महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती सार्थ आहेत, हे महाराष्ट्रात राहून नाही कळत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेर पडावं लागतं. दक्षिणेतलं माहित नाही. पण उत्तरेत गेल्यानंतर तर हा अभिमान रास्त नसून अत्यंत योग्य असल्याचा भाव आपोआप मनी दाटायला सुरवात होतो.