चिंता करी जो विश्वाची ... (३)

श्री रामदास स्वामींच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातला साधेपणा. अतिशय सुगम , सरळ अशी भाषा. विचारातील प्रांजळपणा आणि स्पष्टपणा. तसेच निगर्वी आणि निरलस वृत्ती. त्यांच्या लेखनात त्यांनी कुणाचीही खोटी स्तुती अथवा निंदा केलेली दिसत नाही. घरातील शहाणीसुर्ती व्यक्ती आपणांहून वयाने, ज्ञानाने सान असलेल्यांस  व्यवहारज्ञानाच्या, शहाणपणाच्या चार गोष्टी जशा सांगेल तीच रीत, तीच कळकळ. केवळ अज्ञानापायी कुणाच्याही आयुष्याची माती होऊ नये हीच  तळमळ. चारित्र्यवान, नीतीवान,  बुद्धीवान आणि  कार्यकुशल अशा व्यक्तींचा हा समाज व्हावा हीच सदीच्छा.

सर्वाभूती नारायण

                            एका नगरात एक गुरू राहत होते . त्यांचे अनेक शिष्य होते.  महोक्ष नावाचा त्यांचा एक आवडता शिष्य होता. शिक्षण पुरे झाल्याने त्यांनी त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली. जाण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना उद्देशून भाषण केले. " माझ्या लाडक्या शिष्यांनो हे लक्षात ठेवा की सर्वाभूती नारायण आहे आणि त्याचा आदेश पाळला पाहिजे. ही साधना तुमची पुरी झाली आहे. आता आयुष्यातले अनुभव त्यानुसार घ्यावेत हे लक्षात ठेवा. " सर्वांनीच होकार भरला.

चिंता करी जो विश्वाची .... (२)

समर्थ रामदासस्वामी यांचे वास्तव्य नेहमीच डोंगरांवर, गुंफेमधे, अथवा गड- किल्ल्यांवर असे. एकांतवास त्यांना प्रिय होता. मानवी वस्तीपासून काहीसे दूर, कमीतकमी जनसंपर्क होईल अशा ठिकाणी ते मुक्काम करीत.  परंतु असे असले तरी  मनात सदैव जनसामान्याचा विचार असे. बुद्धी सतत लोकोद्धाराचे मार्ग शोधण्यात मग्न असे. त्यांच्या शिष्यगणांनी जागोजागी मठाची स्थापना केली होती. त्यातून समर्थांचे विचार शिकविले जात, बलोपासनाही होत असे.

चिंता करी जो विश्वाची .....(१)

भाव भक्तीने भारलेली , अभंग, ओव्या, भारूडे, कीर्तने, भजने यांच्या रसाळ आणि सुरेल कथनाने आणि  श्रवणाने तृप्त झालेली, -- अशी  संत परंपरा या मराठी मातीस लाभली आहे. शतकानुशतके महान धर्मग्रंथामध्ये बंदिस्त असलेले ज्ञान या संत सज्जनांनी जनसामान्यांसाठी  खुले केले.  सामान्यांच्या भाषेत, त्यांना समजेल , भावेल अशा पद्धतीने त्यांनी धर्माचे ,तत्त्वज्ञानाचे मर्म उलगडून सांगितले .  मराठी जनांच्या आयुष्याला त्यांनी सात्त्विक आणि तात्त्विक चौकट प्रदान केली.

वाचन का करावे?

"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"
"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"
"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते.