आपल्या हिंदू धर्मात असंख्य शास्त्रे आहेत. हिंदू धर्मातील जाती व पोटजातीप्रमाणे त्या त्या शास्त्राच्या आचरणात खूप विविधता दिसून येते. हि शास्त्रे जेव्हा बनवली गेली तेव्हाचा काळ, लोकसंख्या, जीवनमान, लोकांची विचार करण्याची पद्धत आजच्यापेक्षा पूर्णं निराळी होती. त्या काळी शास्त्राप्रमाणे आचरण समाजजीवनाला सहाय्यभूत ठरत असे (काही अपवाद वगळता. जसे सती जाणे, केशवपण इ. ) आजच्या २१व्या शतकात काही बाबतीत शास्त्राप्रमाणे आचरण खरेच तपासून पाहावे असे वाटते.
इथे नमुन्यादाखल शास्त्रातील काही चालीरीती मांडल्या आहेत. त्यावर मी त्यामागील कारण नमूद करत आहे. मी लिहिलेली कारणे ही सर्वस्वी शक्यता ह्या वर्गवारीत येतात. ह्याला कुठल्याही लिखित स्वरूपाचा आधार नाही. (मला तरी आढळला नाही)
१. रात्री केर काढू नये. संपत्ती जाते.
२. रात्री नखे काढू नयेत.
३. शनिवारी नखे काढू नयेत / केस कापू नयेत.
४. शौचास जाऊन आल्यानंतर पाय धुवावेत.
पण खालील गोष्टींबाबत कारण मला समजत नाही.
१. बुधवारी व शनिवारी तेल व मीठ आणू नये.
२. मीठ एकमेकाला हाताने देऊ नये. भांडण होते.
३. केरसुणी उभी / आडवी ठेवू नये.
कृपया मनोगतींनी ह्यावर आपले निखळ मत नोंदवावे. आपल्याला खरेच असे वाटते का? असे वागल्याने व काळाच्या कसोटीवर आपले शास्त्र पारखून त्यात बदल केल्याने आपला फायदा होईल की तोटा?
(कळकळीची विनंती: इथे फक्त शास्त्रावरच चर्चा व्हावी. ती कोणी निर्माण केली, त्यांचे वागणे कसे होते / आहे ह्यावर नको.)