सिद्धगड..

ट्रेकिंगमधल्या कसलेल्या सिद्धांचा गड तो सिद्धगड असे वर्णन वाचले होते सिद्धगडाचे, त्यामुळे तिकडे जाण्याचे बरेच दिवस मनात होते. पण दोन दिवसांचा हा ट्रेक एका दिवसात वा रात्र-दिवसात कसा बसवावा असा प्रश्न होताच.


अखेर शनिवारी १ जुलैला गिरी, कूल, आरती, भक्ती, मिहिर आणि मी असे पाच जण सायंकाळी पाचच्या नागरकोईल एक्सप्रेसने पुण्याहून निघालो. कल्याणला इंद्र ( दत्तराज ) आणि नरेश आम्हाला भेटणार होते.  आम्हाला नारिवली या गावी जायचे होते. तिथे कर्जतहून जाणे हे पुणेकरांना जवळचे आहे पण तशा सोयीस्कर बस नाहीत संध्याकाळी पाचनंतर.

प्रतिसाद उघडत नाही

'मनोगत'वर आज प्रतिसाद उघडत नाहीत. टिचक्या मारून मारून हात दुखला, कळफलकाला तडे जाण्याची वेळ आली! इतर कोणाला ही अडचण/ हा अनुभव आली/आला  आहे का? की हे माझ्याच संगणकाचे प्रताप आहेत?

स्त्रियान्च्या सामाजिक समस्या

स्त्रियन्च्या सामजिक समस्या हा खर तर फ़ार गहन विषय आहे. त्यापैकि एखाद्या समस्येवर मनोगत वर चर्चा व्हावी. असे माझे मत आहे. उदा. भारतिय समजात असलेले स्त्रियान्चे सामजिक स्थान.

सल (भाग- २)

सल (भाग- १) वरुन पुढे चालू.


-------


दुसऱ्या दिवशी सकाळच्या एकाही लेक्चरला मीता हजर नव्हती. दुपारी प्रॅक्टीकलला ती आली पण आपल्याच विचारांत हरवलेली होती.


"मीता, मला बोलायचय तुझ्याशी, आपण नंतर कॅन्टीन मधे भेटू."
ठरवल्याप्रमाणे मीता कॅन्टीन मधे आली. मी तिला रियाझ बद्दल छेडलं. कुठे भेटला, काय करतो, हे घरी चालणार आहे का? अनेक प्रश्न विचारले.

मृत्यांगण बाबत खुलासा. इच्छामरण की वैताग-खून !

मृत्यूचे कटू सत्य सांगणे, वाचणाऱ्याला अस्वस्थ करुन सोडणे किंवा उगाचच लेखनाचा नवीन प्रकार वगैरे शोधण्याचा शिष्टपणा करणे यापैकी मृत्यांगण लिहिण्याचा कोणताही उद्देश नाही. एका प्रेताची आत्मकथा हा भाग या ठिकाणी होऊ शकतो. परंतु मृत्यांगण लिहिण्याचा मूळ उद्देश आहे. इच्छा मरणावर प्रकाशझोत टाकण्याचा. पण या ठिकाणी इंजेक्‍शन देऊन म्हाताऱ्याला मृत्यू देण्यात आलेला आहे. त्यामुळे इच्छामरण हा प्रकार म्हाताऱ्याच्या बाजूने लागू होत नाही. किंबहुना त्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि त्याला होणारा त्रास इतका पराकोटीचा आहे की तो त्याला कुठेतरी सहन होत नाहीच परंतु त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांनाही तो सहन होत नाही. बघवत नाही. परंतु समाजातील दृश्‍य मात्र फारच वेगळे दिसते. म्हातारी माणसं अंथरूणावर खिळली, आणि त्याच्या कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्याचे बेडपॅन वगैरे गोष्टी करणे त्याच्या जीवावर येऊ लागते. विशेषत: जेव्हा ही म्हातारी मंडळी जास्त काळ आजारी असतात (अर्थात त्यांचा अंतिम समय जवळ आलेला असतो हे बहुतेकवेळा त्याच्यासह सर्वांना माहित असते) त्यावेळेस ही आजूबाजूच्यांची ही अस्वस्थता जास्तच बघायला मिळते. सर्वच लोकांच्या बाबतील असे होते हे म्हणणे अतिधाडसाचे होईल. त्याला अपवाद असतातच. परंतु केवळ आपल्याला आपला संसार, नोकरी-उद्योग वगैरे दैनंदिन कामे आहेत व म्हाताऱ्यांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही म्हणून आणि म्हाताऱ्यांना आजाराचा त्रास होतोय असे वाटून घेऊन त्यांना डॉक्‍टरी ( बहुदा नातेवाईक किंवा ओळखीचे डॉक्‍टर) सल्ल्याने, इंजेक्‍शन सारख्या उपायांनी अशा व्यक्तिंचे जीवन संपविणे ही एकप्रकारची खूनशी प्रवृत्ती आहे. आणि जेव्हा पोटची मुलेच अशा कृत्याला उद्युक्त होतात तेव्हा त्या दुर्दैवीपणाला काय नाव द्यावे. कायद्यानुसार इच्छामरणाच्या काय व्याख्या आहेत या वादात इथे पडायचे नाही. परंतु एक गोष्ट मात्र मला पूर्णपणे कळते की पाळीव जनावर म्हातारे झाल्यावर खाटकाकडे देणे काय? आणि आईबाप मृत्यूशय्येवर असताना लवकर मरावे म्हणून डॉक्‍टरी उपाय योजने काय ? यात भयानक स्वार्थी आणि अमानुष वृत्तीच दिसून येते. विशेष म्हणजे समाजात हे घडत असते. घडत आहे. मी काही खंदा, हाडाचा किंवा सिदध हस्त लेखक नाही. मी एक पत्रकार आहे. आणि समाजात जे काही विपर्यास्त चालते ते मांडावे असे मला वाटले आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच. एवढा दीर्घ खूलासा करून आपला वेळ घेतल्याबद्दल मी दिलगीर आहे.
कळावे
आपला मनोगती
पंकज प्र. जोशी

