पधनीसारे' चा कार्यक्रम सुरू झाला होता. निवेदिका सांगत होती. " हल्लीच्या मुलांना ध,नी आणि वरचा सा हे ठाऊकच नसतं अशी आमच्यावर टीका होऊ लागली म्हणून आम्ही कार्यक्रमाचे फक्त नांव बदलले आहे, बाकी स्वरुप आधीचेच राहील. सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या स्पर्धकांना संधी देत आहोत. त्यानंतर यातल्या विजेत्या स्पर्धकांना परीक्षक करून आत्ताच्या परीक्षकांची स्पर्धा घेण्याचा विचार आहे." यावर एकही टाळी न पडल्यामुळे निवेदिकेने हक्काने टाळ्या पाडून घेतल्या. आजच्या भागात, एका महान संगीतकार व गायकाच्या रचना म्हणायच्या होत्या. त्यामुळे तो महान संगीतकार हा गायक म्हणून श्रेष्ठ होता की संगीतकार या विषयावर निवेदिकेने एक चतुर भाष्य केले. शेवटी दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ होते व स्वतःचे संगीत असताना स्वतःच ते गायचे तेंव्हा 'दुधात साखर' असे काही नेहमीचे संवाद म्हणून तिने परत एकदा टाळ्या घेतल्या.
                 पहिले स्पर्धक एक उतारवयाचे सज्जन गृहस्थ होते. त्यांनी खरोखरच छान गाणे म्हटले. तसे ते एकदा थोडे सुरांत घसरले होते किंचित, पण वयाच्या मानाने उत्तम गायले. गाणे संपल्याबरोबर निवेदिकेने त्यांचा ताबा घेतला. "कसं वाटलं तुमचं गाणं ?" आता या प्रश्नावर काय उत्तर देणार ? मी असतो तर " मला काय विचारता ? त्या परीक्षकांना विचारा" असा फटकळपणा दाखवला असता. पण ते गृहस्थ सज्जन असल्यामुळे त्यांनी 'बरं वाटलं,' असं सावध उत्तर दिलं. नंतर थोड्या जुजबी संभाषणानंतर गाडं परीक्षकांकडे वळलं.
               पहिले परीक्षक तरुण पण मोठे धोरणी वाटले. पुलंच्या भाषेत त्यांना भारताच्या परराष्ट्रखात्यात सहज नोकरी मिळाली असती!
" सुंदर, गळ्यांत आवंढा आला माझ्या! काय निष्पापपणा आहे हो तुमच्या आवाजांत! मला तर सर्वात तोच 'भावला'.(हा शब्द मागे एकदा हृदयनाथांनी वापरल्यापासून फारच 'वापरला' जातो. त्यामुळे तुम्ही स्वतः फार उच्च कोटीतले आहात असे सर्वांना वाटू लागते की काय ,न कळे! असो.) मग बोलता बोलता त्यांनी आपले आप्तही उत्तम कलाकार असल्याचे खुबीने संगून टाकले. बेसुर झाल्याचा उल्लेख मात्र त्यांनी कटाक्षाने टाळला.
             दुसऱ्या परीक्षक आधी कांही न बोलताच नाकाला चुण्या पाडून मिष्किल हंसल्या. म्हणाल्या, " छान गाता तुम्ही, बरेचसे भाव आणण्याचा प्रयत्न चांगला केलात तुम्ही, पण अजून पुष्कळ सुधारणेला वाव आहे." (मनांत आलं, यांना सांगावं, तुम्हाला तर तुमच्या उमेदीच्या काळातच हे कोणीतरी सांगायला हवं होतं! असो.)
            तिसरे परीक्षक हे प्रथितयश गायक होते. त्यांनी एकदा त्या स्पर्धकाकडे रोखून पाहिलं अन उदगारले, ' सुंदर, अतिसुंदर!!! मला क्षणभर आपण रामानंद सागरचे रामायण पाहत आहोत असा भास झाला. एकूण त्या गाण्याचे संगीताच्या दृष्टीकोनातून विश्लेषण कोणीच केले नाही.
