मोहन गेला कुणीकडे ?----१

"प्रतोद परत येत आहे" चे प्रतिसाद पाहून माझी एक दुसरी विज्ञान काल्पनिका येथे देत आहे.मनोगतीना आवडेल अशी आशा आहे  

   जाहिरातींच्या अतिरेकामुळे दूरदर्शन बघणे शिक्षाच वाटत असली तरी कधी कधी रद्दीतून रत्न निघाव तस एकाद्या जाहिरातीच होत. त्यादिवशीची  ती जाहिरात बघताच मी आणि विद्या दोघेही एकमेकाकडे क्षणभर पहातच राहिलो आणि नंतर पुन्हा ती जाहिरात केव्हा दाखवतात याची वाट पहात राहिलो.पुन्हा ती दाखवतील ही आमची अपेक्षा थोड्याच वेळात पूर्ण झाली आणि त्यातील अक्षर न् अक्षर आम्ही डोळ्यात आणि कानात प्राण आणून साठवू लागलो.
  "नोकरदार दांपत्यानो,आता तुमची घरकामे करण्याची,मुलाना संभाळण्याची कसलीच काळजी करू नका,तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होता तो रोबाट म्हणजे यांत्रव आता प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे आता फक्त तुम्ही मागणी नोंदवण्याचा अवकाश की सकाळी तुम्हाला मंजूळ आवाजात किंवा हलक्या हाताने हलवून जागे करण्यापासून तुमचे कपडे भांडी स्वच्छ करणे तुमच्या बाळास संभाळणे त्याला अंगाई गीत म्हणून झोपवणे वा आणखीही तुम्हाला हवी असतील ती कामे बिनबोभाट पार पाडणारा यांत्रव अथवा यांत्रवी आता प्रत्यक्षच येऊन पहा आणि खात्री करून घरी घेऊन जा. "
      अक्षरशः वाळवंटात प्रवास करणाऱ्यास ओऍसिस दिसाव असं झाल आमचं. विद्या लगेचच चित्कारली ," चल चल आत्ताच चल त्या यांत्रव निर्मिती केंद्रात " पण त्यावेळी रात्रीचे दहा वाजले आहेत याची कल्पना तिला देताच ती भानावर आली,पण मग तिची मनोराज्ये चालूच राहिली," आता त्या कल्पनाची ( ही कल्पनेहूनही अधिक सुधारलेली आमची कामवाली बरका, तिला ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी आठवड्यात एक सुट्टी द्यावी लागते.)दररोज आरती करायला नको."
        कल्पना ही विद्याची या वर्षातली चौथी अस्सिस्टंट हो हा शब्दही तिचाच !कामवाली मोलकरीण या शब्दाची तिला ऍलर्जी होती‌ सकाळी तिचा बॉयफ्रेंड ( हाही तिचाच शब्द )त्याच्या बाईकवरून तिला सोडायला येई.तरी अजून अमेरिकेतील कामवाल्यांप्रमाणे ती स्वत:च्या कारमधून येत नाही पण आम्हाला खात्री होती की एकदिवस ती कारवाला बॉयफ्रेंड गाठेल आणि मग मात्र असिस्टंट कोण याचा आम्हाला पेच पडॅल शिवाय आमच्या आठ वर्षाच्या छोकरीच मिनीच आणि तिच एक मिनिटही पटत नसे ते वेगळच, अर्थात अशा संकटात पडलेल्या आम्हाला आणि आमच्यासारख्या अनेकाना या जाहिरातीने मोठाच दिलासा दिला असेल.
      सकाळी अर्थातच आमचा कार्यक्रम दुसरा तिसरा कुठलाही नसून यांत्रव केंद्रास भेट देण्याचाच होता हे ओघाने आलेच.आम्ही तयार होतो न होतो तोच माझा संस्थेतील तरुण सहकारी आणि मित्र विश्वास  हातात पेपर नाचवीत आणि जवळजवळ किंचाळतच घरात शिरला त्यातही तीच जाहिरात होती,"सुध्या अरे वाचलीस का ही ऍड आपण तर बुवा एक झकास रूबी घरात आणणार""रूबी ही काय भानगड आहे?"त्याला थांबवत मी विचारले "अरे एवढेही नाही का समजत मामाच स्त्रीलिंग मामी, काकाच काकी तस रोबाट च रोबी,त्यालाच जरा गोजिरवाण रूप दिलय मी रूबी  एवढपण कळत नाही ?"हा विश्या म्हणजे स्वत: ला भाषाप्रभु समजतो की काय ?आणि तेवढ्यावर थांबला तर तो विश्या कसला,त्यान तर त्याहीपुढे जात एकाद्या टुकार हिंदी सिनेमात शोभेलसे गाणही आपल्या भसाड्या आवाजात गायला सुरवात केली,"रूबी ओ रूबी तू मेरी बेबी खोये कमरेकी चाभी देखती रहेगी भाभी "आणखी त्याहीपुढे जात मला जणु खिजवत तो म्हणाला," बरका सुध्या ही माझी रूबी सकाळी मला गाण गाऊन उठवेल,मी कामावरून घरी आल्यावर माझ हसतमुखाने स्वागत करेल,माझे बूट उतरवेल,मला गरमगरम चहा आणि पोहे देईल ,माझे पाय चेपून देईल ---" "पुरे पुरे " त्याला अडवीत मी अगदी ओरडलोच कारण याची मजल आणखी कुठपर्यंत जाते कुणास ठाउक अशी भीती मला वाटली आणि खोट कशाला सांगू पण खर तर त्याचा थोडा थोडा हेवाही वाटू लागला मला.
    "हं पुरे आता,रोबी म्हणजे काय एक यंत्र त्यात स्त्रीचा नाजुकपणा, कोमलता हळुवारपणा कुठून येणार आता दुधाची तहान ताकावर भागवायचा हा प्रकार म्हणत असशील तर ठीक आहे." मी त्याला टोमणा दिला.पण विश्या असा हार खाणारा थोडाच होता , उलट मला आणखीच वेडावत म्हणाला," तुमच्या वाटणीला दूध किती येतं माहीत आहे आम्हाला! सारखा तर कुरकुरत असतोस वहिनी मुळीच लक्ष देत नाहीत असा,माफ करा हं वहिनी .एक गोष्ट तर निश्चित ती रूबी  चोवीस तास मला उपलब्ध राहील आणखी आनंदाची गोष्ट निदान यी माझ्याशी भांडणार तरी नाही"
"बरोबर आहे लेका ,ती रोबी खऱ्याखुऱ्या बायकोसारखी थोडीच भांडणार आहे? त्यातली गोडी तुला काय कळणार काय विद्या, बरोबर आहे की नाही ?"विद्यालाही आमच्या संभाषणात ओढत मी म्हणालो, विद्यानही ती संधी साधून "बरोबर आहे ती भांडणार नाही,रुसणार नाही फुगणार नाही आणि मग अजुनी रुसून आहे किंवा तेरा गुस्सा हमको प्यारा है अशी तिची आळवणी करण्याची मजाही तुम्हाला लुटता येणार नाही,जाऊदे भाऊजी तुम्ही आपली खरीखुरी बीबीच आणा बर लवकर !" अस म्हणत  नेहमीच पालुपद आळवल.
"बर बुवा ती बीबी येईपर्यंत तरी रोबी आणु द्या आणि तुमच लग्न झाल तरी लेका तुम्ही पण चाललाय ना रोबाट किंवा रोबी आणायला ?बर ते जाऊदे  पण मिनी येणार आहे ना ?" त्यान मिनीची आठवण काढताच मिनी तिथ हजर झालीच."हे काय विशाकाका मी तयारच आहे पण आज आमची खंडणी नाही वाटत ?"यावर खिशातन चॉकलेटचा मोठ्ठा बार काढत,"वा अशी कशी विसरेन ?" म्हणत तो तिच्या हातात त्याने खुपसला आणि  आम्ही सगळेच बाहेर पडलो.
         मयासुर यांत्रव केंद्रावर आम्ही पोचलो तेव्हां आमच्यासारखेच बरेच लोक तेथे येताना आम्हाला दिसले. प्रवेशद्वारापाशी एक उंचनिंच ( आणि विश्याच्या भाषेत टंच ) युवती हसतमुखाने आमचे स्वागत करण्यास उभी होती.'सुस्वागतम्" म्हणून हात जोडून तिने आमचे स्वागत केले.विश्याने 'हॅलो' म्हणत तिचे हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे त्याची निराशा झाली.आत मोठ्या सभागृहात आमच्यासारखी बरीच जोडपी आणि विश्यासारखे काही ब्रह्मचारीही बसले होते, काहींच्या बरोबर मिनीसारखीच वेगवेगळ्या वयाची बालकेही होती.आम्ही स्थानापन्न झाल्यावर सभागृह जवळ जवळ पूर्ण भरलेले पाहून व्यासपीठावर एका रुबाबदार चर्येच्या दाढीधारी व्यक्तीने प्रवेश केला.उत्तम प्रतीचा सूट त्या व्यक्तीने परिधान केला होता.आपल्या व्यक्तिमत्वाने सर्व सभागृहावर एकप्रकारची छाप टाकणाऱ्या त्या व्यक्तीच्या आगमनाने सभागृहात एकदम शांतता पसरली आणि तिचा भंग करीत त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली,"नमस्कार मित्रहो,बंधू आणि भगिनी आणि छोट्या दोस्तानो,सुप्रभात.मी डॉ. शुक्राचार्य आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.यांत्रव तुमच्या घरी या आमच्या योजनेस भरभरून प्रतिसाद मिळेल याची आम्हास खात्री होतीच कारण जीवन अतिशय धावपळीचे झाल्यामुळे आणि हवी तशी मदत निरनिराळ्या वैयक्तिक कामात उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे आपला हा जीवनसंघर्ष अधिकाधिक कठीण बनत चालला आहे.त्यावर आपल्याला जास्तीतजास्त दिलासा देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."