वा शालिनीताई काय बोललात

आरक्षण विरोधी भूमिका घेत आपले मत परिणामांची तमा न बाळगता मांडल्या बद्दल शालिनीताईंचे अभिनंदन!


ख्ररेच हे कोणीतरी बोलायलाच हवे होते कीः


देशाची घटना ही काही आंबेडकरांनी एकट्यांनी एक हाती लिहलेली नाही, त्यासाठी ईतरही २५ जणांनी मेहनत घेतली आहे.

ऐकावे ते नवलच- युरोपातील पूल

               औद्योगिक क्रांतीच्या काळादरम्यान आणि महायुद्धाच्या आधी युरोपात बरेच पूल बांधले गेले.त्यापैकी काही निवडक पुलांची माहिती येथे देणार आहे.   हे सर्व पूल स्थापत्यशास्त्रासाठी एक मोठा टप्पा होते असेच म्हणावे लागेल.  वर्णने कंटाळवाणी वाटू नयेत म्हणून थोडकयात माहिती देण्याचा प्रयत्न राहील. ज्या वाचकांना पुलांच्या स्थापत्यशास्त्राचा अधिक अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता मालिकेच्या शेवटी देलेली काही पुस्तकांची नावे आणि माहितीस्थळे  उपयोगी पडतील.

जामखिंडीकरांचा बोका!(२)