           नंतर दुसरे स्पर्धक आले. त्यांनी सुरवात तर झकासच केली. पण कडव्यांमध्ये ते इतके बेसूर झाले की एकदोन परीक्षकांचा कानावरचा हेडफोनच घसरला. पण प्रत्यक्षांत गाण्यानंतर तेच संवाद, छानछान म्हणणं वगैरे वगैरे! नंतरच्या सर्वच स्पर्धकांना कमीअधिक याच मापाने तोलण्यात आले. मला तर कळेचना, इतके मुरलेले परीक्षक! मला जर कोणी बेसूर होताना कळते तर यांना ते जाणवले नाही हे शक्यच नाही. तर त्याबद्दल कांहीच न बोलता भाव, शब्दोच्चार या इतर गोष्टींवरच भर देण्यात आला.
          सर्वात शेवटी माझा नंबर आला. निवेदिकेच्या निरर्थक प्रश्नांना मीही तितकीच निरर्थक उत्तरे दिली. खरं तर मी एखादे हळुवार भावगीत गाणार होतो. पण सगळ्यांचेच भाव कमी पडत असल्याचे पाहून मी आयत्या वेळेला, ' माता न तू वैरिणी' हे गाणे म्हणणार असल्याचे जाहीर करताच प्रेक्षकांतून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आला. गाणे म्हणताना मी मूळ गायकापेक्षाही जास्त त्वेषाने घसा खरडून म्हटले. गाताना मी इतका तल्लीन झालो होतो की सगळे कानात बोटे घालून बसले होते हे मला दिसलेच नाही. परीक्षकांनी तर म्हणे टेबलाखाली दडी मारली होती.(असे नंतर कळले)
गाणे संपताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. निवेदिकेने विचारले," कसं वाटलं तुम्हाला तुमचं गाणं ?" "छानच झालं असणार कारण टाळ्या तर तुम्ही ऐकल्याच आहेत. मी स्वतः गाताना इतका तल्लीन असतो की मला आजुबाजूचे कांही दिसेनासे होते." मी उत्तरलो. " क्या बात है, यावर एकदा टाळ्या होऊन देत" इति निवेदिका. मग बोलू लागले आपले पहिले परीक्षक.
"तुमच्या गाण्याला नक्की काय म्हणावं तेच मला कळत नाही. ते शब्दांत सांगताच नाही येणार." असे म्हणून त्यांनी तोंडाला पाण्याचा ग्लास लावला.
दुसऱ्या परीक्षक कसलेल्या अभिनेत्री असाव्यात. त्या नुसत्याच कोपरापासून हात जोडून हंसत राहिल्या. त्यांच्या या अदेलाच टाळ्या पडल्या. म्हणाल्या, " मी यांच्याशी शंभर टक्के सहमत आहे.
तिसऱ्या परीक्षकांना मात्र क्रोध आवरेना. " तुमचे गुरू कोण ? अशी गाणी म्हणताना सूर टिकवणं शक्य तरी आहे का ? तुमच्या नुसत्या शब्द आणि भावाच्या अतिरेकानेच आम्ही अर्धमेले झालो! त्यांत सूर शोधता शोधता मेंदुचा भुगा झाला."
क्षणभर शांतता पसरली. मग मीच मोठ्ठ्याने टाळ्या वाजवायला सुरवात केली. सगळेच गोंधळले. मी माईकचा कब्जा घेतला.
" तुम्ही तिघेही थोर कलाकार आहात. मला तुमच्याविषयी खूप आदर आहे. तरी मी हे मुद्दाम केले. कारण मला कोणाच्या तरी तोंडातून सत्य ऐकायचे होते. ते साध्य झाले. मला तुम्ही शून्य गुण दिले तरी हरकत नाही." मी स्लो मोशन मध्ये खाली उतरलो.(सिरियल्स बघण्याचा एवढा तरी परिणाम होणारच ना!)
               जागा झालो तर घरातलेच सगळे माझ्याभोवती जमा होऊन आश्चर्याने पहात होते. असो.       

गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू


प्रस्तावना

गंपू ही एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची असामान्य कथा आहे.मात्र "गंपूच्या चारित्र्यामध्ये कृष्णाची झलक पाहायला मिळते व बरेचसे प्रसंग कृष्णाशीच संबंधीत असल्यासारखे वाटतात" असा माझ्या विरोधकांनी सूर लावला आहे. पण असल्या कारवायांना मी भीक घालणार नाही.ज्या पुस्तकाच्या एका आठवड्यात वीस हजार प्रती खपाव्या त्या पुस्तकाबद्दल विरोधकांचा जळफळाट होणे हे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांचा हा विरोध मी माझ्या यशाची पहिली(दुसरी आणि तिसरी) पायरी मानून चालत आहे,चालतच आहे आणि चालतच राहणार आहे.

गंपूचा उल्लेख

गेल्याच महिन्यात पुण्यात झालेल्या अखिल ताडीवाला रोड साहित्य संमेलनात या कादंबरीचा "असामान्य व्यक्तिमत्त्वाची व्यथा जनसामान्यांसमोर मांडणारे विद्रोही साहित्य" म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला("मात्र विरोधकांनी त्यात विशेष काही नव्हते" अशी टिका केली होती.) शिवाय मार्केट यार्ड साहित्य परिषदेतर्फे "गंपू आणि भारतीय व्यापार" हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.(त्यातही विशेष काहीच नव्हते अशी पुनश्च टिका झाली)

इनोबाच्या डायरीतून...

काल रात्रीपासून डोक्यात एक नवा कथानायक घोळ घालत होता,तेवढा झटपट लिहून काढावा म्हणून आज सकाळी जरा लवकरच उठलो.घराचं दार उघडत नाही तो समोरचा नाना आम्हाला सामोरा(खरंतर पाठमोरा)गेला.नको तो अवयव खाजवत बसायची लोकांना भारी खोड.च्यामारी!उद्या त्याला स्क्रबिंग ब्रशच घेऊन देतो(ओशाळला तर ठीक-नाहीतर ब्रशचे पैसे वाया जायचे)सकाळी सकाळी नको त्या गोष्टी नजरेस पडतात.
म्हटलं लवकर जाऊन प्रातर्विधी उरकून घ्यावा,पण हे सालं चाळीतले आयुष्यच बेकार.एकवेळ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जागा वेळेवर मिळेल,पण सकाळी वेळेवर संडास रिकामं मिळेल याची खात्री नाही.प्रसंग निभावून नेला.दिवसेंदिवस आमच्या सहनशक्तीत कमालीची वाढ होतेय.काम फत्ते करताना भिंतीवरच्या मजकुराकडे सहज नजर गेली.प्राचीन मानवाने बनवलेल्या गुहेतील भित्तिचित्रेही इतकी रेखीव नसावीत.शिवाय इतका मर्यादित वाचक वर्ग असतानाही लोक आपली साहित्यविषयक आस्था सोडायला तयार नाहीत,हे त्या भिंतीवरचे मजकूर वाचून लक्षात यावे.(कोण म्हणते तरुण पिढीला साहित्याविषयी प्रेम नाही?) शिवाय चाळीत घडणाऱ्या रोजच्या घटनांचे इतक्या परखड शब्दांत विश्लेषण.हे समाजोपयोगी काम विनामोबदला करणा-या त्या अज्ञात निर्भीड पत्रकाराचे मी मनातल्या मनात आभार मानले.

दोन बाजू... क्षणाच्या!