       "आमच्या यांत्रवांविषयी मी काही सांगण्यापेक्षा एक गोष्ट सांगितली तरी आपल्याला आम्ही  कोणत्या प्रकारे सहाय्य करणार आहोत याची कल्पना येईल. ती गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारावर आपले स्वागत करणारी युवती दुसरी तिसरी कोणी नसून आमच्या पहिल्या मालिकेतील यांत्रवी - माफ करा हा शब्द मी स्त्री रोबाटविषयी वापरतो आहे,लक्षात घ्या हा पहिल्या मालिकेतील रोबाट आहे. या यांत्रवांच्या शरीरात फक्त विशिष्ट कार्यविषयक संकेततक्ते आम्ही बसवत असल्यामुळे तेवढे एक अथवा  विशिष्ट कार्येच ते करू शकतात." हे वाक्य ऐकून विश्याचे समाधान झालेले दिसले आणि "तरीच तिने माझ्याशी शेकहँड केला नाही " असे तो माझ्या कानात पुटपुटला." पण यापुढील मालिकेत आम्ही अधिक कामे करणारे किंबहुना बहुतेक सर्वच कामे करू शकता येणारे यांत्रव बनवण्यात यशस्वी झालो आहोत"आपले बोळणे पुढे चालू ठेवीत डॉ‌. शुक्राचार्य म्हणाले."आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या यांत्रवांची छायाचित्रे ,त्यांची कार्यकौशल्ये आणि क्षमता आणि त्यांचे मूल्य याविषयी तयार केलेली पुस्तिका उपलब्ध आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकौशल्याचा प्रत्यक्ष परिचय देणाऱ्या सीड़ी‍ज् ही आम्ही तयार केलेल्या आहेत,शेजारील सभागृहात त्या आपण पाहू शकता आणि आपला निर्णय घेऊ शकता त्याठिकाणी आपणास अधिक माहिती पाहिजे असल्या तेथे उपस्थित असणारे आमचे कर्मचारी आपणास योग्य ते मार्गदर्शन करतील. सीडी पहाण्यासाठी शेजारील सभागृहात व्यवस्था केली आहे.त्यानंतर आपला निर्णय आपण आम्हास प्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे  अथवा ऑन लाइन अशा कोणत्याही पद्धतीने कळवून आपली मागणी नोंदवू शकता.आणि आपणास जास्तीत जास्त चांगला यांत्रव उपलब्ध होईल याची खात्री देऊन आता मी आपली रजा घेतो " म्हणून डॉ. शुक्राचार्य तेथून अंतर्धान पावले.शुक्राचार्यांच्या निर्गमनानंतर एका किरकोळश्या व्यक्तीने व्यासपीठाचा ताबा घेतला आणि आम्ही सीडी पहायला जाण्यास उत्सुक असताना आता हा काय सांगणार आहे याचा विचार आम्ही करेपर्यंतच त्याने विश्व बॅकेचा आपण प्रतिनिधी असून यांत्रव खरेदीसाठी बँकेकडून अगदी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध असेल अशी घोषणा करून पुस्तिकेतील मूल्य आकडे पहायापूर्वीच आमच्या पोटात गोळा आणला.
     आम्ही सीडी पहायला शेजारील सभागृहात शिरलो.तेथे छोट्या केबिन्स तयार केलेल्या होत्या  आणि आपल्या विशिष्ट मागणीनुसार  यांत्रव वा यांत्रवीच्या कार्यकौशल्याचे दिग्दर्शन करणाऱ्या सी.ड़ी.ज् दाखविल्या जात होत्या.त्या पहाण्यापूर्वी यांत्रव घ्यायचे की यांत्रवी याविषयी निर्णय घेणे आवश्यक होते. मिनी कदाचित यंत्रसुंदरीच्या बाजूने कौल देईल अशी वेडी आशा मला वाटत होती. पण "मिन्ये तुला सोबतीला यंत्रकाका हवेत की मावशी ?" असा प्रश्न विचारताच प्रश्न पूर्ण होतो न होतो तोच तिन " मला काकाच हवेत "अस उत्तर सुद्धा देऊन टाकल्यावर त्यातल्या त्यात विद्याला चिमटा काढण्याचा प्रयत्न  मी केला " बघ पोरीला लळा बापाचाच असतो हेच खर !" पण त्या कार्टीन तेवढही समाधान मला मिळू दिल नाही म्हणते कशी"तस काही नाही बाबा ,मला लळा विश्याकाकाचा आहे" पोरटी काकाने दिलेल्या चॉकलेटच्या खुराकाला जागली होती. अर्थात आम्हाला यांत्रव सीड़ी. दाखवणाऱ्या कक्षात जावे लागले.विश्याच्या बाबतीत तो प्रश्नच नव्हता तो केव्हाच यंत्रसुंदरींच्या सीड़ी. दाखवल्या जाणाऱ्या कक्षात शिरून बसला होता. 
          सी.डी..मधील यांत्रव हुबेहूब माणसासारखेच दिसत असल्याने या खऱ्याखुऱ्या माणसांच्या सीड़ी‍ज् तर नव्हेत ना असा संशय मला येऊ लागला.याउलट विद्याच्या शंकेखोर स्वभावानुसार सीड़ी कक्षातील सहकारी येवढेच काय खुद्द डॉ. शुक्राचार्य तरी माणूस होते की तोही यांत्रवच होता अशी शंका माझ्या कानात कुजबुजून तिने व्यक्त केली.आणि ते ऐकल्यावर तेथे उपस्थित असणारे आम्ही आणि आमच्या परिचयाचे काही लोक वगळता बाकी सगळीच माणसे यांत्रव असावीत असे मला वाटू लागले.आणि मग यांत्रव आणि मानव यात कसा भेद करायचा याविषयी डॉ. शुक्राचार्यांनाच विचाराव अस वाटू लागल . माझा विचार जणु कळल्यासारखे डॉ. शुक्राचार्य तेथे उपस्थित झाले आणि बोलू लागले,    " मित्रहो आमचे यांत्रव इतके हुबेहूब माणसासारखे आहेत की त्याना माणसापासून वेगळे कसे ओळखावे याचा पेच तुम्हाला पडला असेल, पण त्याची काळजी करण्याचे तुम्हाला कारण नाही. ज‍गप्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक असिमॉव यांच्या रोबोटिक्सच्या तीन नियमानुसारच हे यांत्रव तयार केलेले असतात.त्यामुळे त्यांच्यापासून मानवाला धोका संभवत नाही.तुम्हाला दिलेल्या पुस्तिकेत या तीन नियमांचा व्यवस्थित उहापोह केला आहे. तो भाग लक्षपूर्वक वाचावा आणि काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधावा."
           आम्हाला काही तल्ते (फॉर्म्स )भरायला देण्यात आले तेवढ्यात विश्याही हसत हसत तेथे आला आणि आम्ही  तक्ते भरून देऊन तो एका सहकाऱ्याकडे सुपूर्द करून  बाहेर पडलो.
             दुसऱ्या दिवसापासून कामाच्या रगाड्यात आम्ही इतके बुडून गेलो की नेहमीप्रमाणे दिवस केव्हा उजाडतो आणि केव्हा मावळतो याचाही आम्हास विसर पडला.त्यामुळे यांत्रवाविषयी आम्ही विसरूनच गेलो म्हणाना ! याची आठवण आम्हास करून द्यायला आठ दिवसानंतर पहाटे सहा वाजता आलेल्या दूरध्वनीदर्शकाचा घंटानाद कारणीभूत झाला. पटलावर डॉ. शुक्राचार्यांचा चेहरा दिसू लागला." माफ करा या अवेळी आपल्याला तसदी देत असल्याबद्दल " हसतमुखाने ते बोलू लागले," आपल्या तक्त्यात भरलेल्या आपल्या माहितीनुसार आपण सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत घराबाहेर असता,त्यामुळे आपणाशी संपर्क साधायला हीच वेळ योग्य वाटली."
"ठीक आहे बेट्या, तुला काय बोलायचे ते बोल " असे म्हणण्याचे माझ्या ओठावर आले होते,पण तसे न म्हणता मी फक्त म्हणालो," बोला" डॉ. शुक्राचार्य बोलू लागले,
" आपला यांत्रव चंद्रमोहन लवकरच म्हणजे आठ डिसेंबर ही तारीख आपणास सोयिस्कर असेल तर त्यादिवशी आपल्याकडे पाठवण्यात येईल. आपल्याला सोयिस्कर वेळ आपण सांगावी."मी  त्यानी सुचवलेली आठ डिसेंबर ही तारीख सोयीची आहे असे सांगितले आणि त्याना योग्य वेळ सांगितल्यावर त्यांची पटलावरील प्रतिमा धन्यवाद देऊन अंतर्धान पावली.
       विद्याला ही बातमी सांगताच ती एकदम खूष झाली."बर झाल' ती म्हणाली,"पुढील आठवड्यात बऱ्याच कॉंफरन्सेसची तयारी करायची आहे त्यामुळे घरातली सगळी काम मोहन संभाळेल" तिन चंद्रमोहनचे लघुरूप केलेले दिसले आणि ते मिनीलाही आवडले आणि तीही " आता मोहनकाका येणार" म्हणून नाचू लागली.
         आठ डिसेंबरला माझी कार फाटकातून  आत शिरल्यावर  पोर्चमध्येच मिनी कुणाबरोबर तरी गप्पा मारत असलेली दिसली.कारनधून मी खाली उतरताच दोघेही माझ्याकडे आले आणि त्याच्या हाताला लोंबकाळत मिनी म्हणाली,"बाबा कोण आलेय पहाना "तिच्याबरोबर गप्पा मारणाऱ्या रुबाबदार गृहस्थाकडे मी पहातच राहिलो कारण चेहरा तर ओळखीचा वाटत नव्हता,"शुभसंध्या श्रीमान सुधीर !"हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत तो म्हणाला."मी मयासूर यांत्रव केंद्राकडून आलो आहे"असे ऐकल्यावर आम्ही मागणी नोंदवलेला यंत्रमानव चंद्रमोहन त्याला  घेऊन हा आला आहे या समजुतीने खूष होऊन मी त्याला म्हणालो," नमस्कार मग आमच्या चंद्रमोहनला  आपण घेऊन आलात काय?कुठ आहे तो ?"यावर त्याने दिलेल्या उत्तराने आपण बेशुद्धच पडणार अस वाटू लागल,कारण त्यान उत्तर दिल,"श्रीमान सुधिरजी मीच तो चंद्रमोहन !" 
 (भाग-२ लवकरच)
   