"बापरे लंपू! आपल्या लक्षातच नाही आलं.आपणजामखिंडीकरांच्या पेरूच्या झाडावर चढलो..." जन्याचा भितीने अगदी धूर निघाला होता. जामखिंडीकर असं म्हटलं की सगळी पोरं अशीच घाबरणार. त्यांच्या भितीने आम्ही मैदानाच्या दुसऱ्या अर्ध्या भागात क्रिकेट खेळायचो. जामखिंडीकरांचा बंगला खूप मोठा होता. त्यांच्या आवारात खूप झाडं होती. त्यांची बाग सतत फुललेली असे. त्यांच्या शेजारच्या घरात राहणारा शिऱ्या आम्हाला त्यांच्या एकेक चमत्कारिक गोष्टी रंगवून सांगायचा. गावातल्या घसरगुंडीवरच्या जागेत बसून शिऱ्या जामखिंडीकरांची गोष्ट सांगायला लागला की सगळी पोरं डोळे मोठे करून ऐकणार. त्यांच्या घरून रात्री चेटकिणींच्या खिदळण्याचे आवाज यायचे म्हणे. रात्री-बेरात्री त्यांच्या बागेतले दिवे अचानक लागायचे. कधी भर दुपारी त्यांच्या बागेतून धूर यायचा.त्यांची सून हातात कायम काळे गंडे बांधून हिंडायची. शिऱ्याने तर त्याच्या दादाच्या खिडकीतून एक दिवस या सुनेच्या खोलीतून येणारे हसण्याचे आणि पुटपुटण्याचे आवाज स्वतः ऐकले होते म्हणे... सगळी पोरं त्यांच्या घराशेजारून जाताना राम राम राम म्हणणार. क्रिकेट खेळताना चुकून त्यांच्या घरात बॉल गेला तर पोरं क्रिकेट सोडून घरी जाणार. एकदाच मी माझा बॉल आणायला त्या कुंपणातून आत गेलो होतो. जामखिंडीकर आजोबा नळी लावून बागेला पाणी घालत होतो. त्यांना डोक्याच्या मध्यावर हे मोठंसं टक्कल. डोळ्यांवर मोठ्या काळ्या काड्यांचा जाड भिंगांचा चष्मा. गळ्यात जानवं घालून उघडेबंब आजोबा बागेत रोज पाणी घालायचे.कधी कधी त्यांच्या गॅलरीतून आमचा खेळ पण पहायचे. पण ते खेळ पहायला आले की आमचा खेळ काही रंगायचा नाही. मग एकेकाला तहान लागणार आणि खेळ असाच सोडून आम्ही घरी जाणार. घरी पोचेपर्यंत सगळे राम राम राम म्हणणार. दुसऱ्या दिवशी शिऱ्या काल रात्री त्या घरात आपण काय पाह्यलं हे आम्हाला वर्णन करून सांगणार.... मी त्यांच्या फाटकातून आत गेलो तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. एका पांढऱ्या शुभ्र फुलांनी लगडलेल्या झाडापाशी हातातली पाण्याची नळी धरून ते शेजारच्या अशोकाचा उंचच उंच गेलेला शेंडा न्याहाळत होती आअणि तोंडाने , मोठ्याने "बहुत दिन नच भेटलो सुंदरीला.." असं गाणं म्हणत होते.
"आजोबा..."
"कोण रे तू बाळ? नाव काय तुझं?"
"अं.. लंपन"
"वा वा.. पेटी तूच वाजवतोस वाट्टं..."
"हो..."
"काय हवंय तुला बाळ?"
"आमचा बॉल आलाय तुमच्या कुंपणात..."
"अस्सं होय!  सदानंद... अरे सदानंद.." आतून आजोबांचा मुलगा बाहेर आला
"काय झालं अप्पा?"
"अरे हा लंपन. परवा आपले गुरुजी म्हणत होते ना... पेटी वाजवतो. आपल्या नानांचा नातू रे!"
"अरे वा! हाच का छान छान..."
"अरे त्याचा बॉल आला आहे म्हणाला कुंपणावरून... जरा शोधून देतोस?"
"एवढंच ना... देतो थांबा हं..."
सदानंदाने मला बॉल आणून दिला. तो घेऊन मी बाहेर पळालो.
"अरे अरे जरा थांब..." अप्पा मला हाक मारत होते. पण मी धूम ठोकली होती. मला यायला इतका वेळ लागलेला पाहून आमची सेना भितीने अर्धमेली झाली होती. 
मग आम्ही मैदानाचा  तो भाग टाळायलाच सुरुवात केली.
