समारोप:
जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज यांच्या गाथेतील ‘नामपर अभंगां’चे आणि 'नाटाच्या अभंगां' चिंतन करीत असताना 'शब्दरूप' तुकोबारायांच्या सुखदायी छायेचा लाभ गेली दोन वर्षे उपभोगला. त्या चिंतनाचा आज समारोप करीत असताना मन संकल्पपूर्तीने काहीसे समाधान पावत आहे, पण त्याचबरोबर आता पुन्हा या छायेचा लाभ संचितात लिहिलेला आहे का नाही, या प्रश्नाने काहीशी चिंताही आहे. ‘यथा योग्यं तथा कुरु’ अशी विनंती मात्र करावी, असे मनोमन वाटते.