भीती

रात्रीचा तिनाचा सुमार. त्याच्या आलिशान बंगल्यातल्या स्विमिंग पुलामधलं पाणी वाऱ्याच्या झुळकेसरशी चुळुक चुळुक वाजत होतं. स्विमिंग पूलच्या शेजारीच दोन माणसं पेंगत बसली होती. बंगल्याच्या दरवाज्यापाशी आणखी दोघं होते. ते मात्र सावध होते. आपल्या अजस्र बेडरूममध्ये बिछान्यावर तो पडला होता. सगळीकडे साखरझोपेची बेदरकार शांतता पसरली होती आणि त्या प्रचंड बंगल्यातल्या कुठल्याश्या कोपऱ्यात असणाऱ्या घड्याळाने तिनाचे टोल दिले.

काही नाही ठीक

Luna TFRलुना टिएफआर

Luna Superलुना सुपर

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं - काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

अमेरिकायण! (भाग २० : लास वेगास १ - तोंडओळख)

हळूहळू उन्हाळा उतरू लागला होता. साऱ्या अमेरिकन सृष्टीला "फॉल" चे वेध लागले होते. हवेतला गारवा वाढला होता. ही वेळ वेगास जाण्यासाठी उत्तम असा विचार करून एक चांगला दीर्घ सप्ताहांत वेगासवारीसाठी राखून ठेवला. शिवाय एखादा दिवस सुट्टी टाकून एकूण चार साडेचार दिवसांचा जय्यत कार्यक्रम तयार झाला.
आम्ही नेहमीचेच (यशस्वी) कलाकार होतो. मी कार्यक्रम आखला असल्याने मी सोडून सारे निश्चिंत होते  . असो, अटलांटिक सिटी जर एक द्युतक्षेत्र असेल तर वेगास ही तर साक्षात द्यूतपंढरी!! इथला एकेक कसिनो म्हणजे मोठ्ठेच्या मोठ्ठे द्युतमहालच! न्यूयॉर्क वरून वेगास बरंच लांब. विमानाचा चार साडेचार तासांचा प्रवास होता. विमान जवळजवळ अख्खी अमेरिका पार करून दुसऱ्या टोकाला जाणार होतं.
विमानाने टेक ऑफ घेतला आणि नेहमीप्रमाणे भुरळ घालणारं न्यूयॉर्क बघता बघता आम्ही ढगाआड गेलो. हळूहळू ढग निवळले आणि खाली अमेरिकेचे वेगवेगळे भाग दिसू लागले. जसजसं जर्सी मागे पडलं तसतशी मध्य अमेरिकेतील शेती खालून जात होती. अनेक हेक्टरच्या हेक्टर जमीन ही शेतीखाली होती. आणि त्या उंचीवरून ते शेताचे गोल (हो! तिथे पट्टे नसून शेतजमीन गोलाकारात नांगरली होती. कारण कळले नाही  ) खूप सुंदर दिसत होते. इथे विमानाने फवारणी, पेरणी करावी लागते इतकी मोठी शेते असल्याचे ऐकून होतो. इतक्या उंचीवरूनही दूरदूरपर्यंत दिसणारी शेते खरोखरच प्रभावीत करून गेली.
पुढे शेताचा पट्टा (की टप्पा) संपला आणि पर्वतराजी सुरू झाली. हीच ती प्रसिद्ध रॉकी पर्वतराजी! दूरदूरपर्यंत आता केवळ दऱ्या आणि डोंगर दिसत होते. पण हे डोंगर छान हिरवेगार नसून अतिशय शुष्क आणि कोरडे आहेत. मधूनच नदी/तलाव असला की भोवती गर्द झाडी असते अन्यथा केवळ उघडे बोडके अक्राळ विक्राळ उंचच्या उंच पर्वत! हे पर्वत कमी कमी होऊ लागले पण दूरवर असणारा शुष्कपणा तसाच होता. एखादा प्रदेश वाळवंट असतो म्हणजे वाळूचे थरच्या थर असतात असा माझा बाळबोध समज या वाळवंटाने खोटा पाडला.
ह्या निर्जीव, शुष्क, भकास वाळवंटाकडे पाहत असतानाच "पट्टे आवळा"ची सूचना झाली. म्हटलं हे का इथे काहीच दिसत नाही आहे. साधारणतः शहर जवळ आलं की आधी छोटी छोटी नगरे खाली दिसू लागतात. पण इथे तर होतं केवळ वाळवंट. आणि अचानक त्या वाळवंटाच्या मधोमध एक नगर दिसू लागलं... वेगवेगळ्या इमारती, उंचच्या उंच टॉवर दिसू लागले आणि हे सारं डोळे भरून पाहायच्या आत विमानाने जमिनीला पंख टेकवलेसुद्धा!! वरून झालेल्या क्षणभर दर्शनाने एका 'माया'नगरीत शिरतोय याची खात्रीच झाली आणि त्या शहराला भेटायला सरसावलो.
अमेरिकेत फिरण्याचा उत्तम मार्ग म्हणजे  कुठेही गेल्यागेल्या गाडी भाड्याने घेणे. इथे बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांच्याकडून एका शहरात गाडी घ्यावी भरपूर चालवावी आणि काम झालं की जिथे असाल तिथल्या त्यांच्या केंद्रावर द्यावी. त्यात आम्हाला वेगास बरोबर ग्रँड कॅनियन पण करायचं असल्याने आम्ही विमानतळावरच ही गाडी घेतली. विमानतळापासून हॉटेलचा नकाशा बरोबर होताच. त्याआधारे शहराच्या अंतरंगात प्रवेश केला

