गिरणी संप-मुंबईची अधोगती

नमस्कार, 


            गिरणी संपामुळे मुंबईची अधोगती झाली असे वाटते. मुंबईतुन मराठी माणुस कमी होण्याचे एकमेव कारण म्हणजे गिरणी संप असे वाटते. ह्या गिरणी संपाला जबाबदार कोण होते? सांगा .गिरण्या नंतर का सुरु झाल्या नाही.?

मुक्काम वानवडी

 पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत  आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.

शंकरपाळे

वाढणी
१पोळ्यांचा डबा भरून शंकरपाळे होतात.

पाककृतीला लागणारा वेळ
150

जिन्नस

  • १ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,
  • १ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा,तळणीसाठी तूप/तेल

मार्गदर्शन
तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.

टीपा
मी आजच या पद्धतीने शंकरपाळे करून पाहिले,खूपच खुसखुशीत झाले आहेत.म्हणून मनोगतींसाठी ही पा.कृ. इथे लिहिली..

माझ्या आठवणीतली दिवाळी

दिवाळी जवळ आली की आमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारायचा. आमच्या घरादाराचे रंगरूप उजळायचे. सर्वात प्रथम म्हणजे घराला रंग. घरामध्ये एक भली मोठी लाकडी मांडणी  व दुभत्याचे कपाट होते, लाकडी पाट होते, तेही रंगवले जायचे. मग घरातल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई. त्यावेळी पितळेचे डबे असायचे ते चिंचेने घासून लखलखीत व्हायचे. फरशी पण धो धो पाण्याने धुतली जायची. ही सर्व घराची प्राथमिक साफसफाई झाली की मग वाण्याची लांबलचक यादी, कारण आई मोठ्या उत्साहाने व आनंदाने लाडू चिवड्यापासून ते अगदी अनारसे कडबोळीपर्यंत सर्व पदार्थ करायची आणि ते सुद्धा मुबलक प्रमाणात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पदार्थ करत बसायचो, मग त्याचा सुटणारा घमघमाट व प्रत्येक पदार्थाची चव पाहणे.

दीपावली शुभेच्छा!

सर्व मनोगतींना,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जयन्ता५२
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शु