 " ए लंपू....खूप दुखतंय का रे?" जन्याने मला पालथ्याचं उताणं केलं. माझ्या डोक्यात पाचशे बहात्तर डास एकदम गुण्गुणताहेत असं वाटत होतं. मी बोलायला तोंड उघडलं तर मला बोलताच येईना. जन्या जाम घाबराला. त्याने धूम पळा जाऊन शिऱ्याला बोलावून आणलं. मग शिऱ्या आणि त्याचा दादा यांनी मला धरून घरी आणलं. माझं चिखलाने माखलेलं ध्यान पाहून आजी जाम घाबरली.  तिने बाबूरावांना डॉक्टरांना आणायला पिटाळलं. मग डॉक्टर आले. त्यांनी जखमा बांधल्या. औषध दिले. चार दिवस अंथरुणावरून उठायचं नाही अशी ताकीद दिली.
आजी माझ्या उशाशी बसून खूप रडली. मग तिने गरम पाण्यात पंचा बुडवून माझं अंग शेकून काढलं. आणि मग मला इथे माझ्या खोलीत झोपवलं. या सगळ्या गोंधळात मी का आणि कसा पडलो हे जन्याने आजीला सांगितलं नसावं कारण अजून तरी तिने माझ्यावर तोंडाचा पट्टा सोडला नव्हता....
मी खिडकीबाहेर पाहिलं तर पाऊस आता गुलाबदाणीतून गुलाबपाणी शिंपडलं की कसे शिंतोडे पडतात तसा येत होता. बहुतेक त्याची आजी झोपली असेल आणि अभ्यास सोडून त्याला पळून जायचं असेल.
"लंपन... झाली का रे झोप?" माझ्यासाठी औषध, गरमागरम सांज्याची बशी आणि हळद घालून गरम दूध घेऊन आजी वर आली होती. "हे औषध घे आणि बघ जरा उठून बसता येतंय का ते. आई येईल तुझी दोन दिवसांनी इकडे ..."
आई येणार म्हणून मला खूप आनंद झाला. आई आली की मला कोणीच रागावायचं नाही. आई आणि आजी दोघी एकमेकींपासून मला वाचवायच्या... मी तिची गोधडी पांघरून पलंगावरच उठून बसलो. मला अगदी बरं वाटत होतं.
"ए आजी मला इथे वर कंटाळा आलाय खूप... मी खाली येऊ जरा वेळ?" मी तिला विचारलं.
"ये हो! पण थोडाच वेळ. तुला विश्रांती घ्यायला हवी...आणखी  शाळा बुडवून चालणार नाही"
मी मान डोलावली. मग हळूहळू चालत मी माझ्या खोलीतून बाहेर आलो.एक एक पायरी उतरत खाली आलो. परवा सडकून ठणकत होते तसे गुडघे काही आज दुखत नव्हते.
खाली आलो तर डॉक्टर आलेले. त्यांनी मला तपासलं. मग आजीला म्हणाले" पेशन्ट बरा होणार लवकरच वयनी.. अगदी काळचीच सोडा हो तुम्ही..." आजीने खूश होऊन त्यांना एक कप चहा जास्त दिला. डॉक्टर गेल्यावर बाबूरावांनी मला एक मस्तपैकी पेरू आणून दिला. आपल्या झाडावरचा आहे असं म्हणून माझ्याकडे बघून त्यांनी एक डोळा मिचकावला. 
 पेरू पाहून मला त्या जामखिंडीकरांच्या बोक्याची आठवण झाली. त्याचे ते पिवळे डोळे अजून माझ्याकडे पहात आहेत असंच वाटत होतं मला. तितक्यात तो बोका आमच्याच स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याच्या त्या डोळ्यांकडे मला थेट बघताच येईना. आमच्या ओटीवरच्या अंधुक उजेडात ते चमकतायत असं मला वाटायला लागलं.  मी त्याला बघून घाबरलोच!  तो बोका खरंच तिथे आहे की मला भास होतो आहे हे मला कळेना. मी इकडेतिकडे पाहिलं.
"बाबूराव... अहो या बोक्याचा काहीतरी बंदोबस्त कराच आता... सोन्यासारखं पोर दचकलं बघा त्याला बघून... जळ्ळं मेलं लक्षण त्या बोक्याचं एक दिवस दूध म्हणून शिल्लक राहू देत नाही पातेल्यात.. जरा लक्ष इकडे तिकडे झालं की संपलंच..." आजी म्हणाली.
बाबूराव हातातली काठी घेऊन बोक्यामागे धावले.बोका पुढे बाबूराव याच्यामागे अशी मिरवणूक घरभर फिरली आणि शेवटी अडगळीच्या खोलीत शिरून तिथल्या खिडकीतून बोकोबांनी बाहेर उडी मारली. घामाघूम झालेले बाबूराव धापा टाकत माझ्याशेजारी येऊन दम खात बसले. म्हणाले "काय सुचेल ते करून राह्यलो पण आता कायपण सुधरेना..." .