सेतू: ताजप (२)

सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका खूपच चांगल्या होत्या.त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी एडमिशन देण्याच आश्वासन तर दिलंच शिवाय मनोविकार  तज्ज्ञांची मदत घ्यायचाही सल्ला दिला. तोपर्यंत आम्हाला अश्या समस्येबाबत मनोविकार तज्ज्ञांची मदत होऊ शकते हे माहीतच नव्हतं. आम्ही मनोविकार तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी आम्हाला समुपदेशक अनुपमा गडकरी ह्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी निखिलच्या सगळ्या टेस्ट केल्या व हा डिसलेक्झिक असल्याचं सांगितलं. पण योग्य व जरा वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर सुधारणा होऊ शकते हा विश्वास दिला. हे सगळे रिपोर्टस घेऊन मनोव्कार तज्ज्ञाकडे गेलो त्यांनी आम्हाला एमआरआय करायला सांगितलं ही टेस्ट खूपच महाग होती व त्यावर उपाय तज्ञ काही सांगू शकले नाही म्हणून आम्ही न्युरोसर्जनकडे गेलो.आधी तर त्यांना  हसूच आले. समजा काही दोष असेलच तर त्यावर काहीच उपचार नाहीयेत तेव्हा  ही टेस्ट न करण्याचा सल्ला दिला.

कोटीच्या-कोटी: भाग-७

                                        कोटीच्या-कोटी: भाग-७

* ’सल्लागार’ ची सोन्याने केलेली व्याख्या: असा काही ’सल्ला’ देणारे लोक, की समोरचा ’गार’ होतो!
              ************

खरं सांगायचं म्हणजे ... (३)

मी हाक मारली, " लॉर्ड माउंटबॅटन ! "

" ओ. "

"खाली ठेवा तो चीजचा डबा ! "

" हा ठेवलाच. चहा मागवू का ? " लॉर्ड माउंटबॅटन अदबीने म्हणाले.

" कसली पावडर वापरता ? "

" लिप्टन. हिरवे लेबल. "

" बरे, चालेल. पण ह्यापुढे गुलाबी मिक्श्चर वापरत चला. "

का कल्लोळ कल्लोळ - 'देवराई'

माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे ज्ञान मर्यादितच आहे. मनोरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही फारसा बदललेला नाही. भारतात तर नाहीच नाही.

