माणूस नावाचा बेटा-७

दत्तूच्या बाजूला आणखी कुणीतरी खुर्ची ओढली. गणपतनाना आले म्हणताच दत्तू आदबीने बाजूला सरला. गणपतनाना उगाचच हसले. त्यांनी हातातील पुस्तक व काठी काळजीपूर्वक खिडकीत ठेवली व आपली व्हॉयोलिनवर शोभणारी लांबसडक बोटे जुळवून ते खेळ पाहू लागले. साऱ्या क्लबात दत्तूला फक्त गणपतनानांविषयी कुतूहल व आदर वाटत असे. त्या गृहस्थाने खोऱ्याने पैसा ओढला. सुपासुपाने खर्च केला. साऱ्या आयुष्यभर शौकही असा कलंदर केला की ते अत्तराच्या दिव्यांनी सुगंधी प्रकाशले. चाळीस वर्षांपूर्वी एल.एल.बी. ला पहिला वर्ग मिळवलेले गणपतनाना आजपर्यंत हायकोर्ट जज्ज होऊन जायचे. पण त्यांनी काढली मोटर कंपनी. मोठमोठ्या पिशव्यांतून गल्ला बँकेत भरला. गावातला पहिला रेडिओ गणपतनानांचा. पहिले सिनेमा थिएटर त्यांचे. त्यांच्या दिवाणखान्यात मोठमोठ्या गायकांच्या मैफली झडल्या. त्यांचे कपडे असे ऐटबाज असत की, कधी तरी कंपनीच्या कामाला विजापूर - बागलकोटकडे ते गेले की त्यांचा रुबाब पहायला लोक मुद्दाम येत. एका संस्थानिकाकडे असलेल्या एका कोकिलकंठी कुलवतीला त्यांनी उघडपणे मोटारीतून आणले. तिची पहिली शेज झाली ती म्हणे रुपये व फुले यांच्या शय्येवर! पण तिने पत्नीला एक शब्द उर्मटपणे बोलताच भर अंगणात त्यांनी तिला वेताने फोडून काढले. मुंबईला कंकय्या खेळणार, पुण्याला बालगंधर्वांचे 'स्वयंवर' लागणार म्हटले की, गणपतनाना फर्स्ट क्लासमधून लवाजम्यासह चालले. नवीन शाळेसाठी मदत मागायला त्यांच्याकडे काही लोक आले त्या वेळी, आपले नाव शाळेला न देण्याच्या अटीवर ड्रॉवरमधून पंचवीस हजारांच्या नोटांचा अस्ताव्यस्त ढिगारा त्यांनी त्या लोकांपुढे टाकला. गावातल्या सहा मोठ्या विहिरी त्यांनी बांधल्या. गावातल्या सध्याच्या निम्म्या डॉक्टरवकीलांचे शिक्षण त्यांच्या आतषबाजीतून झाले. पण बहर ओसरला. सारा पैसा गेला. पण तो स्वतः मिळवलेला. वडीलोपार्जित मिळकत त्यांनी जशीच्या तशी मुलाच्या हवाली केली. आपली दोन हजार इंग्रजी पुस्तके नेटिव्ह लायब्ररीला देऊन टाकली. मैफल संपून गेली, पण ना खंत ना खेद. कुठे चिकटून राहिल्याची खूण नाही, काही तुटून गेल्याचा डाग नाही. आता ते एका खोलीत राहात, पांढरा शुभ्र, गुढग्यापर्यंत नेहरू शर्ट घालीत, पांढरे झालेले केस सारे मागे वळवीत. हातात नेहमी चांदीच्या मुठेची काठी, व हातात डिक्सन कार किंवा गार्डनरचे एक पुस्तक. ते स्वतः कधीच रमी खेळत नसत. साऱ्या आयुष्याचा धुंद जुगार करणाऱ्याला पै-आण्यात काय आकर्षण वाटणार? अलिप्त नजरेने ते सारा खेळ पाहात, दोनचार आण्यासाठी चाललेली बाचाबाची ऐकत, निर्लज्जपणे देणी बुडविणाऱ्यांकडे 'काही समजत नाही' अशा नजरेने पाहात. एखादा ग्रीक देव माणसांच्या किरकोळ जगात येऊन जावा त्याप्रमाणे त्यांचे क्लबला येणे असे.

शुद्धलेखन चिकित्सक

प्रशासक आणि या विषयातल्या तज्ञांसाठी माझा एक विचार इथे मांडत आहे.  काही लोक आत्मविश्वासामुळे, काही आळसाने, तर काही अज्ञाने शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.


मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून लेखात लिहिलेला शब्द तुमच्या शब्दसंग्राहात नसेल तर आपोआप त्याखाली लाल रेषा उमटते.  तसेच त्या वेळेला मूषकाची उजवी कळ दाबली तर पर्यायी शब्द दिसतात.  अशा रितीने लिहिण्याच्या वेळीच आपल्याला सावधानतेचा इशारा मिळून शब्द तपासण्याची संधी मिळते.

विना वीज सातारी फ्रीज !

काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये ही बातमी वाचायला मिळाली आणि अनेक पदरी आनंद झाला. मराठी माणसाचे यश म्हणून. भारतीय उत्पादनाला जागतिक मान्यता म्हणून, विजेचा न-वापर म्हणून, पर्यावरण म्हणून ..... सगळ्यांना तो आनंद वाटावा (दोन्ही अर्थांनी) म्हणून ती बातमी येथे उतरवली आहे.

"तीसरी कसम उर्फ़ मारे गये गुलफ़ाम" / फणीश्वरनाथ "रेणु"

काही लोक आपल्या वेळाचे व्यवस्थापन करण्यात वाकबगार असतात. ते योजनाबद्ध रीतीने त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण करतात, करू पाहतात. हे लोक वाचनही ठरवून करतात व ते त्यांच्या स्वारस्याच्या विशिष्ट क्षेत्रातले असते, उगीच मिळेल ते वाचण्यात हे आपला वेळ वाया घालवत नाहीत. दुर्दैवाने मी या लोकांत मोडत नाही (नाहीतर कुठल्या कुठे गेलो असतो हो!).
मी एक वेश्यावृत्ती वाचक आहे (इंग्रजीतल्या व्होरेशस या शब्दाचे स्पेलिंग थोडे बदलून अर्थ होईल तसा).  आपला त्या विषयाशी संबंध आहे की नाही याची पर्वा न करता समोर येईल ते वाचण्याच्या या माझ्या सवयीमुळे अवांतर वाचन करता करता शाळा-कॉलेजांची हिंदी पाठ्यपुस्तकेसुद्धा मी पुष्कळ वाचली. त्यातूनच "रेणु"जींसारखा हिरा हाती आला.