अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट <-> ऍडवायज़र <-> बडवायज़र (१)

लेखन वाचण्यापूर्वी एक (अति)आगाऊ सूचना - प्रस्तुत लेखन हे लेखकाच्या परदेशी वास्तव्यातील बहुरंगी बहुढंगी (हे म्हणजे लिहिताना आपलं जरा छान छान वाटायला!) अनुभवांचे चित्रण असल्याने, तसेच त्यातील सुखदु:ख केवळ लेखकालाच ठाऊक असल्याने, मनोगतावरील संस्कृतीरक्षक, संस्कृतीभक्षक, व्याकरणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आणि इतर अनेक विषयांतील तज्ज्ञांनी या लेखनाच्या विश्लेषणाआधी याकडे केवळ एक लेख म्हणून न पाहता, सलग बत्तीस तासांचं अपरिहार्य जागरण आणि त्यानंतरची तितकीच अपरिहार्य झालेली सलग सतरा तासांची झोप यांचा उद्वेगजन्य परिपाक म्हणून पाहिल्यास लेखनाचा निखळ आनंद (निदान लेखकाला तरी!) लुटता येईल.

मराठी गाण्यांची चलच्चित्रे (व्हिडिओज)

यूट्यूबवर भटकताना काही मराठी गाण्यांची चलच्चित्रे सापडली. मनोगतींसाठी त्यांचे दुवे येथे देत आहे.


१. मराठी पाऊल पडते पुढे


२. शूर आम्ही सरदार


३. रेशमाच्या रेघांनी

टोमॅटो भात

वाढणी
२ व्यक्ती साठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो,१ मोठा कांदा उभा चिरलेला
  • १ वाटी बासमति तांदूळ
  • दालचिनी पूड,जीरे पूड
  • १ तमालपत्र
  • लाल तिखट,मीठ,साखर,
  • तुप

मार्गदर्शन

प्रथम तांदुळ धुवुन ठेवावे. टोमॅटो चिरुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे.प्रेशरपॅन मध्ये १ मोठा चमचा तुप टाकावे. त्यात तमालपत्र टाकावे.कांदा घालून लालसर होईतो परतावा.मग त्यात तांदुळ टाकुन २-३ मि. परतावे.

बोरॅट

'बोरॅट' हे नाव आहे सध्या अमेरिकेत धुमाकूळ घालत असलेल्या एका लो बजेट चित्रपटाचे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर इतका यशस्वी ठरेल ह्याची खुद्द त्याचा वितरकांनाही कल्पना नसल्याने अवघ्या १०० प्रती पाहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात आल्या परंतु त्याचे उत्पन्नाचे आकडे बघता हा चित्रपट मोठ्या बॅनरच्या नाव असणाऱ्या चित्रपटांनाही मागे टाकणार असे दिसत आहे.

बाळ ठाकरे ह्यांची मुलाखत..

महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास, बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही. या काळात बाळासाहेबांनी अनेक वाद उभे केले आणि अनेक वादळांचा सामनाही केला. त्यांच्याशी झालेली ही बातचीत... त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत!

गर्व होता ताठा

कित्येक विद्वान वर्षानुवर्षे संतसाहित्य विषयाचा सखोल अभ्यास करत आहेत. तसे पाहता हा काही माझा विषय नव्हे. पण तरीही एक प्रयत्न करीत आहे. या विषयातील घोर अज्ञानामुळे भरपूर चुका असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी चुका व सुधारणा सुचवाव्या तसेच यात भरही घालावी. 

संतसाहित्यात मानवाच्या गुण-दुर्गुणांवर बरेच भाष्य केलेले दिसून येते. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास इत्यादींनी आपल्या काव्यात सर्वसामान्यांत दिसणाऱ्या उणीवांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. तसेच कसे वागले पाहिजे याचीही शिकवण त्यात दिसून येते.