दोन चाकोरीबाहेरची आत्मचरित्रे भाग १

पोरवाल दंतमंजनाचे मालक भा वि मोकाशी यांचे "मला न पडलेले स्वप्न" हे आत्मचरित्र तसे चाकोरीबाहेरचे आहे. मोकाशींचा जन्म १९०६ चा. वडील त्यानंतर पाच वर्षातच वारले. मग भावंडांची फाटाफूट. मोकाशी मुंबईत पोचले. नातेवाईकांकडे राहत त्यांनी मॅट्रिक फेल पर्यंत पल्ला गाठला. आणि काही कौटुंबिक कारणांनी एकटेच बाहेर पडले. ओळखीओळखीने एक नोकरी मिळाली ती महिनाभर चालली. मग दुसरी नोकरी बघण्यापेक्षा धंदा का करू नये असा विचार 'कोहिनूर मिल'चे मालक रामसिंग डोंगरसिंग यांनी मोकाशींच्या मनात घुसवला ("तुम्ही महाराष्ट्रीयन लोक थोडे फार शिकता व नोकरीचे मागे लागता. दुसरा काही व्यवसाय करावा असे तुमचे मनातच येत नाही. इतर दुकानदार लोक बघा, अगदी फेरीवाले बघा, ते कारकुनी करण्यापेक्षा जास्त कमावतात, फार काटकसर करून राहतात. जास्त श्रम करतात, त्याची त्यांना सवय होते. त्याला नम्रतेने वागावे लागते. तो गुण तुम्ही लोक का लक्षात घेत नाही" हा रामसिंग डोंगरसिंग यांचा संवाद जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वीचा!) आणि आपल्याच कापडगिरणीचे कापड दारोदार विकण्याचा व्यवसाय सुरू कर असे सुचवले.

