रिकामटेकड्यांचा अहवाल

     एक सुप्रसिध्द देशी साहित्यिक रा.रा. यांनी आणखी एक तीर नेमाने सोडला आणि रसिकांना, आज उदाहरणार्थ, एक नवा साक्षात्कार झाला. साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, हा तो साक्षात्कार  होय. त्यांच्या या विधानाचा स्थूलमानाने विचार करता साहित्य संमेलनाचा जरा मागोवा घ्यावा असे वाटले. त्या मागोव्यातून डोळ्यांसमोर आलेला हा अहवाल -  

श्रद्धा की अंधश्रद्धा ?

नुकताच PK  सिनेमा पहिला. म्हणाला तर तसे फार काही वेगळे दाखवले नाही किंबहुना आपले अनिंसवाले दाभोलकर आणि बरेच सुधारणावादी लोक पूर्वी पासून काही वेगळे सांगतात असे नाही वाटले. मराठीतला देऊळ काय किंवा हिंदी मधला OMG काय तेच संदेश देणारे चित्रपट होते - भोंदूगिरी पासून सावधान. मग याचाच इतका गोंधळ का? जाहिरातबाजीचा प्रकार हा भाग वगळता, मला वाटते एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की गोंधळ होतो, म्हणजे संदेश द्या पण एकाच धर्म बद्दल तेच तेच सांगून काय वेगळे मिळवणार आहेत हे लोक? 
हिंदू धर्मात अंधश्रद्धा होती आणि आहे, पण मग ती इतर धर्मात नाही का?

स्मरण विसंगती

काही काळापूर्वी एका आस्थापनेत प्रशिक्षण देण्याकरिता गेलो होतो. प्रशिक्षणाचा विषय होता - समस्या सोडविण्याची तंत्रे (Problem Solving Techniques). समोर बसलेल्या प्रशिक्षणार्थींना मी समस्या सोडविण्याचं माझं नेहमीचं तंत्र सांगत होतो. गुंतागुंतीची क्लिष्ट अशी काही समस्या नसतेच मुळी. असा काही असतो तो आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. जगाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या समस्या केवळ काही सोप्या कल्पना वापरून सोडविल्या जाऊ शकतात (Complex Problems can be solved using simple ideas). खरे तर व्यवहारातील अनेक समस्या या आपण कुठलेही उपाय वापरण्याआधीच सुटलेल्या असतात.

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।

कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते. कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही. मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता. पण मराठी प्रेक्षकांनी एकेकाळी  अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता. गांधीजी सोडा, इंग्रजांनी जर बघितले असते तर "चाले जाव" च्या आधी "आम्हाला घरी जाऊ द्या " म्हणून आंदोलन केले असते.

एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत: आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.

२०१५ च्या शुभेच्छा !

२०१५ तुम्हां सर्वांना आनंदाचे, उत्साहाचे, समाधानाचे, चिरतारूण्याचे, समृद्धीचे  व भरभराटीचे जावो ही शुभेच्छा !
*****************   ========= ******************* ======== *************** ======= **********

दैवतपंचक

गद्धेपंचविशित पोहोचल्यावर प्रेम-प्रेमभंग-फिरून यत्न वा प्रेम-लग्न-संसार वा कांदेपोहे-लग्न-संसार यापैकी एका मार्गाला लागणे ही माझ्या वेळी तरी प्रथा होती. यापैकी पहिला मार्ग मी अठराव्या वर्षीच दोन-तृतियांश तुडवला होता. उरलेला एक तृतियांश तुडवायला हरकत नव्हती पण तोवर मी हातचे सोडून पळत्यापाठी लागलो होतो आणि त्यामुळे 'इनएलिजिबल बॅचलर' या श्रेणीत पोहोचलो होतो.  दुसरा आणि तिसरा मार्गही अर्थातच 'नो एंट्री' झाला होता.