....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली...
हुतात्मा चौकातला तो मैदानी रस्ता आता क्षणभरात गाड्यांच्या गर्दीखाली दिसेनासा होणार होता.
सिग्नलचा हिरवा बाण लकाकला आणि पलीकडच्या गाड्यांनी वेग घेतला.
पण नुकत्याच चार पायांवर चालायला लागलेल्या त्या इवल्या जिवाला त्याची जाणीवही नव्हती. धडपडत्या पायांनी तो जीव पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता...
आणि अचानक गाड्यांचा ओघ सुरु झाला..
...एक निसटतं, केविल्वाणं म्यांव करून मांजराचं ते पिल्लू जागच्या जागीच दबून बसलं...
स्वत:च्या पायांवर चालण्याचा पहिलाच प्रसंग अनुभवताना त्याला माहीतही नसलेला मृत्यूचा नाच त्याच्या चोहोबाजूंनी सुरू झाला होता...
....सिग्नलच्या दिव्यातला हिरवा माणूस प्रकट व्हायची वाट पाहात रस्त्याच्या दोहोबाजूंना उभी असलेली गर्दी त्याकडे पाहात थिजली होती...
हुतात्मा चौकातल्या कारंज्याअडे पाठ करून कॆमे-यासमोर उभ्या असलेल्या त्या हसया डोळ्यांच्या विदेशी, गोया तरुणीचं लक्ष अचानक त्या मांजराच्या पिल्लाकडे गेलं आणि एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली... आपली दोन्ही कानशिलं तळव्यांखाली झाकून भयभरल्या नजरेनं ती रस्त्याच्या मधोमध, गाड्यांच्या गर्दीत अडकलेल्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहात होती...
भोवतीच्या गर्दीत उमटलेलं थिजलेपण तिच्याही नजरेत उतरलं होतं....
... पुढच्या कुठल्याहि क्षणी आपल्याला ते अघटित पाहावं लागेल, अशी भीती आख्ख्या गर्दीत दाटली होती....
सिग्नल बंद व्हायच्या आत रस्ता पार करायच्या गडबडीतल्या गाड्या, पिल्लाजवळ येताच, आकांतानं कसरत करीत त्याला वाचवायचाही प्रयत्न करत होत्या... पिल्लाचा भयभरला आक्रोश त्या कर्णकर्कश आवाजात थिजून गेला होता...
...अचानक गर्दीतली एक झुकल्या वयाची महिला वाहनांच्या रहदारीची पर्वा न करता रस्त्यावर घुसली... उजव्या हाताने गाड्यांना थाबायचा इशारा करीत ती पावलापावलानं त्या पिल्लाच्या दिशेनं पुढंपुढं सरकत होती...
आणि वाहनांचा वेगही मंदावला....
रस्त्यावरचा, वाहनांसाठीचा हिरवा सिग्नल सुरु असतानाही, गाड्यांनी ओसंडून वाहणारा तो रस्ता जागच्या जागी थबकला.
पलीकडच्या गर्दीला रस्ता क्रॊस करायचं भान नव्हतं....
रस्त्यावर दबून बसलेलं ते पिल्लू पुन्हा लडबडत्या पायांवर उभं राहिलं आणि मागं जावं, की पुढं, अशा संभ्रमात सापडल्यासारखं इकडंतिकडं पाहू लागलं...
एव्हाना ती महिला त्या पिल्लाजवळ पोहोचली होती...
मायेनं तिनं हात पुढे केला, आणि त्या पिल्लाला उचलून तिनं छातीशी धरलं... ते भेदरलेलं पिल्लूही, तिच्या कुशीत विसावलं होतं...
जगण्यामरण्याच्या अंतराची जरादेखील जाणीव नसलेला एक जीव वाचवल्याचं समाधान त्या महिलेच्या डोळ्यांत उमटलं होतं...