वास्तूशास्त्र किती खरे किती खोटे ?

"अंधश्रद्धा" या विषयावर नरेंद्र दाभोळकर नेहमी तुटून पडतात. पण  "वास्तूशास्त्र" या विषयावर ते काहीच का बोलत नाही. ?
"वास्तूशास्त्र" ही "अंधश्रद्धा" च आहे. या विषयावर चर्चा व्हावी.
आपल्याला काय वाटते. अमेरिकेतील लोकाना या विषयी काय म्हणायचे आहे.?

रामायण व महाभारत

रामायण व महाभारतात खगोलशास्त्र आहे.त्यावरून त्यांचा काळ ठरविता येतो.

रामजन्म ६ डिसेंबर इ.पू.७५६० रोजी झाला.

महाभारत युद्ध १४ सप्टेंबर इ.पू.३००८ रोजी सुरू झाले.

या व अनेक इतर गोष्टी मी गणिते करून शोधून काढल्या आहेत व "महाभारत युद्धकाळ" हे

माझी दुचाकी आणि कंसातलं विंग्रजी.

माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का? मला तर हमखास अशी खुळं पछाडतात. आणि एकदा का मला अशा भुतांनी पछाडलं, की त्यांचा पुरेपूर वीट येईपर्यंत, त्या भुतांना माझ्या मानगुटीवर धरून ठेवतो. जातील कुठे पठ्ठी?

तर सांगायचा मुद्दा हा की सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात (ज्याला परदेशात समर म्हणतात तो) मला कचेरीला दुचाकीने (ज्याला विंग्रजीमध्ये पुश बाइक म्हणतात ती) जाण्याच्या खुळाने पछाडलं. तसं हे खूळ जुनं नाही. लहानपणापासूनचं आहे. अगदी तिचाकी चालवत होतो तेव्हापासूनचं आहे. आता फक्त त्याने उचल खाल्ली एवढंच.

आणि त्याला कारणंही तसंच मिळालं. आमच्या कचेरीमध्ये अमुक एक दिवस "कचेरीला दुचाकीने दिन" (नाही कळलं ना? ज्याला आमच्या ऑफिस मध्ये "राइड टू वर्क डे" म्हणतात तो) म्हणून घोषित झाला. पूर्वी दुसरीकडे काम करत असताना, मी कचेरीला दुचाकीने जायचो, ही गोष्ट मी उगाचच सर्वांना सांगून ठेवली होती, प्रभाव (ज्याला युवा मराठीत "इम्प" म्हणतात तो) पाडायला. त्यामुळे दुचाकीने कचेरीला जाण्याची नैतिक जबाबदारी (जिला लोकसभेत राजीनामा मागताना "मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी" म्हणतात ती) सर्वाधिक माझ्यावर येऊन पडली.

जुनी सायकल फडताळातून बाहेर काढली. तिला तेल-पाणी, वेणी-फणी करून, हवा-बिवा भरून ती कचेरीपर्यंत न डगमगता, न भिरभिरता चालेल ह्याची खात्री करून घेतली. प्रातःकाळी अर्धा तास लवकरंच निघालो. सुरवातीचा प्रवासही झकास झाला. नदीकडून वार्‍याची झुळूक अंगावर घेऊन जाताना फार बरं वाटत होतं. आता नदी बाजूचा रस्ता संपून मुख्य रस्त्याला लागायचं होतं. खडा चढ होता, जोरजोरांत दुचाकीपाद (ज्याला मी सोडून बाकी अख्खं जग "पेडल" म्हणतं ते) मारायला सुरवात केली. पण हाय दैवा, निम्म्या रस्त्यावरच दुचाकी ढिम्म. अर्थातच थोडक्या विचारांती, उरलेला चढ, तिने आणि मी, आपापल्या पायांवर चढावा, असा निर्णय मी घेतला. चतुरपणे दुचाकीला काहीतरी झाल्यामुळे मी अर्ध्या अंतरातून उतरून चालतो आहे, अशा आशयाचा अभिनय मी तिथे उपस्थित लोकांना करून दाखवला. हाच प्रसंग पुढे येत असलेल्या तीनही टेकड्या चढताना आला. अभिनेता तोच होता, प्रेक्षक फक्त वेगळे होते.

"पुन्हा पुन्हा करा आणि परिपूर्ण व्हा" (मी केलेलं "प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट" चे दुर्दैवी भाषांतर), त्यामुळे मी तिसर्‍या वेळी केलेला अभिनय एवढा सुंदर होता, की तिसरी टेकडी चढताना (ती तिच्या पाय़ांनी आणि मी माझ्या पायांनी) खरंच माझ्या दुचाकीला काहीतरी झालंय असं वाटून, मला एका माणसाने काय झालं असं विचारलं. दिलं काहीतरी ठोकून.

सांगायचं तात्पर्य काय? तर "कचेरीला दुचाकीने दिन" चा मला फार काही आल्हाददायक अनुभव आला नाही. मी मनाशीच ठरवलं, दुचाकी जुनी झाली, नवी घेतली पाहिजे. तत्परतेने मी के मार्ट (ह्याला काय बरं मराठी प्रतिशब्द असेल?) मध्ये जाऊन नवी दुचाकी घेऊन आलो. आता इथे तयार दुचाकी महागात पडते म्हणून "जोडणीसाठी तैय्यार" (जिला के मार्टमधील कर्मचारी "रेडी टू असेंबल" म्हणतात ती) दुचाकी घेऊन आलो. ती जोडता जोडता माझी स्वतःचीच जोडणी परत करून घ्यावी लागते की काय? अशी शंका मला चाटून गेली. कधी सुकाणू (हा कोणता जिवाणू किंवा विषाणू नव्हे. दुचाकी चालवताना, आपले हात ज्या "हँडल" वर असतात ते) बैठकीच्या (दंड बैठकातली बैठक नव्हे. जर तुम्ही बर्‍याच दिवसांनी दुचाकी चालवलीत, आणि एकच दिवस नव्हे तर पुन्हा दुसर्‍या दिवशीही चालवलीत, तर सर्वात आधी जीची जाणीव व्हायला नको, तिथे हमखास होते ती ही "सीट") जागी, तर कधी बैठक सुकाणूच्या जागी. कधी पुढच्या चाकाच्या जागी मागचं चाक, तर कधी मागच्या चाकाच्या जागी काहीच नाही. ह्यापेक्षा पळत कचेरीत जाणं परवडलं. पण नाही. एकदा मानगुटीवर भूत बसलं म्हणजे मग याचिका (ज्याला न्यायालयात "अपील" म्हणतात ते) नाही. सुकाणू बैठक करता करता एकदाची दुचाकी तयार झाली.

पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारी निघाली. पहिला चढ पार झाला, अंगावर मूठभर मांस चढलं (हाय दैवा, ते कमी व्हावं म्हणून ना दुचाकीने जायचं?). दुसरा चढ सुरू होणार एवढ्यात सुकाणूने असहकार पुकारला. दुचाकीपाद तेवढे गोल गोल फिरणार मग आम्ही का नाही? असं म्हणून ते चक्क उलटं झालं. मनात आणलं असतं तर ते देखील मी गोल गोल फिरवू शकलो असतो इतकं ते ढिलं झालं. ह्या प्रसंगी माझी हुशारी कामी आली. मी पकड बरोबर ठेवलीच होती. जोडणी माझी होती ना? अर्थात दुरुस्तीही मीच केली असल्याने शेवटापर्यंत सुकाणू आपला हट्ट करीतच राहिलं. फिरलं सुकाणू हातात की काढ पकड, असं करत करत शेवटच्या टेकडीपर्यंत पोचलो. पण म्हणतात ना "दैव जाणिले कुणी" (मुद्दाम मराठीच म्हण घेतली, उगाच भाषांतराचा लफडा नको, काय?). टेकडी पार होता होताच, नव्या दुचाकीची नवी कोरी साखळी (दुचाकीच्या दुकानात जिला "चेन" म्हणतात ती) करकचून ताणली गेली आणि कचाकचा तुटली. झालं पुन्हा के मार्ट मध्ये जाऊन ती परत करून तिचे पैसे परत मिळवण्याची कामगिरी नशिबात आली.

दरम्यानच्या काळात माझ्या मित्रांनी मला दुचाकीचं वंगणीकरण ( वांग्याचा इथे काहीही संबंध नाही, मी "ऑइलिंग" बद्दल लिहितोय) करण्याचा सल्ला दिला. सगळे उपाय केले (उपास तापास नवस सायास सोडून) पण सापाला पाहून थबकणार्‍या घोड्यासारखी, चढ आला की माझी दुचाकी थांबलीच म्हणून समजा. मला हळूहळू पटायला लागलं की चूक सायकलची नाहीये. बहुदा माझीच शक्ती कमी पडत असावी. उगाच आपल्या नसलेल्या शक्तीचं प्रदर्शन कशाला? म्हणून दुचाकी आली तशी फडताळात परत गेली.

मध्ये एक मित्र घरी आला होता. तेव्हा त्याला ती बिचारी धूळ खात पडलेली दिसली. तो मला म्हणाल की ती जुनी असली तरी चांगल्या स्थितीत आहे, तेव्हा मी ती विकू बिकू नये. मी त्याला मागची सगळी कहाणी सांगितली. म्हटलं ती काही मला उपयोगी पडेल असं वाटत नाही. तो म्हणाल की मग खालच्या गतीअनुकूलकात (माझ्यासह सगळे लोकं ज्याला "गियर" म्हणतात तो. तो कसा गतिअनुकूलक म्हणेल, हे आपलं मी आता म्हणतोय) चालव. मी म्हटलं, खालच्या गतीअनुकूलकात पण ती वर चढत नाही. तो म्हणाला की मी कधी गतिअनुकूलअक बदलतो का दुचाकी चालवताना. मी म्हटलं की मी कष्ट नको चालवताना म्हणून आधीच सर्वाधिक खालच्या गतिअनुकूलकामधे टाकून ठेवलेय. तो म्हणाला मूर्खा हा सगळ्यात खालचा नव्हे, सगळ्यात वरचा आहे, दुचाकी चढ चढेलच कशी?

झालं. पुन्हा माझ्या मानगुटीवरचं दुचाकीचं भूत कार्यरत झालं. पुन्हा तेल-पाणी, वेणी-फणी, हवा-बिवा करून मी सकाळी निघालो. पहिला चढ आणि उरलेल्या तीनही टेकड्या आरामात गेल्या. माझा दुचाकी वरचा आणि स्वतःवरचा विश्वास द्विगुणित झाला. आता खरंतर ह्यांपुढे अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर असं मराठीत लिहून (आणि त्याचं विंग्रजी भाषांतर कंसात लिहून) हा लेख संपायला हवा होता. पण असं काही असतं का?

दोन आठवड्यापूर्वीच मी आणि ती (पण आता मी माझ्या पायावर आणि ती तिच्या पायावर नाही. आता दोघंही तिच्याच पायांवर) संध्याकाळी घरी परतत असताना ट्रॅमचा (ह्याला मराठी प्रतिशब्द माहीत असेल तर कळवा. अपनी उतनी पहुच नही) रुळावरून घसरून पडलो. पडली ती आणि लागलं मला (असं मी लग्नाआधी बायकोबद्दल म्हणायचो. काय समीकरणं बदलतात नाही काळाबरोबर). त्यामुळे ती बसलेय घरी आणि मी माझा खांदा सांभाळत फिरतोय. पण काय आहे, इतक्या जोरात पडूनसुद्धा मानेवरचं भूत आहे तिथे आहे. त्यामुळे आम्ही कधी पुन्हा एकत्र आनंदाने विहरतो ह्या प्रश्नाचं उत्तर काळंच देऊ शकेल. (मला "इट्स मॅटर ऑफ टाइम" म्हणायचं होतं. भलतंच काहीतरी वाटेल म्हणून हा खुलासा).

माझीही अपूर्वाई - भाग २

माझे शिक्षण संपताच लगेच नोकरीचा शोध सुरू झाला. त्या काळात 'कँपस सिलेक्शन' फारसे प्रचारात नव्हते. वार्षिक परीक्षा वेळेवर होत असत व त्यांचे निकालही ठरलेल्या दिवशी लागत. त्या सुमारास वर्तमानपत्रांमधील पानेच्या पाने भरून नोकऱ्यांच्या जाहिराती येत. त्या नित्यनियमाने वाचून जिकडे तिकडे अर्ज टाकायला सुरुवात केली. एखाद्या परदेशी कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यास त्यांच्या खर्चाने परदेशाटन घडणे जवळजवळ निश्चित होते. परंतु त्यातील बहुतेकांची निवड पद्धतही गुंतागुंतीची असायची. आधी आलेल्या अर्जांची छाननी व त्यातून निवडलेल्या लोकांची लेखी चांचणी होऊन मग उमेदवारांमध्ये सामूहिक चर्चा होई आणि  मनुष्यबल विकास अधिकारी, तांत्रिक तज्ञ आणि इतर सल्लागार या सगळ्यांबरोबर एकत्र किंवा वेगवेगळे इंटरव्ह्यूज होत. यांत कधी कधी परदेशी माणसेही असत. या सर्व अडथळींमधून पार करून गेल्यानंतर ती नोकरी हाती लागत असे. तीही नशीब जोरांवर असेल तर!

