चिंता करी जो विश्वाची ... (५)

श्री रामदास स्वामींचा शिष्य परिवार सतत विस्तारत होता. अनेक शिष्य समर्थांचे हे विचारधन   जनसामान्यांपर्यंत पोहोचवीत होते. स्वतःच्या आचरणातून समर्थांनी आदर्श जीवनाचा परिपाठच दिला होता. निर्वाहासाठी भिक्षांदेहीचा मार्ग पत्करला होता, पण फक्त जरूरीपुरताच . जास्तीची हाव त्यांना कधीच नव्हती. धनसंचयाची लालसा नव्हती. कठोर परिश्रम आणि खडतर साधना त्यांची नित्यकर्मे होती.

प्रतिभा (भाग १)

                                              खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून 

मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल.

बहुभाषिक द्वैमासिकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

'इंडियारी' या बहुभाषिक द्वैमासिकामध्ये (indiaree.com) आता मराठी विभाग सुरू होत आहे. त्यासाठी कथा, कविता, ललितलेख इ प्रकारचे लिखाण पाठवण्यासाठी हे आवाहन.
हे मासिक इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातील लिखाणाचे स्वामित्वहक्क लेखकाचे/लेखिकेचे असतील. लिखाणाबद्दल सध्या तरी काही मानधन मिळणार नाही.

चिंता करी जो विश्वाची ... (४)

समर्थ रामदास स्वामींनी  लोक जागृतीचे कार्य आरंभिले होते. चांगले काय ? वाईट काय?  ते कसे ओळखावे? वाईट गुण त्याजून चांगुलपणा कसा आत्मसात करावा? हे  आपल्या प्रवचनांतून सांगत असत. त्यांची फक्तं शिकवणूकच नाही, तर त्यांचे  स्वतःचे वर्तन , जीवनक्रम देखिल त्या प्रमाणेच असे. " बोले तैसा चाले - त्याची वंदावी पाउले " ही म्हण, समर्थांच्या बाबतीत अक्षरशः  खरी होती. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. समर्थांच्या शब्दाखातर कार्य करण्यास अनेकजण प्रवृत्त होत होते.

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची कला

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याच्या कलेत तुम्हांला पारंगत व्हायचे आहे का?
लिहा अथवा भेटा, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र.
स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली तीन दशके महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या तोलामोलाचा असा नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही काँग्रेस मजबूतरीत्या टिकून होती, आणि संयुक्त महाराष्ट्राचा 'कलश' काँग्रेसी यशवंतरावांच्या हस्तेच आणला गेला.

जीवलग

    बॉस्टन मध्ये    ऑफिशिअल  स्प्रिंग  जरी सुरू झाला असला तरी हवेतला गारवा आणि झोंबरा वारा काही कमी झाला नव्हता .  न्यू इंग्लंड च्या हवामानाची हीच गंमत आहे .एकेक दिवसात २०  २० डिग्री चा फरक होणाऱ्या या  हवामानाची   ची जशी सगळ्या न्यू इंग्लंड करांना सवय होती तशीच सुमारे ३० वर्षांपूर्वी आलेल्या साठीच्या  गिरीश ना सुद्धा झाली होती .

गूढकथा - आग्या वेताळ

तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते?
एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे?
आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही.
या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!