त्या पिल्लाला कुशीत घेऊन ती महिला मागं परतली आणि रस्त्यावरच्या गाड्यांनी पुन्हा वेग घेतला...
एक असाहाय्य, जन्माला येताच या अफाट दुनियेत एकटा पडलेला एक जीव त्या क्षणाला तरी वाचला होता....
ते पिल्लू घेऊन ती महिला हुतात्मा चौकाजवळच्या पोलिस चौकीजवळ आली, आणि त्याच्या पाठीवर हलकेच गोंजारत तिनं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दरवाज्याशी ठेवलं...
कायद्याचं रक्षण करणायाच्या हाती जणू तिनं त्या नवजात जिवाचं जीवनही सोपवलं होतं, आणि ती निर्धास्त झाली होती....
..... सिग्नलच्या खांबावरचा हिरवा माणूस दिसताच, गर्दीनं रस्ता ओलांडला....
अन थिजलेला तो क्षण संपून, नवा क्षण जिवंत झाला....
... नव्या गर्दीनं पहिल्या गर्दीची जागा घेतली, तेव्हा अगोदरच्या त्या क्षणाच्या खाणाखुणादेखील तिथे उरल्या नव्हत्या....
हस-या डोळ्यांची ती गोरी, विदेशी तरुणी अजून्ही तिच्या साथीदारासोबत तिथे उभीच होती...
गाड्यांच्या गर्दीत जिवंत झालेल्या माणुसकीच्या एका स्पर्शामुळे, जिवाची बाजी लावून जिवंत परतलेलं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दाराशी निर्धास्त झाल्यांचं तिनं बघितलं, आणि तिच्या कानशिलावरचे भीतीनं थरथरणारे हात बाजूला झाले... डोळ्यातलं थिजलेपणही हळुहळू मावळलं, आणि नजर पुन्हा पहिल्यासारखी हसरी झाली...
एका स्वस्थ समाधानाची छटा चेहयावर उमटवत तिनं साथीदाराकडे पाहिलं... त्यानंही हळुवारपणे तिचा हात हातात घेऊन थोपटला...
घड्याळाच्या वेगाशीही सामना करत पळणाया गर्दीत हरवलेल्या माणुसकीच्या नकळतपणे झालेल्या दर्शनानं ते जोडपं भारावून गेलं होतं....
पाठीमागच्या उसळणाया कारंज्याकडे पहात त्यानं कॆमेरा बंद केला आणि हातात हात घालून ते दोघही रस्ता ओलांडू लागले...
पलीकडच्या फूटपाथवर येताच, फाटक्या, मळक्या कपड्यांतली, अस्ताव्यस्त जटांची आणि फक्तं नजरेतलं बालपण जिवंत असलेली दोनचार मुलं धावत त्यांच्यासमोर आली, आणि हात पसरून आशाळभूतपणे त्यांच्याकडे बघत राहिली...
तिच्या डोळ्यातलं मघाचं समाधान अजूनही टवटवीत होतं...
पर्समध्ये हात घालून तिनं दोनचार नोटा काढून त्या मुलांच्या हातावर ठेवल्या...
हातातले पैसे घट्ट पकडून क्षणात त्यांच्याकडे पाठ फिरवून पळालेल्या त्या मुलांचा पाठमोया आकतीकडे पाहाताना पुन्हा तिच्या डोळ्यातलं हास्य फुललं, आणि त्याच नजरेनं तिनं पुन्हा जोडीदाराकडे बघितलं...
भारतात आल्यावर कायकाय पाहायला, अनुभवायला मिळेल, याचा कधीकाळी केलेला गृहपाठ जणू त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता....
नेहेमीप्रमाणंच उजाडलेल्या आणि मावळलेल्या रोजच्यासारख्या त्या दिवशीचा तो क्षण अनुभवणाया गर्दीतल्या प्रत्येक साक्षीदाराच्या मनात तो कायम्चा अधोरेखित होऊन राहिलेला असेल...