अशी ही माणसे

तो दोन मार्चचा दिवस होता व सकाळी माझी मुलगी दुचाकीवर जात असताना डेक्कन जिमखाना येथे एस.टी. बसने तिला ठोकरले. धडक झाल्याबरोबर गाडी एकीकडे व ती एकीकडे पडली. तिला पटकन उठता येईना, तेव्हा लक्षात आले की तिच्या मांडीचे हाड मोडून फ्रॅक्‍चर झाले आहे. सभोवती जमलेल्या लोकांपैकी काहींनी तिची गाडी बाजूला उभी करून ठेवली व काहींनी तिला उचलून रस्त्याच्या कडेला बसवले. तिच्या कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त वाहात होते, परंतु ती शुद्धीवर असल्याने तिने तिचा मोबाईल एकाकडे दिला व घरी फोन करायला सांगितला. दरम्यान काही लोकांनी रिक्षा थांबवून मुलीला त्यात घातले व बरोबर एक बाई बसल्या. रिक्षावाल्याने प्रसंगावधान राखून तिला संचेती हॉस्पिटलमध्ये नेले. ज्याच्याकडे तिने मोबाईल दिला होता तो तरुणदेखील मोटरसायकलवरून हॉस्पिटलला पोचला. वाटते त्याने आमच्या घरी फोन करून थेट हॉस्पिटलला यायला सांगितले होते. हे सगळे होताना काही लोकांनी एस.टी.चा नंबर कागदावर लिहून त्या बाईंच्या हातात कोंबला होता तर कोणी पोलिस चौकीवर जाऊन तो नंबर सांगितला. पोलिसांनी कंट्रोलरूमद्वारे सतर्कतेचा आदेश देऊन येरवडा येथे एस.टी पकडली. आम्ही हॉस्पिटलला पोहोचायच्या आत मुलीच्या कपाळावरील जखम पुसून टाके घातले होते व तिला एक्‍सरेसाठी नेत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गंगी , भीमसेन जोशी आणि डॉ. माधवी खोडे

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नुकत्याच प्रकाशात आलेल्या एक गुणवंत / भावी प्रशासकीय अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी त्यांचे मत दिले आहे. त्यांच्यामते शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी व खर्च जास्त असतो. उत्पन्नाचे मार्ग व खर्चाच्या बाबी अर्थातच दिलेल्या नाहीत. याच वेळी मला अलिकडेच वाचलेली एक बातमी आठवली. गाढवाचं लग्न या वगनाट्यातील जुन्या अभिनेत्रीवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्या अभिनेत्रीने म्हटल्याप्रमाणे लोकांनी अभिनय करतानाच्या काळात जे प्रेम केले ते आता दाखवले जात नाही. हे वाचताना मला एक जुनी बातमी आठवली. एक वृद्ध व नामवंत वादक याच उपासमारीने त्रासले होते. त्यांना शासनाने व अन्य कलावंतांनी मदत करावी, असा प्रतिसाद लोक देत होते. याच संदर्भात भीमसेन जोशींनी त्यांचे मत देताना म्हटले होते की "ज्या काळात या लोकांना समाज प्रेम व कलेच्या सन्मानाखातर पैसा देत असे, त्या काळात मिळालेला पैसा हे व्यसने किंवा अन्य अनुत्पादक कारणांसाठी उधळतात, त्यांना वृद्धपणी  उपयोगी पडेल अशी गुंतवणूक करावी वाटत नाही. आता समाजाच्या नावाने बोलण्यात काय अर्थ आहे. "

गोवा जंगल ट्रेक

गोवा ट्रेक

गोवा म्हटले की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा निसर्ग आणि समुद्रकिनारा.
हे गोव्याचे आकर्षण. बहुतेक म्हणूनच गोव्यामधे भारतीय पर्यटकांपेक्षा फॊरेनर्स जास्त बघायला मिळतात. गोव्याच्या खास वैशिष्ट्यांमधे येथील इतिहास आणि फूड यांचाही समावेश होतो. पेपरमधे गोवा ट्रेकची जाहिरात झळकली आणि बरेच दिवस शांत असलेल्या गिर्यारोहक मनाने उचल खाल्ली. डोंगरदर-यांतील स्वैर भटकंती म्हटली की आठवते सह्याद्रीचे खोरे. थोडं दूरचं पर्यटन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो बर्फाच्छादित काश्मिरचा प्रदेश किंवा अगदी दक्षिणेकडचा केरळचा निसर्गरम्य प्रांत. पण अशीच स्वैर भटकंती गोव्याच्या जंगलातही करता येते हे वाचून आश्चर्यच वाटले. हा काय प्रकार आहे बघण्यासाठी लगेचच नावे युथ होस्टेलकडे सुपूर्त केली. फोन खणखणले आणि आमचा ८ जणांचा ग्रुप तयार झाला. यापैकी आम्ही ६ जण मुंबईचे होतो आणि बाकी दोघे जण दिल्ली मधून येणार होते. मी पहिल्यांदाच अशा एका ग्रुपबरोबर जात होते. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक मी आणि बाबांनीच केले आहेत. मनात थोडीशी भीती होती..... ग्रुप कसा असेल??????? मी त्यांच्यात फीट बसू शकेन की नाही??????? असे हजार प्रश्न माझ्या मनात घिरट्या घालत होते. आम्ही एकदम प्रवासाच्या दिवशीच एकमेकांना भेटलो. ट्रेन मधेच माझी या सर्वांशी ओळख झाली आणि मग काय विचारता....बास, फूल टू धम्माल!!!!!!!! या सगळ्यांच्यात मी एकदम फीट बसले. मला हा ग्रुप खूप आवडला. पल्लवी, प्रशांत, रवी, मनिषा, निधी ,निशांत बाबा आणि मी..........असा हा आमचा ८ जणांचा ग्रुप होता. खरं तर यूथ होस्टेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमुळे मला आज एवढे चांगले मित्र, मैत्रिणी मिळाले. तसेच गोव्यातील काही नवीन ठिकाणांची ओळख देखील झाली जसे कुवेशी, अटाली, वेलसाव....... ट्रेकिंग करण्याचा हाच एक फायदा असतो....ज्या ठिकाणी आपण एक पर्यटक म्हणून कधीच जाऊ शकत नाही तेथे एक ट्रेकर म्हणून जायला मिळते.....ही सर्व ठिकाणं आड जंगलात वसलेली आहेत ....म्हणूनच यांचे निसर्गसौंदर्य आजही टिकून आहे.
आम्ही सकाळी ११.०० च्या सुमारास गोव्यात पोहोचलो. शेती बागायती, नद्या, गावं आणि निसर्गातल्या विविधतेचं धावतं दर्शन घेत रेल्वेमधे वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. तसेच यांच्या सोबतीला गप्पा देखील होत्या की........ गोव्यात पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही बेस- कॆंप गाठला. रिपोर्टिंग केले. थोड्या वेळाने आम्ही आसपासच्या भागात मस्त फेरफटका मारून आलो. त्या दिवशीच्या कॆम्प फायरमधे शिरस्त्याप्रमाणे यूथ होस्टेलचे ध्येय, नियम हे सोपस्कार पार पाडले.

