वाहतुकीची 'यातायात'

महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती सार्थ आहेत, हे महाराष्ट्रात राहून नाही कळत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेर पडावं लागतं. दक्षिणेतलं माहित नाही. पण उत्तरेत गेल्यानंतर तर हा अभिमान रास्त नसून अत्यंत योग्य असल्याचा भाव आपोआप मनी दाटायला सुरवात होतो.

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग २

आम्ही मुंबई एयरपोर्ट ला पोहोचलो. तिकडे गेट च्या बाहेर "क्ष" टुर कंपनीचे काउंटर होते..... तिकिटे आणि पासपोर्ट हातात मिळाला एक खाउची पिशवी पण मिळाली.... वाटले निदान टुर तरी चांगली होइल. एयरपोर्ट च्या आत आमची टुर ऑपरेटर उभी होति. तिने हसतमुखाने आमचे स्वागत केले.... दिलासा नंबर २ मिळाला..... आतमध्ये सगळ्या फॉरमॅलिटिझ करताना तशी काही अडचण नाही आली, पण आपण करत आहोत ते बरोबर आहे हे सांगयला कुणीच नव्हतं...बँकॉक एयरपोर्ट ला आम्ही उतरलो..... त्याचं नाव "सुवर्णफुमी" असं आहे..... खरच सुवर्णभुमी सारखी शान तिकडे होति. पण तिकडे सुद्धा ती मुलगी स्मितहास्य देण्यावाचून काहीच करत नव्हती.... आम्ही सगळेच जण immigration साठी झगडत होतो... तीने खरंतर सगळ्यांच्या फॉरमॅलिटिझ होइपर्यंत थांबून शेवटी स्वतःच्या फॉरमॅलिटिझ पूर्ण करायला हव्या होत्या.... परंतु ति आमच्या आधीच सगळं करून बाहेर गेटजवळ जाउन उभी होती....आम्ही कसेबसे बाहेर आलो.... लोकांना इंग्रजी येत नसल्याने थोडा त्रास झाला.... तो होउ नये म्हणून टूर कंपनीला पैसे भरतो आपण.... पण बहुदा आमच्या नशीबात त्रासाविना काही काम साध्य होइल असं लिहिलेल नसावं.... बाहेर आल्यावर सगळ्या जोड्यांची हजेरी झाली.... आणि लक्षात आलं की एक जोडी नाहीये.....

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे : मुख्यमंत्र्यांचे विचार

आजच्या मटाचा हा अग्रलेख आहे.

शीर्षक आहे : विलासरावांचा मराठी बाणा

अग्रलेखात यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत महाऱाष्ट्रात मराठीची कसकशी प्रगती - अधोगती होत गेली त्याचा थोडक्यात मुद्देसूद आढावा आहे.

जहिरात १

.....नुकत्याच सुरू केलेल्या जाहिरात एजंसीमध्ये मी गिऱ्हाइकांची नेहमीप्रमाणे वाट बघत बसलो होतो. छोटी छोटी कामे येत होती पण एखादं मोठं काम आलं नव्हतं. येव्हढ्यात दोन माणसे आत आली. त्यांच्यातला एक टकला आणि एक जाड मिशीवाला होता.

"नमस्कार!! मी टकले आणि हे मिशाळ. आम्ही टकले मिशाळ लॅब्स मधून आलो आहोत" टकले म्हणाले.

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग १

२० जानेवारी २००८ ला माझे लग्न झाले... प्रेमविवाह असल्याने आम्ही खूप आधीपासूनच अनेक ठिकाणांची माहिती करून घेऊन मगच एका नामांकित टूर कंपनीच्या "बँकॉक-पत्तया स्पेशल" हनिमून टूर चे बुकिंग केले.२७जानेवारी ला आमचे रात्री १२ च्या विमानाचे बुकिंग झाले, आणि आम्ही आपल्याला एक उत्तम टूर मिळाली ह्या आनंदाने सुखावलो. आम्हाला सतत त्या टूर कंपनीच्या लोकांचे सतत फोन येत होते.... तुम्ही लवकर पासपोर्ट आणा...व्हिसा चे काम लवकर केले पाहिजे.... लग्नाला २ महिने होते... तरीही आम्ही घाईने त्यांना सगळी कागदपत्रे दिली... आणि आम्हाला अचानक एक दिवशी फोन आला की....."तुमची टूर पुढे ढकलली आहे.... आमच्याकडे तेवढे बुकिंग झाले नाही...." पुढची तारीख ३१जानेवारी आहे,,, आमचा पूर्ण विरस झाला..... ह्याला काय अर्थ आहे? शक्य नाही तर दर २ दिवसांनी परदेशातली टूर ठेवायची नाही.... आम्ही त्या लोकांशी खूप बोललो.... परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी ३०००० रुपये भरले आहेत ... म्हणून गप्प बसलो आणि आपली टूर ३१ चीच आहे अस समजायला लागलो. लग्नाच्या मूड चा विरस नव्हता करायचा....

एक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन

एक-चित्र यदृच्छय बिंदू बहुशिक्कारेखन म्हणजेच सिंगल इमेज रँडम डॉटस् स्टिरिओग्रॅम (सर्डस्) कलेचे एक उदाहरण इथे देत आहे. एका लग्नानिमित्त वधुवरांसाठी तयार केलेले हे शुभेच्छापत्र आहे. चित्र त्रि-मिती असल्याने ज्यांनी आधी कधी असे चित्र पाहिलेले आहे त्यांना पाहायला अडचण पडू नये. मात्र ज्यांनी त्रि-मिती चित्र कधीच पाहिलेले नाही त्यांना असे चित्र वाचावे कसे ते सांगतो. चित्र ज्या प्रतलावर आहे त्या प्रतलाखाली वीतभर अंतरावर ते साकार होते आहे असे समजून लक्ष केंद्रित (फोकस) केल्यास पृष्ठभाग पाण्यासारखा/काचेसारखा आरस्पानी होतो आणि त्याखाली त्रि-मित चित्र साकार होते.

स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग : १ )

मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते.

सेतू: ताजप (३)

  आर्टस, कॉमर्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. औरंगाबादला CEDTI ची प्रवेश परीक्षा दिली, जी ऑबजेक्टीव  टाईप असते, ती तो चांगल्या तर्‍हेने पास झाला. टेक्निकल विषय आवडायचे म्हणून तीन वर्षाच्या डिप्लोमासाठी त्याला आजीकडे औरंगाबादला ठेवलं. आता त्याच्यावर जास्त जबाबदारी होती. एटीकेटी होत वर्ष वाया न जाता प्रथम श्रेणीत डिप्लोमाची परीक्षा पास झाला. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता.  पुढे इंजिनियरिंग करायचं त्याचं त्यानेच ठरवलं. इथल्या इंजिनियरींगच्या डायरेक्ट दुसर्‍या वर्षाला ऍडमिशनही मिळाली.  इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये आर्मीसाठी निवड झाली.एसएसबी बेंगलोरहून इंटरव्ह्युवसाठी बोलावणं आलं एकशेपाच मुलांमधून ज्या चार मुलांची निवड झाली त्यातला एक मुलगा माझा निखिल होता. आता त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. पण विषय राहिल्यामुळे तेव्हा त्याला जाता आलं नाही.त्यानंतर त्याने दोन एसएसबीचे इंटरव्ह्युव अलाहाबादला दिले. ते दोन्ही इंटरव्ह्युव त्याने क्लिअर केले. आयएमए डेहराडूनला गेलाही पण एका महिन्यातच त्याला कळलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही त्यामुळे ते सोडून परत आला.  मग  पुण्यात एमबीएला एडमिशन घेतली.आता एमबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. बेंगलोरच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालंय मे महिन्यात जॉईन होणार आहे.

तप

                    आज सात-साडेसातशे वर्षे झाली तरी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी जनमानसावर अधिराज्य गाजवत आली आहे. कारण ह ग्रंथ आहे अक्षरसाहित्यात समाविष्ट झालेला. नित्यनूतनता हा अक्षर साहित्याचा एक विशेष आहे. काळपुरुषावर मात करून वर्षानुवर्षे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे साहित्य थोडे असते. अशा थोड्या साहित्यातील एक ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. या ग्रंथात प्रकट झालेले चिरंतन स्वरूपाचे विचार आपल्याल सतत नवी प्रेरणा देत आसतात. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नव्हे तर ते धर्मकीर्तन आहे. ज्ञानदेवांच्या वग्विलासाने भगवंतांनी जी रूपरेषा मांडली तिला स्पष्टार्थकता प्राप्त झाली आहे.

खरं सांगायचं म्हणजे ... (४)

मी करारी आहे तसा लहरी पण आहे, आणि मनाची लहर कधी कशी फिरेल ते सांगता यायचे नाही. एकदा आमच्याकडे श्राद्धानिमित्त वामनभट आले होते. श्राद्धामुळे जेवण सपाटून झाले होते आणि मला झोप येत होती. पण वामनभट आपले उगीचच पान तयार करीत आणि गप्पा मारीत वेळ काढीत होते.