स्किझोफ्रेनिया किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व हा असाच एक गंभीर मानसिक आजार. 'देवराई' मधला शेष देसाईला हा आजार झाला  आहे. मुळातच काहीसा एककल्ली, आत्ममग्न, सतत कसला ना कसला विचार करत राहणारा, पण अतिशय बुद्धीमान असा हा शेष हळूहळू जास्तजास्त चिडचिडा, तापट होत गेला आहे. त्याचे वडील लहानपणीच गेलेले, आई आणि धाकटी बहीण सीना, एवढेच त्यांचे कुटुंब. पण शेषची खरी जवळीक आहे ती कल्याणीशी. कल्याणी शेष आणि सीनाची मामेबहीण. तिची आई गेल्यावर ती तिच्या आत्याकडे, शेष आणि सीनाच्या आईकडेच वाढली आहे. कल्याणी, शेष आणि सीना यांचे बालपण कोकणातल्या त्या गावात मोठ्या मजेत गेले आहे. गावाजवळ देवराई आहे. देवराई म्हणजे सेक्रेड ग्रोव्ह - देवाच्या नावाने वाढलेले, वाढवलेले जंगल. ते तोडायचे नसते. लहानपणापासून शेषला देवराईचे वेड आहे.त्यातच वाडीवर काम करणाऱ्या पार्वतीमध्येही शेषची काही चमत्कारिक भावनिक गुंतवणूक झाली आहे, पण पार्वतीचे गावातल्यच शंभूशी लग्न झाले आणि शेषचे सगळे बिनसायला सुरुवात झाली. शंभू दिसायला दांडगा, पार्वती एवढीशी, नाजूक. शेषचा विक्षिप्तपणा वाढतच गेला. त्यातच परिस्थितीने असे काही चमत्कारिक वळण घेतले की कल्याणीला ताबडतोब तिथून निघून जावे लागले. सीनाचेही लग्न झाले. मुळात एकांडा असलेला शेष आता पार एकाकी झाला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. त्याला जे मनापासून करायचे होते, ते देवराईवरचे संशोधन तसेच राहिले. लग्न वगैरे झाले नाहीच. मुळात अतिशय बुद्धीमान असलेलेया शेषच्या आयुष्याची अशी वाताहात झाली. त्याच्या मनात विचारांचा, कल्पनांचा एक भलामोठा गुंता झाला. त्याच्या मनातल्या दोन हळव्या बिंदूंची - पार्वतीची आणि देवराईची - गल्लत होऊ लागली. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यात देवराई तोडली जाणार असे ऐकताच तर शेषचा स्फोटच झाला. देवराई? की पार्वती? देवराई तोडणार? म्हणजे पार्वतीला मारणार? कोण? शंभू? मग हे सगळं सांगायचं कुणाला? सीना? कल्याणी? पार्वती? देवराई....

सेतू: ताजप (१)

"आई, आज मी 'ताजप' बघितला. रूमवर येऊन खूप रडलो. असं वाटलं आपली स्टोरी आमिरखानला कशी काय कळली. तुम्ही नक्की पाहा."

"खरं सांगू, मला पहायची हिम्मतच होत नाहीये. आपण केलेल्या चुका परत आपल्या डोळ्यासमोर दिसतील."

"आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. बारा वर्षापूर्वी लोकांना अशी काही अक्षमता असते हे माहीत सुद्धा नव्हतं. तुम्ही योग्य ती पावलं उचलली आणि मला त्याचा फायदाही झालाय. हो किनई?"

गती आणि प्रगती.........एक कथा

आज स्वारी.. लवकर ??
मनीनं दरवाजा उघडत विचारलं
हो, गं.... मिंटीग्स आज लवकरच आटपल्या !
चला म्हणजे, आज सगळे एकत्र तरी जेऊ....
हो... राणीसरकार आज तुम्ही म्हणाल तसं...!!
पुरे पुरे, हा...फ़्रेश होऊन या तोपर्यंत मी पोळ्या! लाटून घेते....
बरं.....म्हणत बॅग ठेउन मी बाथरुमकडे मोर्चा वळवला.....

हिंदुस्तान टाईम्सचे नवे संशोधन - रामायणात धृतराष्ट्र

गेली काही हजार वर्षे आपण अज्ञ भारतीय रामायणात राजा दशरथ व त्याच्या तीन
राण्या होत्या हे ऐकून-वाचून होतो. पण आपले हे घोर अज्ञान दूर करण्याचे
पुण्यकर्म मुंबईतील एक अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्र 'हिंदुस्तान टाईम्स"
व त्यात लिहिणाऱ्या विदुषी शोनाली गांगुली यांनी Where is the magic?
या लेखात आज केले आहे. दूरदर्शनवरील नव्या रामायण मालिकेच्या संदर्भातील
लेखाच्या पहिल्याच वाक्यात 'राजा धृतराष्ट्र आणि त्याच्या तीन राण्या' असे
वाचून मी अडखळलो. अजून तेव्हढे वय झाले नाही म्हणून नाहीतर 'कवळी बाहेर
पडली' असेच लिहिले असते! आजकाल रामायण-महाभारताबद्दल तरुणांना फारसे माहीत
नसते हे वादापुरते गृहीत धरले तरीही कल्पनेची ही झेप सामान्य भारतीयांना
झेपण्यापलीकडची आहे . वर्तमानपत्रात बाय-लाइन मिळणे ही एके काळी
वार्ताहरांसाठी अभिमानाची बाब होती, त्यासाठी मेहनत व अभ्यास लागायचा.
हल्ली बाय-लाइन बहुधा खिरापतीप्रमाणे वाटतात. अशा 'लेखकांना' व त्यांनी
तोडलेले असले अकलेचे तारे छापणाऱ्या उच्चविद्याविभूषित संपादकांना शाहरुख
खानच्या येऊ घातलेल्या "पांचवी पास" या कार्यक्रमात पाठवावे काय?