आमचा कोकणप्रवास

माझ्या मामेबहिणीचे लग्न ठरल्याचे कळले आणी आमच्या रत्नागिरीला कधी,कसे आणी कोणकोण जायचे या चर्चेला ऊत आला. माझ्या नवऱ्याचे आजोळही कोकणात असल्याने दरवर्षी कोकणात एक ट्रीप तरी झालीच पाहिजे याबद्दल (तरी)आमच्यात दुमत नव्हते. त्यांतून सख्ख्या मामेबहिणीचे लग्न म्हणजे बघायलाच नको.लग्न मेमधील एका रविवारी होते पण आम्ही किमान एक आठवडा तरी आधी यावे असा आग्रह होता. अर्थात नवऱ्याचा व्यवसाय आणी माझी नोकरी सांभाळून आठ दिवस सलग कुठेही जाऊन राहणे मुश्किलही नही नामुमकीन होते. आमच्याबरोबर माझी चुलत बहिण,चुलत भाऊ आणी आत्तेभाऊ हेही येणार होते. ते तिघेही महाविद्यालयांत शिकत असल्याने त्यांना उन्हाळी सुट्टी होती. त्यामुळे ते रत्नागिरीला जायच्या ८ दिवस आधी पुण्यात दाखल झाले. ८ दिवसांत त्यांचे पुणे दर्शन घेऊन झाले. सिंहगड ,खडकवासला, आणि (अतिरेक्यांसारखी डोक्याला रुमाल बांधलेली)अधिक प्रेक्षणीय स्थळे  बघून झाली. आम्ही शनिवारी पहाटे ४ ला निघायचे ठरविले होते. पण शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वाजता अचानक नवऱ्याने जाहीर केले की, आपण आज १० वाजता निघायचे आहे. सगळ्यांनी एकच जल्लोष केला आणि युद्धपातळीवर सामानाची
बांधाबांध सुरु केली.चारचाकीतून जायचे असल्याने सगळ्यांनीच भरपूर सामान घेतले होते.सगळे सामान आणी आम्ही ५ जण..गाडी खचाखच भरली. १० म्हणताना आम्ही ११ ला निघालो.. तबकडीवर गाणी चालू होती.एकीकडे आमच्या गप्पांना ऊत आला होता. नवरोबा अत्यंत सफाईने गाडी चालवित होते. १ नंतर हळूहळू आमच्या डोळ्यांवर पेंग येऊ लागली. गाडीचालकाच्या शेजारी बसलेल्याला डुलक्या घ्यायची परवानगी नसते त्यामुळे चुलतभाऊ मागच्या सीटवरुन पुढे व आत्तेभाऊ मागे अशी आसनांची अदलाबदल झाली. नवरोबाप्रमाणेच चुलतभावालाही झोपेचे वावडे असल्याने जागे राहून सोबत करण्यासाठी  आम्हांला तो चांगला बकरा मिळाला होता. ते दोघे आम्हांला सारखे झोपू नका, गप्पा मारा वगैरे  सांगत होते. मी,चुलतबहीण आणि आत्तेभाऊ आपण जागे आहोत हे दाखवण्यासाठी मधूनच एखादे (असंबद्ध) वाक्य टाकत होतो. मध्ये चहा पिण्यासाठी सगळे खाली उतरलो तेव्हा मात्र आमची झोप उडाली. २:३० वाजले होते. चहा  आणी बिस्कीटे खात १० मिनिटे थांबलो. सगळे परत ताजेतवाने झाले होतो. आता पुढे कुंभार्ली घाट चालू होणार होता. घाटात थोडे पुढे गेल्यावर समोरुन धुक्याचे लोट येऊ लागले. ३/४ फुटांपलिकडलेही दिसत नव्हते.गाडीत आम्ही 'ताल' ची गाणी ऐकत होतो.वातावरण अप्रतिम होते. गाणी ऐकताना गप्पा चालूच होत्या. घाटात मध्येच एखादे वाहन येत जात होते. बरोबर ६ वाजता आम्ही मारळ ला पोहोचलो. तिथे भगवान शंकराचे मंदिर आहे. नवरा विश्रांतीसाठी थांबला आणी बाकिचे चौघे उत्साहात मार्लेश्वराच्या पायऱ्या चढू लागलो. २०/२५ पायऱ्या चढल्यानंतर आमचा वेग मंदावला. पायऱ्यांच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर होत. आजुबाजूची झाडे सुकली होती. जवळच्या मोठमोठ्या दगडांवर अमुक लव्ह्ज तमुक, जय मार्लेश्वर, रमेश,दीपक असे काही बाही लिहिले होते. पायऱ्यांच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या बंद होत्या. हाशहुश्य करत आम्ही मंदिराजवळ पोहचलो. हे मंदिर म्हणजे एक गुहा आहे. आत जाण्यासाठी वाकून जावे लागते. आत पुजारी पूजा करीत होता. तिथेच उभे असलेल्या एका माणसाने आम्हाला वर बघण्याची खूण केली व त्याच्या हातातल्या विजेरीने गुहेच्या वरच्या बाजूला एक प्रकाशझोत टाकला. तिथल्या खबदाडींमध्ये २/३ सर्प होते. ते बघून एकदम अंगावर शहारा आला आणी (अर्थातच) भितीही वाटली.तरी आत्ता कमी साप आहेत असे तो म्हणाला. आम्ही झटपट दर्शन घेऊन बाहेर पडलो. अगदी देवाच्या ठिकाणी असले तरी डोक्यावर २/३ सर्प लटकत असताना आम्ही तिथे थांबण्याइतके शूर नक्किच नव्हतो. बाहेर आल्यावर तो पुजारी आत इतक्या बिनधास्त कसा बसला असेल याबद्दल चुलतबहिणीने आश्चर्य व्यक्त केले. आम्हीही तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. थोडा वेळ घालवून आम्ही पायऱ्या उतरु लागलो. उतरु लागेपर्यंत तेथील काही दुकाने उघडली होती. आम्ही एका ठिकाणी काकडी व दुसरीकडे ताक घेतले.खाली येईपर्यंत नवरा चहा पिऊन पुन्हा गाडी चालवायला सज्ज झाला होता. गाडीत बसल्यावर पुन्हा आमच्या गप्पाटप्पा,गाणी सुरु झाली. ९ पर्यंत रत्नागिरीत लग्नघरी येऊन पोहोचलो.
संध्याकाळपर्यंतचा वेळ गप्पा, खाणेपिणे, तयारी यांत गेला.रात्री सीमांतपूजन होते. त्यामुळे तिथेही सगळ्या
नातेवाईकांना भेटणे, ओळखी करुन घेणे-देणे, जेवण यांत बराच वेळ गेला. दुसऱ्या दिवशी लग्न. सकाळपासून एकच धांदल होती. सगळे आवरुन आम्हीही कार्यालयात पोहोचलो. माझ्या आजोळचे सगळे नातेवाईक भेटत होते. त्यांतले काही लांबचे नातेवाईक पहिल्यांदाच भेटत होते.त्यामुळे तू ताईची मुलगी ना? कुठे असतेस?यजमान काय करतात वगैरे चौकश्या चालू होत्या. तेवढ्यात माझ्या आईने तिच्या मामेभावाची (आज्जीच्या मामेभावाच्या मुलाची)ओळख करुन दिली. मी ही लगेच माझ्या नवऱ्याची आणी त्या मामाची ओळख करुन दिली.लग्न लागले, पंगती उठल्या. आम्ही त्याच रात्री घरी जायला
निघणार होतो. त्याप्रमाणे बॅग्ज भरुन,सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. यावेळी गाडीत २ बॅग्ज वाढल्या होत्या.
आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा आमच्या गप्पा सुरु. ३ तासांनंतर हायवेवरील एका टपरीवर चहा
पिण्यासाठी थांबलो. रस्त्यापलिकडे ४/५ ट्रक थांबले होते. पलिकडे आमच्या अगदी समोर एक टेम्पो उभा होता. आम्ही हसत खिदळत चहा घेत होतो. तेवढ्यात त्या टेम्पोमधून एकजण डोळे चोळत खाली उतरला रात्रीचे २/२:३० झाले असतील.."अगं हा सकाळी भेटलेला तुझा मामा आहे वाटतं"- इति नवरा. मी अगदी जोरात म्हणाले " छे, मामा इथे आत्ता यावेळी कसा असेल?" तो माणूस रस्ता क्रॉस करुन टपरीच्या दिशेनेच येत होता. आम्ही सगळे तो मामाच आहे का याची खात्री करण्यासाठी त्याच्याकडेच बघत होतो. आणि तो सकाळी लग्नात भेटलेला ताम्हनमळ्याला राहणारा माझा मामाच होता. तो पुण्याला आंब्यांच्या पेट्या घेऊन चालला होता. आता एकत्रच जायचेय तर भोरमार्गे न जाता ताम्हिणी घाटातून जाऊया असे ठरले. आम्ही निघालो. कधी आमची गाडी पुढे तर कधी मामाचा टेम्पो पुढे असे चालले होते. आता आम्ही माणगावातून ताम्हिणी घाटाच्या दिशेने जात होतो. घाट सुरु झाला. पहाटेचे साधारण ३:३० झाले होते. मामाचा टेम्पो थोडा पुढे गेला होता पण दिसत होता . आणी अचानक कडाड्कड्कड असा आवाज झाला. नवऱ्याने भरभर पुढे गेलेल्या टेम्पोला दिसतील अश्याप्रकारे सिग्नल्स दिले आणि गाडी बंद केली. सगळे गाडीतून खाली उतरलो. चारचाकीचे सगळे वजन पेलणारा पाटा चक्क तुटला होता.
आम्ही त्या सुनसान ताम्हिणी घाटात हताशपणे उभे होतो. एकच उपाय होता तो म्हणजे पुढे गेलेल्या मामाला काहीतरी करुन बोलावून घेणे. आमच्या नशिबाने त्या दिशेने जाणारी एक ट्रॅक्स दिसली. त्यांना थांबवून आम्ही त्या टेंपोचा नंबर आणि आमचा निरोप सांगितला. ट्रॅक्स गेल्यावर आमचे तर्ककुतर्क चालू झाले. मामा भेटले तर ठीक नाहीतर काय करायचे वगैरे ठरवू लागलो. आजुबाजूला सगळे शांत होते. तेवढ्यात समोरुन एक वाहन येताना दिसले आणि आम्ही देवाचे आभार मानले. तो मामाचाच टेंपो होता. मामा आणि त्याच्याबरोबर क्लीनर म्हणून असलेली दोन मुले हे सगळे खाली उतरले व त्यांनी चारचाकीची पहाणी केली. पाटा तुटलेला असताना सगळे गाडीतून येणे तर शक्यच नव्हते. पण एकजण तर येऊ शकला असता. शेवटी आम्ही आमचे सगळे सामान मामाच्या टेंपोत टाकले. त्या टेंपोला मागे एक दोरी लोंबत होती. त्या दोरीला धरुन चुलतभाऊ आणि आत्तेभाऊ टेंपोत चढले. मी आणि चुलतबहिण प्रयत्नांची परकाष्ठा करत टेंपोत चढलो. टेंपो आंब्याच्या पेट्यांनी भरला होता. आम्ही सगळे मागच्या बाजूला ठेवलेल्या पेट्यांवर बसलो. ते दोन क्लीनर्स पुढे केबिनमध्ये बसले होते. टेंपो सुरु झाला. असे टेंपोत बसून यावे लागेल हे आम्हांला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आता आपण काहीही त्रास न होता पुण्याला पोहोचणार ही खात्री असल्याने आम्हांला त्या प्रकाराची मजाच वाटत होती. ताम्हिणी घाटातून आमचा टेंपो व मागे नवरा एकटा चारचाकी चालवित येत होता. घाटात आजुबाजूला मोठमोठी झाडे होती आणी अंधार असल्यामुळे आमच्या सावल्या दिसत होत्या. आम्ही दिल चाहता है मधले तीन नायक हातवारे करुन सावल्या बघतात तसे करु लागलो. नवरा पुढे गेला आणि त्याच्यामागून टेंपो जात होता.
थोड्या वेळाने आत्तेभावाला लघुशंकेची जाणीव झाली. आता मामाला टेंपो थांबवायला कसे सांगायचे हा यक्षप्रश्न होता. थोडा वेळ आम्ही वाट बघितली की मामा मध्ये थांबतीलच. पण नाही. टेंपो भरधाव चालला होता. इकडे आत्तेभाऊ अस्वस्थ झाला होता. आम्ही मामाला हाका मारायला सुरुवात केली. पण टेंपोच्या आवाजापुढे केबिनमधल्या मामापर्यंत आमचा आवाज अजिबात पोहोचत नव्हता. मध्ये आंब्याच्या पेट्या रचलेल्या असल्याने आम्हांलाही केबिनपर्यंत जाता येत नव्हते. आत्तेभावाच्या दयनीय अवस्थेकडे बघून आम्ही जीवाच्या आकांताने मामाला हाका मारत होतो. केबिनची काच मागून उघडलेली होती.आमचा आरडाओरडा ऐकून क्लीनरने त्या काचेतून मागे वळून पाहिले.आम्ही हातवारे करुन त्याला गाडी थांबवायला सांगा असे इशारे करत होतो. पण त्याला ते कळले नसावे. त्याने चक्क ती काच बंद करुन टाकली. आम्ही हताश झालो.मामा काही थांबायला तयार नव्हते. तेवढ्यात चुलतबहिणीची ट्यूब पेटली आणि तीने पुढे चारचाकीत असलेल्या माझ्या नवऱ्याच्या भ्रमणध्वनीवर कॉल करण्यास सुचविले. नशिबाने भ्रमणध्वनीला रेंज होती. नवऱ्याला कॉल करुन त्याला परिस्थिती सांगितली. त्याने ताबडतोब मामाला टेंपो थांबविण्यास सांगितले. एकदाचा टेंपो थांबला.आत्तेभाऊ वेगाने खाली उतरला आणि बाजूच्याच 'सुदान' प्रदेशात धावत गेला. आम्हांला हायसे वाटले.

टेंपो पौड पर्यंत आला. आता ८ वाजले होते व रस्त्यावरही बऱ्यापैकी लोक होते. ते आमच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होते. ९ पर्यंत मामाने टेंपो पुणे शहरात आणला. आम्ही सामान उतरवून घेतले.मामाला सगळ्यांनीच धन्यवाद दिले. त्यादिवशी सुट्टी घेतली नसल्याने मी घाईघाईत कचेरी गाठली. दिवसभर अंग दुखतच होते. सगळा किस्सा सांगितल्यावर मैत्रिणी हसू लागल्या. त्यांना सांगितले आज दिल चाहता है मधल्या सैफसारखे मी म्हणू शकेन "तुम्हे क्या लगता है मै रोज ऐसे तकीयेपे बैठती हूं??"