चित्रपट व केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ

''उडता पंजाब'' या चित्रपटाच्या निमित्ताने उफाळलेला वाद शमून चित्रपट प्रदर्शितही झालेला आहे. मी हा चित्रपट अजून पाहिलेला नाही. 
   चित्रपटात शारीरिक हिंसाचार, अपशब्द किंवा आणखी काही आक्षेपार्ह गोष्टी अती प्रमाणात असल्या तर केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ ते कमी करायला सांगते व त्यावरून वाद उद्भवतो, असे अनेकदा घडल्याचे दिसते. कोणतेही आक्षेपार्ह दृश्य  समाजघातक असल्यास ते पूर्ण कापावे वा कमी करावे असा जर मंडळाचा नियम असेल तर नियमांनुसार कारवाई होण्यास हरकत नाही.

चिंता करी जो विश्वाची ... (१०)

श्री रामदास स्वामींनी आरंभलेला ज्ञानयज्ञ, अखंड प्रज्वलीत होत होता. ज्ञानसंपन्न, साधनासंपन्न असलेले समर्थ, समाजातील अनेक लहानसहान  बाबींचा देखिल बारकाईने विचार करीत होते. आपल्या ज्ञानाच्या, अनुभवांच्या आणि शहाणपणाच्या तराजूमध्ये तोलत. होते. योग्य काय आणि अयोग्य काय यांची परिमाणे लोकांना शिकावीत होते . त्यांची तीक्ष्ण बुद्धी,  हितकारी आणि अहितकारी गुणदोषांना पारखत होती. त्यातील हीण काय आहे, आणि शुद्ध कांचन कुठले , हे वेगळे करून सांगत होती.