राजाला लवकरच लक्षात आलं...

आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. होता मनाचे फ़ार चांगला पण थोडासा लहरी. एकदा काय झालं त्याच्या डोक्यात आलं की आपला देश जगातला सगळ्यात बलाढ्य आणि संपन्न देश म्हणवला गेला पाहिजे. पण सध्या तिजोरीत काहीच नव्हतं झालं!! त्याने फतवा काढला, यापूढे आपल्या देशाला संपन्न श्रीमंत करणं ही प्रत्येक सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे. यापुढे प्रत्येकाने विविध नियम पाळणं बंधनकारक आहे.  कोणीही ३००० मुद्रांपेक्षा अधिक कमावत असल्यास त्यावरिल मिळकत सरकारी तिजोरीत जमा केली जाईल... सैन्यात प्रत्येक युवकाला किमान ५ वर्षे भरती व्हावे लागेल... इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी..

एका रात्रीची गोष्ट!

गेलेल्या लोकलकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून पंकजाने पायर्‍या चढायला सुरुवात केली. खाड खाड खाड...रिकाम्या स्थानकात तिच्या बुटांचा आवाज घुमू लागला. लोकलमधून उतरलेले चार-पाचजण केव्हाच निघून गेले होते. स्थानक रक्षकही दृष्टीपथात नव्हता. मघाशी पायर्‍या उतरताना एकाऐवजी दोन दोन पायर्‍या एकदम उतरल्या असत्या तर शेवटची लोकल चुकली नसती, तिला वाटून गेले. पण लोकल चुकण्याचे खरे कारण ती जाणून होती. तिला ही आठवडाअखेर अगदी रिकामी हवी होती, मग शुक्रवारी कितीही वेळ काम करायची तयारी होती. घरी काम नेता आले असते पण घरी जाताच ती अतिश्रमाने आडवीच होई. नंतर उठून पुन्हा धागेदोरे शोधून 'प्रकल्प सद्यस्थिती' आणि 'प्रकल्पातील धोके व्यवस्थापन' हे दोन  रिपोर्ट पूर्ण करणे तिला जड गेले असते. आज संध्याकाळची ग्राहकाबरोबरची बैठक मनात ताजी असतानाच ते करायला हवे होते. 'प्रकल्पाची सद्यस्थिती' फारच गंभीर होती. 'मर्फी'च्या नियमानुसार जे जे चुकू शकते ते ते सर्व चुकलेले होते. सर्वावर कडी म्हणजे 'प्रकल्पातील धोके' या आधीच्या रिपोर्टमधे नसलेला धोका खुद्द प्रकल्प व्यवस्थापकाने दिला होता! बुडते जहाज सोडून त्याने चक्क पळ काढला होता! कदाचित तिच्या सचोटीवर विसंबूनच त्याने पलायनाचा निर्णय घेतला असावा! कुठल्याही परिस्थितीत पंकजा या प्रकल्पाची तड लावल्याशिवाय रहाणार नाही हे त्याला माहीत होते. कंपनीच्या तत्पर व्यवस्थापनाने ताबडतोब 'नगास नग' या न्यायाने दुसर्‍या एका प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती केली होती, पण तो खरोखरच नग निघाला! त्याला 'प्रकल्पाची सद्यस्थिती' समजावून सांगण्यातच तिचा निम्मा दिवस जाई. तिने तक्रार करताच 'प्रकल्पाचे व्यवस्थापन तिने स्वतःच हाती घ्यावे' असा सल्ला तिला मिळाला होता. त्यामुळे ती सध्या दूरदेशातल्या उंटावर राहून बंगळूरातल्या शेळ्या हाकीत होती. बंगळूरातल्या आपल्या चमूची आठवण होताच तिला जरा बरे वाटले. शिवा आणि बिपीन नक्की असतील अजून कार्यालयात... आज ते संगणक प्रणालीला नवीन ठिगळ जोडणार होते. त्यामुळे आपले नव्वद टक्के काम होईल असे त्यांनी तिला आश्वासन दिले होते. फारच उत्साही होते ते दोघे! तिच्या मागच्या प्रकल्पातही ते होते आणि त्यांच्या कामगिरीवर खूष होऊन या प्रकल्पासाठी तिने त्यांना मागून घेतले होते. बाकीच्या चमूपैकी अकराजण फक्त दिलेले काम चोख करत आणि चार तेही नीट करत नसत. त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलले पाहिजे, तिच्या मनाने नोंद घेतली. ती इथे आल्यापासून परिस्थितीत निश्चितच सकारात्मक बदल होत होता. ग्राहकाला दोन पावले मागे सरकवून आणि प्रकल्पाला चार पावले पुढे सरकवून तिने बरीच पेनल्टी वाचवली होती!

पुणे - कुठे काय खावे......

मला माहिती नाही की हा विषय ह्या आधी चर्चिला गेला आहे की नाही ते. मी इथे पुण्यात कुठे काय खायला चांगल मिळतं ते सांगतो.  कृपया तुम्हीपण तुम्हाला माहित असलेली खास ठिकाण नमूद करा.

  • बिपीन स्नॅक्स, गरवारे कॉलेज समोर, कर्वे रोड.

          शिरा, पोहे, उपमा, खिचडी/खिचडी-काकडी, वडा पाव, पाव-पॅटिस, चहा.

सोयरा - ६

"टेन पर्सेंट ऑफ अ लॅबओनर्स डाएट इज हेअर" असं एका पुस्तकात लिहिलंय. त्यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी सोयराच्या केसांच्या सर्वव्यापीपणाचा अंदाज यायला हे वाक्य पुरेसं आहे. आमच्या फिकट फरशांवर तिचे पांढरे केस खपून जातात म्हणून, नाहीतर आम्हाला दिवसरात्र न्हाव्याच्या दुकानात वावरण्याचा प्रत्यय आला असता. या एका कारणास्तव सोयरा काळी नाहीये याचं मला नेहमी समाधान वाटतं.

खिडकीतून डोकावतांना

खिडकीतून डोकावतांना

                               बालपणापासून ज्या गोष्टी मला आवडतात त्यांच्या यादीमध्ये  खिडकीला विसरून चालणार नाही. खिडकीतून अलगद  मनात शिरलेल्या  आठवणी अजूनही परीटघडीच्या कपड्याप्रमाणे जशाच्या तशा नीटनेटक्या आहेत.   मोठी झाले तरीही मी कित्येकदा जेवायचे ते सुद्धा खिडकीत बसून .    तिसरी चौथीत गेले तरी कधी कधी हट्टाने मी आईला मला तूच भरव असा आग्रह करत असे. असेच एकदा माझे जेवण सुरु असतांना  खिडकीत एक मोठ्ठा कावळा आला. खिडकीच्या गजाला चोच मारणाऱ्या  कावळ्याला पाहून मी घाबरले अन् गडबडीत धपकन खाली पडले. पण  तेवढ्याने खिडकीत बसण्याचा नाद  मात्र कमी झाला नाही. आयुष्याच्या प्रवासात  खिडकी मला भेटतच राहिली; विविध वाटांवर,वेगवेगळ्या रूपात!

कुपन आणि अन्नदान

खुप वर्षांपुर्विची गोष्ट आहे. माझे  बाबा परभणीला राहत होते. तेव्हा ते एकटेच असल्याने त्यांनी मेस लावली होती. त्या मेसमध्ये कुपन सिस्टीम होती आणि बाबांचे एका महिन्यात जवळ जवळ १६ ते १८ कुपन्स राहिले होते. त्या मेसवाल्याने कुपन्स कॅरि फॉर्वरवर्ड करण्याचे कबुल केले होते.

अंकुर

तिच्यएकेक

मी माझ्या मैत्रिणीच्या घरून येत होतो. तिच्या भावाला काहीतरी घ्यायचं होत म्हणून तो दुकानात गेला. मी माझ्या स्कूटरवर उभा होतो.समोरून  एक खास "ठेवणीतलं" करुण हास्य घेऊन ५/६ वर्षांची मुलगी फ़ाटक्या कपड्यात, कडेवर १-दीड वर्षांच्या शेंबड्या मुलाला घेऊन समोर आली. ती मला बघून भीक मागू लागली.मी नाटकात काम करत असल्याने तिच ते खास भीक मागण्यासाठीच करुण हास्य मला कळाल होत.मी केवळ तिच्याकडे बघत होतो. ती मात्र चिकाटीने मला भीक मागत होती. मला काय सुचल माहीत नाही, मी एकदम तिला म्हटंल,"गाडी पूस तर ५रू देतो." ती नुसतीच बघून हसत होती आणि हात पुढे करत होती. २-३ वेळा अस झालं मग मला कळाल तिला बहुतेक मराठी येत नसावं. मी हिंदीत विचारल "गाडी साफ़ करेगी क्या?५ रूपये दुंगा" ती तशीच उभी या आशेत की हा बाबा आता तरी काही तरी देईल. तिची ती चिकाटी बघूनच लोक तिला भीक घालत असणार! तिच्या कडेवरच मूल आता चुळबूळ करायला लागलेल.मी तिला परत एकदा विचारल. तिने शेवटी त्याला खाली सोडल आणि ती पुढे आली. मी तिला गाडीतून कपडा काढून दिला आणि तिच्याकडून सगळी गाडी व्यवस्थित पुसून घेतली. तिनेही गाडी बरी पुसली. जेव्हा गाडी पुसून झाली आणि मी तिला ५रूपये दिले,तिच्या चेहरयावर हसू उमटल . ते हसू वेगळ होत.त्यात एक आंनद दिसला.यानंतर मी तिला कधी पाहिलंही नाही...

पद्म

यापूर्वी दि. बा. मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' या कथेसंबंधी लिहिले होते. गुणवत्ता असूनही प्रसिद्धीचे, लोकप्रियतेचे जेवढे पडायला हवे तेवढे माप, दुर्दैवाने पदरात न पडलेले मोकाशींप्रमाणेच श्री. दा. पानवलकर हेही एक समर्थ कथालेखक. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या अर्धसत्य या चित्रपटाची पटकथा ज्या 'सूर्य' या कथेवर बेतली आहे; तिचेच नाव पानवलकरांच्या एका कथासंग्रहाला दिले आहे. त्यातील 'पद्म' ही कथा नुकतीच वाचनात आली. वर उल्लेख केलेल्या मोकाशींच्या कथेच्याच तोलामोलाची. छोटेखानी असल्याने ती पूर्ण स्वरुपात येथे देत आहे. हाच लेख येथेही वाचता येईल.

वहातुकीचे नियम का पाळावेत?

मी मुळचा पुण्याचा.

पण सध्या नोकरी निमित्त जोहान्सबर्ग, दक्षिण आफ़्रिका.

इथे मला भावली ती म्हणजे वहातुकीचे नियम पाळणारी माणसे.

अगदी रात्री १ वा. सुद्धा.

कुठेही हवालदार नाही.कुठल्याही गल्ली मधुन कोणी एकदम रस्त्यावर येत नाही.