चिंता करी जो विश्वाची ... (१३)

श्री समर्थ रामदास स्वामीं चे समाजप्रबोधनाचे कार्य अहर्निश  सुरू होते. जनलोकांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म दुःख, वेदना आणि अडचणींबद्दल समर्थ विचार करीत होते. स्वतःचे ज्ञान, अनुभव आणि बुद्धी यांचा वापर करून त्यावर उपाययोजना शोधत होते. सर्वांना समजेल, कळेल अशा भाषेत उपदेशही करीत होते. 

चपळपण मनाचे मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनी करूणा हे बोलतों दीनवाचा ॥ 

गुंतवणूक आणि गुंतागुंत

कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती..... " इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते.... " चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल? आणि तुम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतील? कदाचित मिळतील एखाद्याला, पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंतागुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.