चिंता करी जो विश्वाची ... (११)

श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिंतन, लेखनामध्ये जराही खंड नव्हता. दुःख, दैन्य आणि दारिद्र्य या सर्वांचे मूळ कारण 'अज्ञान' हेच आहे-- या बद्दल त्यांच्या मनात जराही किंतु नव्हता. ते अज्ञान दूर करावे, लोकांना सुखी , समाधानी जीवनाचा मूलमंत्र द्यावा, असा त्यांनी ध्यास घेतलेला होता. त्यासाठी अखंड आणि अथक परिश्रम करीत होते. 

अमृता सावंत

संपादकांचा निरोप अगदी सकाळी सकाळी आला. नीलेश केबिनमधे शिरला तेव्हा संपादक जरा गडबडीत होते. कागदपत्रे वर खाली करून बघणे सुरु होते. त्यांनी नीलेशकडे पाहिले पण तोंडाने बडबड चालू ठेवली कारण कानाशी फोन होता. 
    "नाही मिळाली? पाठवतो लगेच. अगदी लगेच. तरी, अर्धा तास लागेलच पाठवायला. ती मुलाखत?  हो, हो, पाठवतो कोणाला तरी. रंगीत चौकट करू.