स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग : २ )

[ सूचना : ही कथा काल्पनीक आहे ]

आतापर्यंत काय झालं? [ योगायोगाने वयस्कर स्पायडरमॅन मुंबईच्या एक ऑफीसमध्ये येतो. त्याला अमेरिकेचा आणि तिथल्या गुन्हेगारांचा कंटाळा आल्याने तो काही काळ भारतातच राहायचे ठरवतो. वय झाल्याने त्याची जाळीसुद्धा तुटून जाते. झाल्याने कोणी ओळखू नये म्हणून तो शक्यतो बुरख्यावीनाच फिरायचे ठरवतो.त्याला त्या आफीसमध्ये पार्ट टाईम नोकरी मिळते. मग आणखी एका नोकरीच्या शोधार्थ असतांना त्याला उन्हामुळे चक्कर येऊन त्याची टक्कर सुनील शेट्टीच्या गाडीशी होते ... पुढे वाचा ]

आधुनिक दान

बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते.

ती आली, तिने पाहिलं.. आणि तिने जिंकलं..

मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणिमात्रांचं घर. समस्त प्राणिमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांचं(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच.  कायम वस्तीला असलेले प्राणी म्हणजे २ कुत्री आणि १ मांजर आणि असलंच तर त्या मांजरीची पिल्लं. माझ्या लहानपणी आम्ही इचलकरंजी इथे डेक्कन कॉ.ऑप.मिल्स च्या क्वार्टर्स मध्ये राहत होतो. तिथले माझे बालपणीचे दिवस म्हणजे खरं सांगायचं तर सुवर्ण अक्षरात लिहावेत असे दिवस होते. एक घर आणि घराबाहेर बाग, त्या बागेत एक मोठे पायरी आंब्याचे झाड, एक मोठे फणसाचे झाड, सीताफळ,पपई आणि काही फुलांची झुडुपे... बाग छोटी असली तर मला खूप आवडायची. तर माझ्या या घरी ससे पाळले होते आम्ही. बाबांचा विरोध होता तरीही पाळले. आणि या सस्यांचा पिंजरा बागेत ठेवला होता. एक पोपटही होता पाळलेला. कुत्रा आणि मांजर तर होतेच. म्हणजे आमचे घर जरा कमी प्राणिसंग्रहालय होते असे म्हटले तरी चालेल.  माझ्या बाबांना, कुत्र्या खेरीज बाकी प्राणी विशेष आवडत नाहीत. पण मेजॉरिटी मुळे त्यांचे काही चालत नसे. त्यात एकदा मी कहरच केला. तिथे रोज सकाळी एक मिलचा माळी सगळ्या घरातून फुले आणि दूर्वा वाटत हिंडत असे. आणि रोज तो दूर्वा ठेवून गेला की मी लगेच त्या दुरावा सशांना खायला घालत असेल. आजीला पूजेसाठी दुरावा मिळत नसत. बिचारा माळीबुवा रोज शिव्या खाई आजीच्या. आणि एकेदिवशी साक्षात बाबांनी मला रंगेहाथ पकडले. आणि मग मस्त खरडपट्टी... तशातच एकदा आईचा पाय दुखावला, तिला चालताही येईना. सस्यांकडे बघायला कोणी नाही.. त्यामुळे त्यांना त्याच माळीबुवांच्या शेतावर ठेवण्यात आलं आणि माझं ससे पाळण्याचं स्वप्न धुळीला म्हणजे धुळीलाच मिळालं.  त्यांतर काही काळाने कोल्हापुराला मोठ्ठ ... हो मोठ्ठच घर बांधलं आम्ही आणि सगळे तिकडे राहायला गेलो. लहानपणापासूनची सवय त्यामुळे २ कुत्री आणि मांजर आमच्यासोबत तिथेही आलेच. फक्त आता पोपट आणि ससे नव्हते...... ही प्रस्तावना होती माझे प्राणीप्रेम सांगण्यासाठी.

संस्कृत२

सत्यकाम जाबाली - मूळ कथा : छांदोग्य उपनिषद (IV 39-43)

छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".

आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."

सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"

आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."