चिंता करी जो विश्वाची ... (९)

श्री रामदास स्वामींनी जरी संन्यास धर्म स्वीकारला होता, तरी त्यांचे समाजाशी असलेले नाते अभंग होते. एकांतवास त्यांना प्रिय होता तो चिंतन, मनन, आणि लेखन करण्यासाठी. समाज आणि समाजव्यवस्था कशी असायला हवी, या बद्दल त्यांच्या संकल्पना पुरेशा स्पष्टं होत्या. मनुष्याला वैयक्तिक, प्रापंचिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशी सर्वकष प्रगती / उन्नती साधता येईल अशी सामाजिक स्थिती निर्माण करायला हवी.

चिमूटभर

बेल वाजताच ज्योती चौधरी खुर्चीवरून उठल्या. हातातील मासिक ठेवले. हळुहळू चालत दारापर्यंत आल्या. घरातच घसरून पडल्याने त्यांचा डावा पाय दुखावला होता. दार उघडताच समोर एक मुलगी दिसली.  पंजाबी ड्रेस. गव्हाळ वर्ण. 
    "ओळखलंत बाई?  मी दीपिका."
    बाईंना ओळख पटेना. 
    "मी दीपिका, बाई. दीपिका सुभेदार."
    "तुम्ही आत या, अशा उन्हात उभ्या राहू नका."
    बाईंनी दीपिकेला आत घेतले.

प्रतिभा (भाग ३)

                                                  दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला लवकरच गेलो. मी आता प्रतिभाकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. ती जरा उशिरा आली. ती माझ्याशी एकही अक्षर बोलली नाही. म्हणजे ती कधीच बोलत नसे. कालच्या प्रकारानंतर ती माझ्याशी बोलणार नाही अशी माझी खात्री होती. मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करित होतो. एकीकडे कामही करीत होतो. निदान तसे दाखवीत तरी होतो. तिच्या चेहऱ्यावर कालचे काहीच अवशेष दिसत नव्हते.

'काँग्रेसमुक्त भारत' घोषणेचा खरा अर्थ

मोदी-शाह जोडगोळीने 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा काय दिली आणि सगळे लोकशाहीवादी पुरोगामी विचारवंत खवळून काय उठले. अर्थात मोदी सरकार आल्यावर त्यांना खवळून उठायला निमित्तही लागत नाही म्हणा. पण या घोषणेबाबत झाले आहे असे की नीट अर्थाकलन न झाल्यानेच सगळ्या अज्ञजनांचा क्रोधाग्नी धडाडला आहे. त्यांचे अज्ञान दूर करावे म्हणून हा लिखाणप्रपंच.

चिंता करी जो विश्वाची ... (८)

समर्थ रामदास स्वामींची श्रीराम भक्ती सर्वज्ञात आहे. भक्तिमार्गाने वाटचाल केल्यास अनेक दुर्गुणांपासून दूर राहणे शक्य होते असे ते सांगत. रक्षणकर्ता श्रीराम ज्याचा पाठीराखा आहे, त्याला दुःख आणि दैन्याचा सामना करावा लागत नाही. सर्व चिंता लयाला जातात असे ते म्हणत. परंतु त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती म्हणजे फक्त पूजाअर्चा आणि इतर कर्मकांडे इतकीच मर्यादित नव्हती. भगवान श्रीरामाची भक्ती करणे म्हणजे त्यांच्या  सारखेच आदर्श वागणे, बोलणे आणि चालणे असे होते. मुखी रामनाम घेत दुर्वर्तन करणे त्यांना मान्य नव्हते.

स्थलांतर (कथा) भाग एक

#स्थलांतर : भाग 1
 राजा विक्रमादित्याच्या राजधानीत आज गडबड होती. त्याच्या एकुलत्या एका मुलीचा जयगौरीचं लग्न होतं. राजा आदित्यनारायणाच्या मुलासोबत नरेंद्रासोबत आधीच ठरलं होतं.
लखलखता सुर्यप्रकाश. निळं आभाळ. भर बाजारातलं संगमरवरी मंदिर. नेहमी वर्दळ. पण आज इतकी गर्दी. बापरे! 
सुंदर केशरी पोषाखात जयगौरी आणि तितकाच छान नरेंद्र. फेरे झाले, माळा घातल्या, एखाद्या शाही घराण्यातल्या लग्नासारखं पार पडलं लग्न.