दुपारी जन्या, शिऱ्या,शिऱ्याचा दादा, चंद्या आणि शंभ्या मला भेटायला आले. शंभ्याबरोबर त्याचा भाचा होता. तोंडाचं बोळकं पसरून तो सगळ्यांकडे बघून हसायचा  आणि "द्दादा...." म्हणायचा. शंभ्याची वृंदाताई  त्याला कौतुकाने बाळकृष्णा अशी हाक मारायची. पण आम्ही त्याला किट्ट्या , किट्टप्पा , लंगडा बाळकृष्ण असं काहीही म्हणायचो. शंभ्याच्या कडेवरून तो सगळीकडे हिंडायचा आणि  धरण्यासारखं  म्हणून जे दिसेल ते धरून ठेवायचा ती गोष्ट त्याच्या हातातून सोडवायचा प्रयत्न केला की भोकाड पसरायचा. सगळी सुट्टीभर शंभ्याला तो डिंक लावून चिकटवल्यासारखाच होता. आम्ही खेळायला गेलो तर तिथेही शंभ्याला त्याला घेऊन यायला लागायचं. आणि मग शंभ्या मैदानाच्या कडेला झाडाच्या सावलीत आणि बाकी लोक मैदानात उभे राहिलेले असा आमचा खेळ चालायचा.  एकदा चुकून आमचा रुमालपाण्याचा रुमाल शंभ्याच्या पुढ्यात पडला आणि नेमका तो किट्टप्पाने पकडला. मग आम्हाला परत दुसरा रुमाल शोधून पुन्हा खेळाला सुरुवात करावी लागली होती. मग शंभ्या खेळायलाच यायचा नाही फारसा.
आत्ताही  या किट्टप्पच्या नाटकामुळे आम्हाला बोका आणि जामखंडीकरांबद्द्दल काहीच बोलता येईना . तितक्यात वृंदाताईच त्याला शोधत आमच्या घरी आली. पुढच्या आठवड्यात ती किट्टप्पाला घेऊन सासरी परत जायची होती. मग आजी आणि वृंदाताईच्या चिकार गप्पा रंगल्या.
ती संधी साधून आम्ही शंभ्याला खूण केली. झोपाळ्यावर दाटीवाटीने आमची बैठक जमली आणि खल सुरू झाला. मी जन्याला काही विचारायच्या आत शिऱ्याने सुरुवात केली " त्या जामखिंडीकर आप्पांच्या सुनेचा असायलाय हा बोका. ती चेटूक करते म्हणॆ आणि हा ते कोणाला कळू नये म्हणून लक्ष ठेवतो... रोज सकाळी सात वाजता तो दादाच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून आमच्या घरी येतो तेंव्हा त्याच्या तोंडाला आणि मिशीला रक्त लागलेलं असतं माहितेय का?"
तेवढ्यात शिऱ्याचा दादा म्हणाला" ए शिऱ्या रोज नाही काही.. एकदाच पाहिलं होतं मी रक्त.."
हा शिऱ्या असंच काहीतरी सांगायचा. सांगताना त्याचे डोळे वेगळेच दिसायचे. त्याला असल्या पुड्या आमच्यापुढे सोडताना एकदम खूप आनंद झाला असावा असं वाटायचं.
 तेवढ्यात शेजारच्या घरातून काहीतरी खळ्ळकन  फुटल्याचा आवाज आला आणि  शेजारच्या सावित्रीकाकूंचा जोराचा ओरडा ऐकू आलेला.
"हात रे मेल्या ... शर्थ झाली बाई या बोक्यापुढे.... "
 काय झालंय ते बघायला सगळे तिकडे धावले. मला उठता येत नव्हतं म्हणून आजीने तिथंच बसवून ठेवलं होतं.  आजी आणि वृंदाताई आत आंबोशीचं लोणचं घालत होत्या. माझं नाक तिकडे होतं. आजीच्या हातचं आंबोशीचं लोणचं म्हणजे एकदम बेष्ट! वृंदाताईला सासरी जाताना आजी कौतुकाने करून देत होती. त्या मॅड वासाने मला असं झालं होतं की मी का पडलो? मला आत्ताच्या आत्ता ते ताजं लोणचं खायचंय....
थोड्या वेळाने सगळे परत आले. मी विचारलं काय झालं म्हणून त्यावर जन्या म्हणाला " रोजचंच रे लंप्या. तो बोका सावित्रीकाकूंच्या घरात शिरला तेंव्हा त्यांच नुकताच डोळा लागला होता. भुतासारखा कुठून कसा आत शिरला माहीत नाही. काकूंनी त्याला मारायला काठी घेतली तसा तो बाहेर पळाला. त्याने पळताना वाटेत आलेल्या कप बश्या फोडल्या.बरं झालं आम्ही वेळेत परत आलो नाहीतर बोक्याचा मार आम्हाला मिळाला असता...."
ते सोड रे.." जन्याला मधेच थांबवत शिऱ्या मला सांगत होता "  या बोक्यात सैतान रहात असतंय म्हटलं. तो रोज रात्री दादाच्या खोलीच्या खिडकीखाली ओरडत असतो. आमच्या घरची मांजरं त्याच्या वासाला उभी राहत नाहीत..."
" परवा तो आमच्या घरात शिरला. त्याला पाहून किट्टू रडायला लागला तो थांबेचना. त्या दिवशी रात्री ताईला तो स्वप्नात पण दिसला. ताई म्हणाली मी नाही किटूला घेऊन इथं रहायची. मी सासरी परत जाते.."
मग सगळे त्या बोक्याचे प्रताप सांगायला लागले. तो कश्शालाही घाबरत नाही, त्याला अंधारात दिसतं  आणि काय काय..."
संध्याकाळी सगळे आपापल्या घरी गेले. मला पण रात्रभर जिथे तिथे तो बोकाच दिसायला लागला. शेजारच्या खोलीतून आजोबांच्या घोरण्याचा आवाज मी रात्रभर ऐकत होतो. नंतरचे काही दिवस गावात सगळीकडे जामखिंडीकरांच्या बोक्याने धुमाकूळ घातला.
मला चालता यायला लागलं. मी हळूहळू शाळेत जायचो. सगळ्या मुलांमधे हीच चर्चा.तशातच एक दिवस आम्ही सोंगट्या खेळत बसलो होतो. जन्या आणि माझा डाव अगदी रंगात आला होता.  एकीकडे आमचं तोंड चालूच होतं. बोक्याबद्दल बोलताना आमचं बोलणं आजीच्या कानावर गेलं. मी का आणि कसा पडलो हे कळल्यावर आजी जाम संतापली. "खबरदार पुन्हा त्या झाडावर चढलास तर... उद्याच तुझ्या आईला पत्र धाडते की येतीच आहेस तो तुझ्या मुलाला परत घेऊन जा हो. मला काही हे सांभाळता येत नाही. किती उच्छाद मांडायचा तो? अरिष्ट नाहीतर..."
आजीचा संताप पाहून आता बरेच दिवस क्रिकेट खेळायला मिळणार नाही हे मी ओळखलं. जन्यानेही तिथून काढता पाय घेतला. तितक्यात शिऱ्या मॅडसारखा धावत घरात घुसला आणि एकदम मला सांगायला लागला " लंपन... अरे जामखिंडीकरांची सून  तिचा बोका सापडेना झालाय म्हणून गावभर शोधाशोध करायलीये. "
"जळ्ळा मेला तो बोका बरं होईल मेला तर.. "आजी पुटपुटली.
शिऱ्याच्या पोतडीत नेहेमीप्रमाणे काय काय बातम्या होत्या.  पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे जामखिंडीकरांच्या बागेत वीज कशी कोसळली आणि त्यांचं जुनं चंदनाचं झाड कस उन्मळून पडलं ही. शिऱ्याचं असं म्हणणं दिसलं की जामखिंडीकरांचा मुलगा आणि सून त्या बोक्यामुळेच गाव सोडून चाललेत. ते झाड पडलं आणि तो बोका पण नाहीसा झाला...
पण बाबूराव तर सकाळीच आजीला म्हणाले होते "अप्पांच्या मुलाची बदली झालीये दिल्लीला. तो आणि सूनबाई जाणारेत..."
आणि मग अप्पांचं काय? वैनींचं काय" आजीने त्यांना विचारलं.
"ते दोघं राहतील की इथेच..." बाबूरावांनी उत्तर दिलं होतं. हा शिऱ्या म्हणजे पण ना काहीही सांगतो....
आजीला शांत व्हायला चांगले चार दिवस लागले. तोपर्यंत आईपण आली. जामखिंडीकरांचा मुलगा आणि सून एका मोठ्या गाडीत बसून दिल्लीला निघून गेलेले. गावातल्या लोकांना तो मॅड बोका दिसल्याचा नंतरहे बरेच दिवस भास व्हायचा. मधल्यामधे मला मात्र क्रिकेट खेळायची बंदी होती. पार पावसाळा संपल्यावर सहामाही परिक्षेत मी आजीच्या मते बरे मार्क मिळवल्यावरच मला पुन्हा  बॅट हातात धरून क्रिकेटच्या मैदानात जायची परवानगी मिळाली. पण पुन्हा म्हणून काही मी जामखिंडीकरांच्या कुंपणाजवळ गेलो नाही. अगदी बॉल आणायलाही नाही...
(समाप्त)
--अदिती