तुम्हाला काय वाटतं??? आपलं काय चुकतं???

नमस्कार,

आज खूपच दिवसांनी इथे पुन्हा लिहिण्याचा योग आला.... सहज आता काही वाचत असताना माझ्या मनात आले.... असे नेहमी आपल्यासारख्यांशीच का होते???? म्हणजे....

शिक्षण घेत असताना एखाद दुसऱ्या मार्काने आपली स्कॉलरशीप जाते....

आपण खूप इमाने इतबारे नोकरी करतो.... पण प्रमोशन, ऑनसाईट अश्या सगळ्या संध्या आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना मिळतात....

नेहमी मनोभावे देवाची पूजा करतो... व्रत-वैकल्ये करतो...तरी रिसेशन मध्ये नोकरी जाण्याचा अनुभवही देव आपल्याला देतो....

पैसे साठवून आपण शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावायचा प्रयत्न करतो.... तिथेही नुकसानच वाट्याला येते....

नवीन घर घेऊन काही सोयी करून घ्यायच्या तरी, रंगाऱ्यापासून प्लंबरपर्यंत सगळेच आपल्याला ह्या न त्या मार्गाने फसवतात...

कधीही आपण कुणाच्या सुखावर जळत नाही... की कुणाचे वाईट व्हावे अशी इच्छा करत नाही.... तरी हे सगळे आपल्याच वाट्याला का येते???

आपलं सरळ असणं चूक आहे की सध्या कलियुगात देवच दुर्जनांचा आहे????

तुम्हाला काय वाटतं???