मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने तिने तिची रामकहाणी ऐकवतांना या दोन ओळी माझ्याशी शेअर केल्या-
मी पुन्हा खरं बोलेन पण तरीही नाही जिंकणार
तो पुन्हा खोटं बोलेल आणि मला निरुत्तर करणार
खरंच, दैनंदिन जीवनात लहान सहान बाबतीत पुरुष मग तो मित्र असो वा पती, खोटं बोलून निरुत्तर करतो आणि स्त्री सगळं काही माहीत असून ते सहन करते. हे सार्वकालिक सत्य असावं असं वाटतं. असल्यास हे असं का?
तुमचं मत हवं आहे.
~ जाह्नवी